एक्स्प्लोर

TET EXAM SCAM : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

TET EXAM SCAM : टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

TET EXAM SCAM : टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे.  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या दिवसापासून त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्ण  अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, टीईटी परीक्षेमध्ये आर्थिक गैरव्यवहार त्यासोबतच निकालाचा फेरफार झाल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होते, त्याच जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रीतिश देशमुख याला सुद्धा अटक केल्यानंतर या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला, त्याची संपूर्ण चौकशी शिक्षण विभागाने गठित केलेल्या समितीकडून केली जाणार आहे. 

तुपे यांच्या निलबंणाचा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे काम पाहतील.  त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार 16 डिसेंबर 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली आहे.  सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोण आहेत तुकाराम सुपे?

तुकाराम सुपे मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी गावचे आहेत. गावात त्याकाळात शाळा नसताना शेजारच्या वाडा गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ते पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. 
शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शिक्षण खात्यात रुजू झाले.
 
पण शिक्षण खात्यातील तुकाराम सुपेंची शिक्षण विभागातील कारकीर्द ही नेहमीच वादग्रस्त राहिलीय . याआधी अनेकदा तुकाराम सुपेंवर कारवाईचा बडगा उगारला गेला. मात्र प्रत्येकवेळी ते नोकरीत परतून महत्वाच्या पदावर रुजू होण्यात यशस्वी ठरले . 


2013 साली तुकाराम सुपे नाशिकचे शिक्षण उपसंचालक असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देऊन संस्था चालकांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर फोउजदारी गुन्हा नोंद झाला होता. 


त्यानंतर सुपे पुण्यात दाखल झाले आणि 2014 साली  पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बनले. पण इथेही त्यांनी बाजारात शंभर रुपयांना मिळणारी कुंडी एकाच दुकानदारांकडून अकराशे रुपयांना खरेदी करण्याची सक्ती पुण्यातील शाळांना केली होती . त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन पुण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सुपेंना पदावरून कार्यमुक्त केलं होतं. 


खाजगी शाळांच्या फी वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुपेंची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिली.
 
2016 साली सुपे पुण्यात एस एस सी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष म्हणून रुजू झाले.
 
 एक जानेवारी 2018 ला त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले . 


 त्यानंतर सुपेंनी खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याची कामे देण्याचा सपाटा लावला . 


त्यातूनच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या ए जी टेक्नॉलॉजी कंपनीला त्यांनी ब्ल्याकलिस्टच्या यादीतून बाहेर काढले आणि जुलै 2020 मध्ये त्या कंपनीला टी ई टी ची परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget