एक्स्प्लोर

बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं

संप हा योग्य उपाय नाही, जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टानं खडसावलं, बेस्ट कामगार संघटनेनं ताबतडोब संप मागे घेत चर्चेला प्रतिसाद द्यावा, हायकोर्टात राज्य सरकारची भूमिका

मुंबई : बेस्ट कामगार कृती समितीने सोमवारी संध्याकाळपर्यंत बैठक घेऊन आपला अंतिम निर्णय घ्यावा. त्यानंतर मंगळवारी (15 जानेवारी) सकाळी राज्य सरकारनं उच्च स्तरीय समितीची बैठक आयोजित करून या बैठकीचा सीलबंद अहवाल महाधिवक्त्यांनी दुपारी 3 वाजता हायकोर्टात सादर करावा. असे निर्देश हायकोर्टाने जारी केले आहेत. अॅड. दत्ता माने यांनी बेस्टचा हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संप हा कुठल्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. सनदशीर मार्गानेही मागण्यांसाठी लढा देता येतो. विकसनशील देशात सर्वसामान्य जनतेला अश्याप्रकारे वेठीस धरणे चुकीचे आहे. या शब्दांत बेस्ट संपाबाबत कामगारांच्या भुमिकेवर हायकोर्टाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केल. शुक्रवारच्या सुनावणीनंतर तुम्ही संप मागे घेऊन कामावर रूजू व्हाल अशी अपेक्षा होती. संपावर कायम राहून तडजोडीसाठी चर्चा करणे ही भूमिका योग्य नाही. या शब्दांत हायकोर्टाने कामगारांना सुनावले. सोमवारची सुनावणी संपवण्यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना 'मेस्मा' लागू करण्याबाबत काय प्रक्रिया आहे? असा सवाल राज्य सरकारला विचारला. यावर, 'कायद्यात त्याची तरतूद आहे, अखेरीस काही मार्ग निघाला नाही तर आम्हाला नाईलाजानं कठोर भुमिका घ्यावी लागेल'. अशी माहीती राज्य सरकारने हायकोर्टात दिली. सात दिवसांचा ऐतिहासिक संप करून कामगारांनी आपला संदेश पोहचवला, सर्वच स्तरांनी त्याची दखल घेतली. यावर नक्कीच गांभीर्याने विचार होईल, मात्र आता त्यांनी कुठेतरी थांबायला हवे. बेस्टवर अवलंबून असणा-या कष्टकरी वर्गाला या संपामुळे दररोज किमान 45 मिनिट चालावी लागत आहेत, त्याचं काय? असा सवालही राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टाला विचारण्यात आला. यादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही खाजगी बसेस, एस.टी. यांना मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतोय अशी माहीतीही सरकारने हायकोर्टाला दिली. कामगारांची भुमिका मांडताना अॅड. नीता कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे की, साल 2006 पासून 50 टक्के कामगार त्याच पगारावर काम करत आहेत. बेस्टची अवजड वाहने चालवणारे कामगार आज दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. 15 हजार रुपयांच्या मासिक पगारावर मुंबईत कुंटुंबाचा गाडा कसा हाकायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कामगारांना किमान 21 हजार रुपये महिना पगार दिल्यावर बेस्टवर फक्त 160 कोटी रुपये इतकाच अतिरिक्त भार पडेल. त्यामुळे निव्वळ व्याजाचे 5 हजार कोटी कमवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला अडचण काय?, राज्य शासनाने या उपेक्षित कामगारांना तातडीने काहीतरी दिलासा द्यावा, बाकीचे मुद्दे आम्ही औद्यगिक न्यायालयात लढवण्यास तयार आहोत असा युक्तिवाद कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच बेस्टचे खाजगीकरण सुरू असल्याचा आरोप कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आला. मात्र हे सारे आरोप चुकिच्या माहीतीच्या आधारावर असल्याचे म्हणत पालिकेने ते स्विकारण्यास नकार दिला. तसेच प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरही संप मागे न घेणे म्हणजे एकप्रकारचे ब्लॅकमेलिंगच आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरून आमच्या डोक्यावर बंदूक ठेवण्याचा प्रकार आहे. असा दावा बेस्ट प्रशासनाने हायकोर्टात केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : 7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
CM Ladki Bahin: विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra : आचारसंहितेआधीच अधिकाऱ्यांचा मंत्री , सीएमओला टाटा बायबायElection Commission PC : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीची घोषणा Maharashtra Vidhan SabhaVidarbhavadi Party : संभाजीराजे आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत विदर्भवादी पक्ष सहभागीABP Majha Headlines : 9 AM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : 7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
7 आमदारांच्या शपथविधीविरोधात ठाकरे गट हायकोर्टात; निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
CM Ladki Bahin: विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपकडून लाडकी बहिणीचं जोरदार प्रमोशन, मुख्यमंत्री शब्द गायब
Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता
Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
Babar Azam On Virat Kohli: विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Embed widget