एक्स्प्लोर

जेटलींचा बजेट म्हणजे स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस : अशोक चव्हाण

कॉर्पोरेट टॅक्स कमी करुन सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, तर कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम करत आहे, हे दाखवून दिले आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

मुंबई : अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कोणताही रोडमॅप नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. तसेच, मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकून महागाई वाढवणारा आणि जनतेची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीकाही खासदार अशोक चव्हाण यांनी केली. “शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा ही निव्वळ धुळफेक असून सरकारने उत्पादन खर्चच FCI आणि कृषी मूल्य आयोगाच्या किंमतीपेक्षा दीडपट कमी धरला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2020 पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा सरकारकडून वारंवार केली जाते आहे. पण अमंलबजावणीचा ठोस कृती आराखडा जाहीर केला जात नाही.” असे अशोक चव्हाण म्हणाले. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करुन सरकार दिलासा देईल अशी मध्यमवर्गीय आणि नोकरदारांची अपेक्षा होती. पण सरकारने त्यांची घोर निराशा केली, असे म्हणत अशोक चव्हाण पुढे म्हणाले, “पेट्रोल, डिझेल, गॅस जीएसटीच्या कक्षेत आणून सरकार इंधनाच्या किंमती कमी करेल अशी अपेक्षा होती. पण सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवून सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत ढकलण्याचे काम केले आहे.” कॉर्पोरेट टॅक्स कमी करुन सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, तर कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम करत आहे, हे दाखवून दिले आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने मोबाईल, लॅपटॉपवरील ड्युटी वाढवल्याने ते महागणार आहेत. सेस 3 टक्क्यांवरुन वाढवून 4 टक्के केला आहे. त्यामुळे प्रत्येक बिलावर कर वाढणार आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे, असे म्हणत डिजिटल इंडियावरही चव्हाणांनी निशाणा साधला. “अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात निवडणुकीच्या प्रचारसभेप्रमाणे फक्त घोषणा आणि आश्वासने दिली आहे. प्रत्यक्षात दिलासा मात्र दिला नाही. पुन्हा एकदा गोड स्वप्ने दाखवून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम या सरकारने केले आहे. या अर्थसंकल्पातून देशातील जनतेच्या हाती प्रत्यक्षात काहीच पडणार नाही. सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे.”, असे चव्हाण म्हणाले. “अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत असतानाच  राजस्थानमधील दोन लोकसभा व एका विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीचे निकाल आले आणि जनतेने भाजपचा पराभव करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी केले. भाजप सरकारच्या पोकळ घोषणांवर आणि फसव्या आश्वासनांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसून हा भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे.” असा विश्वासही चव्हाणांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Mumbai Bhondubaba Ridam Panchal: मुंबईतील भोंदूबाबा रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा
मुंबईतील भोंदूबाबा रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा
Bhondubaba In Mumbai: बकऱ्याचा कलेजा, स्मशान राख, लिंबू-टाचणी...; मुंबईतील भोंदूबाबा, महापालिकेच्या गार्डनमध्ये नको नको ते करायचा!
बकऱ्याचा कलेजा, स्मशान राख, लिंबू-टाचणी...; मुंबईतील भोंदूबाबा, महापालिकेच्या गार्डनमध्ये नको नको ते करायचा!
Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: ठाणे, पुणे, सोलापूरपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती
ठाणे, पुणेपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
131st Constitutional Amendment Bill: लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Narendra Mehta: 'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
Embed widget