एक्स्प्लोर

स्वतःच्या कार्यकर्त्यांची दुकानदारी बंद झाल्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा संताप, भाजपचा आरोप

केवळ शेतकऱ्यांकडून दलाली घेऊन आपली दुकानदारी चालविणाऱ्या कार्यकर्त्यांची दुकानदारी बंद झाली म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा संताप होत आहे. अशी टीका भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई : एकीकडे केंद्र सरकारने शेती विषयक सुधारणांकरिता 5 जून 2020 ला काढलेल्या वटहुकुमाची कठोर अंमलबजावणी महाराष्ट्रात करावी या करिता 10 ऑगस्टलाच अधिसूचना काढायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखविण्यासाठी या विधेयकाच्या विरोधात सर्वत्र आंदोलन करायचे, यातून काँग्रेस- राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड झाला असून, केवळ शेतकऱ्यांकडून दलाली घेऊन आपली दुकानदारी चालविणाऱ्या कार्यकर्त्यांची दुकानदारी बंद झाली म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा संताप होत आहे. अशी टीका भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ज्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ( करार शेती) विषयी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते ओरड करीत आहेत त्याच पक्षांच्या मनमोहन सिंग सरकारने 2005 मध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांची समिती नेमून अहवाल मागविला होता, त्याच अहवालाच्या आधारे 2005 मध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व शेती मालाला खुली बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशा प्रकारचे कायदे करण्याची सूचना सर्व राज्यांना दिली होती. महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने जुलै 2006 मध्येच अशा प्रकारचा कायदा पारित करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग (करार शेती) व बाजार समित्यांच्या बाहेर शेतीमाल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली होती. त्या वेळी महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा केला होता.

आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संपूर्ण देशाकरिता तो कायदा लागू केला आहे, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केलेल्या कायद्यात दलाली घेण्याची अट होती, परंतु आता मोदी सरकारने केलेल्या कायद्यात कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा दलाली देण्याची अट नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मक्तेदारी झालेल्या बाजारसमित्या व अडत्यांना आपली दलाली घेण्याची दुकानदारी बंद करावी लागणार असल्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आंदोलन करीत असल्याची टीका सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

केवळ महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांसमोर दिखावा करणाऱ्या पवार अँड कंपनीच्या नेत्यांचा खरा चेहरा आता देशासमोर उघडा पडला आहे असा टोला सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी लगावला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget