एक्स्प्लोर

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता

पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.

मुंबई : मागील एक महिन्यांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण अजून काही दिवस पोलिसांच्या बदल्या न करण्यासाठी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांचे राज्य सरकारला पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. तसच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून येणाऱ्या शिफारसींमुळे ही पोलिस महासंचालक जयसवाल नाराज असल्याच कळतय. म्हणजे पुन्हा पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.

राज्यातील आयपीएस आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुदत 15 ऑगस्ट पर्यंत होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून गणेशोत्सवापर्यंत बदल्या नाही कराव्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याची परिस्थिती सरकारवर येऊ शकते.

तसेच जिल्ह्यातील एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत पोलिस महासंचालकांनी आपल्या बदलीसाठी शिफारस करू नये तसेच लॉबिंग करू नये असे सुद्धा सूचना सुबोध जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, अनेक बडे पोलिस अधिकारी देखील आवडत्या पोस्टिंगसाठी लॉबिंग करत आहेत ज्यामुळे पोलिस महासंचालक नाराज असल्याच कळतय. या नाराजीमुळे गृहमंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक असा संघर्ष भविष्यात पाहिला मिळणार का असा प्रश्न ही उपस्थित केली जातोय. एका पोलिस अधिकाऱ्यांनी एबीपी माझा ला माहिती दिली की ‘पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे की, शिफारस नव्हे तर रुल बुक प्रमाणेच बदल्या करणायत येतील. ज्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपला आहे त्यांची बदली करण्यात येईल तर शासनाच्या आदेशनुसार नवीन नियुक्ती करण्यात येतील’

पोलिस दलात नेहमीच अधिकाऱ्यांकडून पोस्टींग साठी राजकीय दबाव किंवा शिफारस आणल्या जातात आणि त्यामुळे बदल्यांच या रेस नेहमी तोच अधिकारी बाजू मारतो ज्याला पोलिटिकल बैकिंग असत. काही दिवसांपूर्वी मुंबई उपआयुक्तांच्या बदल्या दोन दिवसातच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील या बदल्यांना घेऊन आपसात चर्चा न झाल्याचं समोर आलं होतं. या बदल्या करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिस महासंचालकांनी स्वत:च सप्टेंबर पर्यंत बदल्या न करण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारला दिलं आहे. येणाऱ्या दिवसात अनेक सन आहेत आणि या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर बदल्यामुळे तेथील पोलिस व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो असे कारण पोलीस महासंचालकांकडून देण्यात आला आहे.

पोलिस महासंचालकांच नेमक मत काय आणि कसा परिणाम होऊ शकतो. येणारा दिवसांमध्ये गणेशोत्सव आणि इतर मोठे सण आहेत.सध्या कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची वेवस्तीत माहिती आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला ही माहिती नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या बदल्यात काही दिवसांसाठी स्थगित करण्याची मागणी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी केली आहे. विरोधकांकडून मात्र यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत, भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर समन्वय नसल्याचा आरोप करत म्हणाले ‘सरकारचा आपसात जमत नाही आणि या नेत्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात हवा आहेत म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे.’

Police Transfer : गणेशोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत- DGP जायस्वाल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget