एक्स्प्लोर

ओबीसीमधील काही मंडळी आरक्षणाच्या विरोधात : मराठा क्रांती ठोक मोर्चा

आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने बलिदान दिले असून जर असा प्रयत्न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला हीच राजकीय मंडळी जबाबदार असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

ठाणे : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणत्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळालेलं आहे. ओबीसीमधील 361 जातींचा देखील या आरक्षणाला पाठिंबा आहे. असे असताना काही राजकीय मंडळी या आरक्षणाला विरोध करण्यासाठी मूठभर लोकांना हाताशी धरून आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला आहे. आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने बलिदान दिले असून जर असा प्रयत्न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला हीच राजकीय मंडळी जबाबदार असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजूरी मिळाली असल्याने मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रात जल्लोष देखील करण्यात आला. सरकारने दिलेले आरक्षण हे टिकणारे आरक्षण असल्याचा विश्वास देखील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या आरक्षणाच्या विरोधात काही राजकीय मंडळी मूठभर लोकांना हाताशी धरून याचिका टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पदाधिकाऱ्यांना आहे. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या समाजाने 25 ते 30 वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला. साडेचौदा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे. 42 लोकांनी बलिदान दिले आहे तर आतापर्यंत 59 मोर्चे तर दोन ठोक मोर्चे काढण्यात आले आहेत. कोणत्याही जातीच्या आणि धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळावे अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे.  सरकारने देखील त्याच पद्धतीने आरक्षण दिले असताना मात्र ओबीसीमधील काही ठराविक मंडळी या आरक्षणाला जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. जर आरक्षणाबाबत काही आक्षेप असतील तर या घटकांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.   सामाजिक बांधिलकी समजून या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करून नये असे देखील आवाहन त्यांनी केले आहे. हे आरक्षण टिकावे यासाठी बार कौन्सिलला देखील पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जर असे प्रकार जाणूनबुजून केल्यास महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला हीच मंडळी जबाबदार असतील असा इशारा देखील त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Sudhir Mungantiwar: सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला; असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये; सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला; असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये; सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget