एक्स्प्लोर

ऊस दरावरुन यावेळी आम्ही संघर्ष टाळला : राजू शेट्टी

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती.

सांगली : शेतकरी संतप्त व्हावा म्हणून काही शक्ती प्रयत्न करत आहेत. यावेळी सुद्धा साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यामध्ये बोलणी होऊ नये, एकमेकांची त्यांनी डोकी फोडावीत, अशा प्रकारचे प्रयत्न झाले. पण प्रयत्न केले त्यांच्या बाजूने शेतकरी नव्हते. साखर कारखानदारांनी यंदा शहाणपणाने शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेचा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळे ऊस दरावरून यंदा संघर्ष टळला, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ऊस दरासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आलं आहे. ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती. या बैठकीनंतर राजू शेट्टी एबीपी माझाशी बोलत होते. ऊस दरावरुन यंदा संघर्ष टाळला आहे. रघुनाथ पाटील बैठकीला होते, पण तो दर मान्य करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला हा दर पटला, तो आम्ही मान्य केला. पण जर त्यांच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना अजून वाढीव दर मिळणार असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे असे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी रघुनाथ पाटील यांना टोला लगावला. ''शरद पवारांचे काही चिमटे जीवघेणे, तर काही गुदगुल्या करणारे'' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच चिमटे काढत असतात. यातील काही चिमटे जीवघेणे असतात आणि काही चिमट्यांनी गुदगुल्या होतात. पण शेतकरी आंदोलन म्हणजे साखर कारखानदारी मोडीत काढायला उभी केलेली आंदोलनं असं त्यांचं आजपर्यंत मत होतं. यावेळी मात्र त्यांनी साखर कारखानदारांना कार्यपद्धती सुधारा, नाहीतर टिकणं अवघड होईल, असा इशारा दिला. म्हणजे आमची संघटना जो विचार मांडतेय तो कुठेतरी पवार साहेबांना पटतोय आणि आमच्या संघटनेचा विचार त्यांना पटायला लागलाय असे दिसत आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. ''गुजरातच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार'' गुजरातमधल्या शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय झाला आहे. विकासाचं खोटं मॉडेल उभारत असताना तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे गुजरातमधील निवडणुकीत जर एखादा शेतकरी नेता शेतकऱ्यांच्या बळावर निवडणूक लढवत असेल तर त्याच्या प्रचाराला मी जाईन आणि एक शेतकरी नेता म्हणून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असं राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित बातमी : ऊसाला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी, कोल्हापुरातील बैठकीत निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget