एक्स्प्लोर

बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं

संप हा योग्य उपाय नाही, जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टानं खडसावलं, बेस्ट कामगार संघटनेनं ताबतडोब संप मागे घेत चर्चेला प्रतिसाद द्यावा, हायकोर्टात राज्य सरकारची भूमिका

मुंबई : बेस्ट कामगार कृती समितीने सोमवारी संध्याकाळपर्यंत बैठक घेऊन आपला अंतिम निर्णय घ्यावा. त्यानंतर मंगळवारी (15 जानेवारी) सकाळी राज्य सरकारनं उच्च स्तरीय समितीची बैठक आयोजित करून या बैठकीचा सीलबंद अहवाल महाधिवक्त्यांनी दुपारी 3 वाजता हायकोर्टात सादर करावा. असे निर्देश हायकोर्टाने जारी केले आहेत. अॅड. दत्ता माने यांनी बेस्टचा हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संप हा कुठल्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. सनदशीर मार्गानेही मागण्यांसाठी लढा देता येतो. विकसनशील देशात सर्वसामान्य जनतेला अश्याप्रकारे वेठीस धरणे चुकीचे आहे. या शब्दांत बेस्ट संपाबाबत कामगारांच्या भुमिकेवर हायकोर्टाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केल. शुक्रवारच्या सुनावणीनंतर तुम्ही संप मागे घेऊन कामावर रूजू व्हाल अशी अपेक्षा होती. संपावर कायम राहून तडजोडीसाठी चर्चा करणे ही भूमिका योग्य नाही. या शब्दांत हायकोर्टाने कामगारांना सुनावले. सोमवारची सुनावणी संपवण्यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना 'मेस्मा' लागू करण्याबाबत काय प्रक्रिया आहे? असा सवाल राज्य सरकारला विचारला. यावर, 'कायद्यात त्याची तरतूद आहे, अखेरीस काही मार्ग निघाला नाही तर आम्हाला नाईलाजानं कठोर भुमिका घ्यावी लागेल'. अशी माहीती राज्य सरकारने हायकोर्टात दिली. सात दिवसांचा ऐतिहासिक संप करून कामगारांनी आपला संदेश पोहचवला, सर्वच स्तरांनी त्याची दखल घेतली. यावर नक्कीच गांभीर्याने विचार होईल, मात्र आता त्यांनी कुठेतरी थांबायला हवे. बेस्टवर अवलंबून असणा-या कष्टकरी वर्गाला या संपामुळे दररोज किमान 45 मिनिट चालावी लागत आहेत, त्याचं काय? असा सवालही राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टाला विचारण्यात आला. यादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही खाजगी बसेस, एस.टी. यांना मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतोय अशी माहीतीही सरकारने हायकोर्टाला दिली. कामगारांची भुमिका मांडताना अॅड. नीता कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे की, साल 2006 पासून 50 टक्के कामगार त्याच पगारावर काम करत आहेत. बेस्टची अवजड वाहने चालवणारे कामगार आज दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. 15 हजार रुपयांच्या मासिक पगारावर मुंबईत कुंटुंबाचा गाडा कसा हाकायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कामगारांना किमान 21 हजार रुपये महिना पगार दिल्यावर बेस्टवर फक्त 160 कोटी रुपये इतकाच अतिरिक्त भार पडेल. त्यामुळे निव्वळ व्याजाचे 5 हजार कोटी कमवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला अडचण काय?, राज्य शासनाने या उपेक्षित कामगारांना तातडीने काहीतरी दिलासा द्यावा, बाकीचे मुद्दे आम्ही औद्यगिक न्यायालयात लढवण्यास तयार आहोत असा युक्तिवाद कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच बेस्टचे खाजगीकरण सुरू असल्याचा आरोप कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आला. मात्र हे सारे आरोप चुकिच्या माहीतीच्या आधारावर असल्याचे म्हणत पालिकेने ते स्विकारण्यास नकार दिला. तसेच प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरही संप मागे न घेणे म्हणजे एकप्रकारचे ब्लॅकमेलिंगच आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरून आमच्या डोक्यावर बंदूक ठेवण्याचा प्रकार आहे. असा दावा बेस्ट प्रशासनाने हायकोर्टात केला.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget