एक्स्प्लोर

Student Suicide: 'पप्पा, साधी एक परीक्षा पास नाही होऊ शकत, मला माफ करा' म्हणत औरंगाबादमध्ये तरुणीनं संपवलं जीवन

औरंगाबादमध्ये सुसाईड नोट लिहीत तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी काकडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.

Student Suicide in Aurangabad : औरंगाबादमध्ये रेडिओलॉजिस्टचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणीनं सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. वैष्णवी काकडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. पप्पा, साधी एक परीक्षा मी पास होऊ शकत नाही, मला माफ करा' असं म्हणत तरुणीनं जीवन संपवलं आहे. 

औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयात बीएस्सी रेडिओथेरपीच्या तिसऱ्या वर्गात वैष्णवी शिक्षण घेत होती. वैष्णवीनं रेडिओलॉजिस्ट व्हावं असे तिच्या शेतकरी वडिलांचे स्वप्न होते. मात्र, अभ्यासात मागे पडत असल्यानं पित्याचे स्वप्न साकारु शकत नाही, असे तिला वाटू लागले. त्यामुळं तिने गळफास घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने आपल्या पित्याला चिठ्ठी लिहिली आहे.

वडिलांना लिहलेल्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलंय.
 
पहिले तर मी तुम्हाला Sorry म्हणते खूप खूप चुकीचा निर्णय घेतलाय मी, पण  काय करणार खूप गरजेचा होता. खूप काही सहन केल होतं मी या मागच्या 3 वर्षापासून. तुम्ही मला बाहेर शिकायला पाठवलं. खूप पैसे पण लावले. जुम्ही तिकडे रात्रंदिवस शेतात काम करता आणि मी साधी एक परिक्षा पास नाही होऊ शकत. आता पण जे पेपर झाले त्यामध्ये पण मला काहीच लिहता आलं नाही. खूप वाईट वाटलं होतं मला. मी खूप प्रयत्न केले. अभ्यास करायचा पण नाही जमलं मला. खूप विश्वास होता ना पप्पा तुम्हाला माझ्यावर, पण मी विश्वासच तोडला तुमचा. तुम्हाला सोडून जाते आज. खूप दुःख होत रे पप्पा पण काय करू विलाज नाही काही माझ्याजवळ. हे सर्व सोडून घरी पण आले असते पण, अपमान सहन नव्हला होत. मी आज शेवटचा निर्णय घेऊन टाकला. मी माझ्या मनानं आत्महत्या करु लागल्याचे चिठ्ठीत लिहले आहे. 

माझ्या आत्महात्येमागं काहीही कारण नाही आणि कोणाचा हातपण नाही. मलाच माझ्या जीवनाचा कंटाळा आला होता, म्हणून मी आत्महत्या करु लागले. रात्रंदिवस तोच तान होता. पास होईल का नापास होईल, रात्र रात्र झोप येत नव्हती. रात्र रात्र असं वाटत होत घरचे एवढे करतात आपल्यासाठी आपण काय करतो. रात्रंदिवस रडत होते पप्पा. कधीकधी तर अस वाटायचं सर्व काही  माझ्याजवळ तरी पण...

मी माझ्या मनान मरत आहे तरी माझ्या मरणाला कोणालाही जिम्मेदार धरु नका.  Sorry पप्पा  मी आज तुम्हाला सोडून चालले. इच्छा तर होत नाही तुम्हाला सोडून जाण्याची पण काय करु मजबुरी आहे माझी. मी खूप जास्त दुखी  होते पप्पा आज. आज माझा पूर्ण जीवन हरवून गेलं पप्पा. मला आज खूप जास्त आठवण येत होती तुमची. तरी तुम्ही मला सकाळी कॉल केला, तर खूप छान वाटल मला. पप्पा तुम्ही तुमची आणि मम्मीची काळजी घ्या. आता जास्त चिडचीड नका करत जाऊ घरामध्ये. साक्षीचं लग्न करुण टाका, माझ्या लग्नाचे पैसे पण तिच्या लग्नाला लावा. तिला छान मुलगा बघा. कस सांगू पप्पा तुम्हाला आता माझ्या एका चुकीन माझी पूर्ण लाईफ बदलून टाकली. मी खूप दुःखी केलं पप्पा आज. पण, काय करु अस काही वाटलच नव्हत अशी  वेळ येईल माझ्यावर. मला माफ पप्पा. 

पप्पा तुमचा माझावर खूप जीव होता. खूप रडले पप्पा मी. या चार वर्षात पण तुम्हाला कधी दुःख दाखवल नाही. पण मी खूप त्रास सहन केला. पण आता सहन होत नाही म्हणून मी अस करते. मी खूप मोठी चुक केली. माझ्या  शिक्षकाला आणि पप्पा  तुम्हाला खूप दु:ख  होणार आहे. माझा ताण घेऊ नका पप्पा तुमची काळजी घ्या. मम्मीची पण काळजी घ्या. मी तर नाही केलं स्वप्न पूर्ण पण सार्थक नक्की करेल. कारण मला तेवढा विश्वास आहे. पप्पा सार्थक खूप लहान आहे अजून. तुम्हाला एकच विनंती करते. तुम्ही शेतावरून लोकाला भांडत नाका जाऊ नका, जेव्हा तुमचे भांडण होतं लोकांसोबत तेव्हा खूप जास्त भिती वाटते. तुम्हाला बोलायची हिंमत नाही. साक्षीचं लग्न करुन टाका. चांगला मुलगा पाहून. खूप काही लिहायचं होत पप्पा. अजून पण काही कळतच नव्हतं. जाता वेळेस एवढंच सांगून जाते पप्पा मला माफ करा.

तुमची राणी 

अशी सुसाईड नोट तिने वडिलांनी लिहली आहे. यामध्ये तिने का आत्महत्या केली याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तसेच माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरु नका असेही तिने म्हटले आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget