एक्स्प्लोर

TET EXAM SCAM : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

TET EXAM SCAM : टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

TET EXAM SCAM : टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे.  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या दिवसापासून त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्ण  अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, टीईटी परीक्षेमध्ये आर्थिक गैरव्यवहार त्यासोबतच निकालाचा फेरफार झाल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होते, त्याच जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रीतिश देशमुख याला सुद्धा अटक केल्यानंतर या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला, त्याची संपूर्ण चौकशी शिक्षण विभागाने गठित केलेल्या समितीकडून केली जाणार आहे. 

तुपे यांच्या निलबंणाचा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे काम पाहतील.  त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार 16 डिसेंबर 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली आहे.  सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोण आहेत तुकाराम सुपे?

तुकाराम सुपे मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी गावचे आहेत. गावात त्याकाळात शाळा नसताना शेजारच्या वाडा गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ते पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. 
शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शिक्षण खात्यात रुजू झाले.
 
पण शिक्षण खात्यातील तुकाराम सुपेंची शिक्षण विभागातील कारकीर्द ही नेहमीच वादग्रस्त राहिलीय . याआधी अनेकदा तुकाराम सुपेंवर कारवाईचा बडगा उगारला गेला. मात्र प्रत्येकवेळी ते नोकरीत परतून महत्वाच्या पदावर रुजू होण्यात यशस्वी ठरले . 


2013 साली तुकाराम सुपे नाशिकचे शिक्षण उपसंचालक असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देऊन संस्था चालकांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर फोउजदारी गुन्हा नोंद झाला होता. 


त्यानंतर सुपे पुण्यात दाखल झाले आणि 2014 साली  पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बनले. पण इथेही त्यांनी बाजारात शंभर रुपयांना मिळणारी कुंडी एकाच दुकानदारांकडून अकराशे रुपयांना खरेदी करण्याची सक्ती पुण्यातील शाळांना केली होती . त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन पुण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सुपेंना पदावरून कार्यमुक्त केलं होतं. 


खाजगी शाळांच्या फी वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुपेंची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिली.
 
2016 साली सुपे पुण्यात एस एस सी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष म्हणून रुजू झाले.
 
 एक जानेवारी 2018 ला त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले . 


 त्यानंतर सुपेंनी खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याची कामे देण्याचा सपाटा लावला . 


त्यातूनच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या ए जी टेक्नॉलॉजी कंपनीला त्यांनी ब्ल्याकलिस्टच्या यादीतून बाहेर काढले आणि जुलै 2020 मध्ये त्या कंपनीला टी ई टी ची परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget