एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या

हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं म्हणत आडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

उस्मानाबाद : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरात सातत्याने घसरण होत आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं म्हणत अडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शुक्रवारची ही घटना आहे. दत्तात्रय गुंड असं या 32 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. तरुण अडत व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्यावर्षी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला 800 क्विंटल हरभरा पडून असल्याचंही दत्तात्रय गुंड यांनी म्हटलं आहे. दत्तात्रय गुंड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. ''सर्व व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. म्हणून तर त्या दोघांत भांडणे लावून आपण पाहत बसला आहात. आतापर्यंत व्यापार्‍यांनीच तारल्यामुळे शेतकरी जिवंत होता. नुकतेच जीवन चालू झाले होते. तुमच्या सरकारी धोरणाने आणि दुष्काळाने ते संपवलं आहे. आपल्या धोरणामुळे हा शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करुन शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा,'' असं गुंड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या दरम्यान, या चिठ्ठीत गुंड यांनी अत्यंत भावनिक शब्दात माफी मागितली आहे. ''सरकारची धोरणे, खासगी कर्ज आणि त्याच्या व्याजाला कंटाळून आत्महत्या करत आहे. कुटुंबीयांना त्रास देऊ नये,'' असंही दत्तात्रय गुंड यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सधन असताना डोक्यावर वाढलेला कर्जाचा ताण आणि शासनाच्या धोरणाचा फटका आपल्या मुलाला अशा वाईट निर्णयापर्यंत घेऊन गेला, याचे दुःख सरपंच असलेल्या त्यांच्या आईला लपवता आलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या दत्तात्रय गुंड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. या प्रकरणातील सावकार शोधून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गुंड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 वी पेपरफुटी प्रकरण! नागपूर पोलिसांकडून ट्युशन क्लासशी संबधीत आणखी दोन जणांना अटक, व्हॉट्सॲप वर पाठवला होता पेपर
12 वी पेपरफुटी प्रकरण! नागपूर पोलिसांकडून ट्युशन क्लासशी संबधीत आणखी दोन जणांना अटक, व्हॉट्सॲप वर पाठवला होता पेपर
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
शक्तिपीठचा मुद्दा तापला, एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसोबत वादावादी
शक्तिपीठचा मुद्दा तापला, एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसोबत वादावादी
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत पटेल, तटकरेंना माहिती होती,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, अजितदादांसोबतच्या बैठकीचा दाखला दिला  
अजितदादा म्हणालेले एक आमदार सोडून सर्वजण मी सांगेल तिथं सही करतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
Embed widget