एक्स्प्लोर
Advertisement
भाऊबीजेला जाताना महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू
माया शिवाजी चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तासगाव शहरातील गणपती मंदिर परिसरात दुचाकीवरून धनंजय शिवाजी चव्हाण व त्यांची आई माया शिवाजी चव्हाण हे दोघे भाऊबीज सणासाठी विटा शहराकडे जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
सांगली: सांगलीतील तासगाव शहरात भाऊबीजेसाठी जात असलेल्या एका महिलेचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे घसरून बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
माया शिवाजी चव्हाण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तासगाव शहरातील गणपती मंदिर परिसरात दुचाकीवरून धनंजय शिवाजी चव्हाण व त्यांची आई माया शिवाजी चव्हाण हे दोघे भाऊबीज सणासाठी विटा शहराकडे जात होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
गणपती मंदिरजवळ नगरपालिकेच्या ड्रेनेजच्या खड्डयावर काही लोकांनी नारळाचे फड फेकले होते. त्या खड्ड्यात चव्हाण यांची गाडी आदळली व घसरली. यावेळी माया कदम गाडीवरून खाली पडल्या, त्याचवेळी मागून आलेल्या बसखाली माया शिवाजी चव्हाण चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रस्त्यावरील खड्ड्यांकडे तासगाव पालिका, स्वच्छता कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे एका महिलेच्या जीवावर बेतले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion