दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. राज्यात 18 जिल्ह्यात 1 हजार 165 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा, सरपंचाची थेट जनतेमधून निवड होणार, सत्तांतराचा काय परिणाम होणार याची उत्सुकता


राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान  (Maharashtra Gram Panchayat Election)  होणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी (Sarpancha) आज मतदान (Voting) होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.


2. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर रात्री उशिरापर्यंत खलबतं, अंधेरी पोटनिवडणूक, पोलिसांच्या बदल्यांसह विविध मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती


3. अंधेरी पोटनिवडणुकीत आक्षेपांची मालिका, मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचा आक्षेप तर लटकेंच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवारांचं बोट, शिंदेंच्या चिन्हावरही शीख समाजाचा दावा


4. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, भाजपचे दहा आमदार तयारीसाठी तैनात, तर अंधेरीत मविआ कार्यकर्त्यांचा मेळावा


5. दोन महिन्यात तिसऱ्यांदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट, आरोग्य विषयावरील चर्चेसाठी बैठक झाल्याची माहिती, शिंदे-राज यांच्या स्वतंत्र बैठकीचीही चर्चा


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2022 : रविवार 



6. मुंबईत डोळे येण्याची साथ, 15 दिवसांत  अडीचशे ते तीनशे रुग्णांची नोंद, लक्षणं जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचं आवाहन


7. दिवाळीआधी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका, गुजरात वगळता अमूल दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महागलं


8. दिवाळीआधी खरेदीसाठी शेवटचा रविवार, बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता, निर्बंधमुक्त दिवाळीमुळे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांमध्येही उत्साह


9. शी जिंगपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणं निश्चित, सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या 20व्या अधिवेशनात होणार शिक्कामोर्तब


10. आजपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात; पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नामीबिया यांच्यात रंगणार 


आजपासून आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला (ICC T20 World Cup 2022) सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आज श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात रंगणार आहे. आजपासून पहिल्या फेरीला सुरुवात होणार असून या फेरीचा शेवटचा सामना 21 ऑक्टोबरला होईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत पाहायला मिळणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धेत 16 संघामध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. टी 20 विश्वचषकातील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.