एक्स्प्लोर

दहावीच्या गुणपत्रकावरुन 'नापास' शेरा हद्दपार!

मुंबईः दहावीच्या गुणपत्रिकेवरील ‘नापास’ किंवा अनुत्तीर्ण हा शेरा आता कायमचा पुसला जाणार आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी 'पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.   जुलैमध्ये झालेल्या फेर परीक्षेच्या गुणपत्रकांवर हे नवे शेरे देण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेले आणि एटीकेटीची सवलत घेऊन अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 18 हजार आहे.  39 हजार 994 विद्यार्थी या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झाले आहेत.   काय आहे नवीन नियम?   दहावीच्या गुणपत्रकावरून यापुढे ‘नापास’, ‘अनुत्तीर्ण’ किंवा ‘फेल’ हे शब्द कायमचे हद्दपार करण्यात आले आहेत. नव्या शेऱ्यांनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘उत्तीर्ण’ असा शेरा येणार आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर एटीकेटी सवलतीसह अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा येणार आहे.   नियमित परीक्षेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी दोन पेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले असतील तर त्यांच्या गुणपत्रकावर ‘फेर परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा येणार आहे. फेर परीक्षेत तीन पेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘फक्त कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ असा शेरा येणार आहे.   काय होईल फायदा?   या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल, मात्र अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ते पात्र ठरणार नाहीत. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा 18 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्यातून 1 लाख 42 हजार 968 विद्यार्थी बसले होते. त्यातील 39 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 27.97 एवढी आहे.   या परीक्षेत 78 हजार 153 विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाली. शासनाच्या या नियमामुळे 1 लाख 18 हजार 147 विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे 14 हजार 332 विद्यार्थी हे फक्त कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे.   विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास किंवा अनुत्तीर्ण असे लिहिले जाणार नाही. मात्र, त्यामुळे ज्या ठिकाणी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता असेल तेथे गोंधळ होऊ शकतो. त्या पाश्र्वभूमीवर एटीकेटी मिळालेल्या किंवा कौशल्य विकासासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास असे लिहिले जाणार नसले तरीही या दोन शेऱ्यांचा अर्थ नापास असाच गृहीत धरण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget