एक्स्प्लोर

ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले

Sanjay Raut on Giriraj Singh: संपादकीयात विचारले आहे की, त्यांच्या मते सर्व मुसलमान 'नमक हराम' आहेत, तर त्यांच्यासाठी काही ठोस योजना त्यांच्याकडे आहे काय?

Sanjay Raut on Giriraj Singh: संरक्षण खात्यातील गुपिते शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पुरवणाऱ्या लोकांना अटक झाली व त्यांचा संघाशी संबंध उघड झाला, तरी अशा 'नमक हरामांच्या' पाठीशी गिरीराजसारखे लोक उभे राहतात, याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दात सामनातून भाजप नेते गिरीराज सिंह  यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. मोदींनी ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती नमक हरामी म्हणायची? अशी विचारणा सामनातून करण्यात आली आहे. 

आम्हाला नमक हरामांची मते नकोत

सामनातून म्हटलं आहे की, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नेहमीप्रमाणेच मुस्लिम समुदायावर 'घाणेरड्या पद्धतीने' वक्तव्य केले आहे. गिरीराज सिंह यांची वक्तव्ये हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करणारी असतात. बिहार निवडणुकीच्या प्रचारात गिरीराज सिंह म्हणाले होते की, 'आम्हाला नमक हरामांची मते नकोत.' (येथे 'आम्ही' म्हणजे भाजप). मुस्लिम नागरिक सरकारच्या सर्व योजनांचे लाभ घेतात, पण भाजपला मतदान करीत नाहीत, म्हणून ही 'नमक हरामी' आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गिरीराज सिंह यांचे हे विधान भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, कारण सरकारच्या योजना देशातील सर्व जनतेसाठी असतात, विशिष्ट जात-धर्मासाठी नसतात, हे त्यांनी समजून घ्यावे. संपादकीयात विचारले आहे की, त्यांच्या मते सर्व मुसलमान 'नमक हराम' आहेत, तर त्यांच्यासाठी काही ठोस योजना त्यांच्याकडे आहे काय?

नमक हराम' म्हणणे हा भाजपवाल्यांचा छंद 

संपादकीयमध्ये पुढे म्हटलं आहे की, मोदी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने (गिरीराज सिंह) देशातील 20 कोटी मुस्लिम नागरिकांना 'नमक हराम' म्हटले आहे. भारतात 20-22 कोटी मुसलमान आहेत आणि ते देशाचे अधिकृत नागरिक आहेत. मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरला आणि अनेक मुस्लिम क्रांतिकारक फासावर गेले. मुसलमानांना 'नमक हराम' म्हणणे हा भाजपवाल्यांचा छंद आहे. तालिबान्यांना बळ देणारे (मोदी सरकार) भारतातील मुसलमानांना 'नमक हराम' म्हणतात, असा टोला संपादकीयात लगावला आहे.

नरेंद्र मोदी आणि भाजपचे राजकारण

नरेंद्र मोदी अनेकांची शाळा घेतात, पण गिरीराज सिंह यांच्यासारख्यांची शाळा ते घेऊ शकत नाहीत. कारण मोदी यांनाच ही अशी धर्मांध आणि बेताल वक्तव्ये केलेली हवी आहेत. गोध्रा कांडातून ज्यांची राजकारणाची दौड सुरू झाली, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा सवाल मोदींना उद्देशून विचारला आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या मंत्र्याने २० कोटी मुस्लिम नागरिकांना 'नमक हराम' म्हटले आहे, हे मान्य आहे काय? भाजपचे राजकारण हिंदू-मुसलमानांतील तेढ आणि वैर यावर अवलंबून आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचे या लोकांना वावडे आहे.

केंद्र सरकारी योजनांचा पैसा हा जनतेच्या करातून 

'ऑपरेशन सिंदूर' सुरू करूनही बदला पूर्ण होण्याआधीच प्रे. ट्रम्प यांनी व्यापार बंद करण्याची धमकी दिल्यामुळे मोदींनी पाकिस्तानविरुद्धचे युद्ध थांबवले, यास कोणत्या प्रकारची 'नमक हरामी' म्हणायची, असा प्रश्न गिरीराज सिंह यांना विचारण्यात आला आहे. केंद्र सरकारी योजनांचा पैसा हा जनतेच्या करातून आलेला पैसा आहे, तो भाजपच्या तिजोरीतला पैसा नाही. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यासाठी कोणताच लढा दिला नाही.

हिंदू एक नंबरचे 'नमक हराम' म्हणावे लागतील

पुढे म्हटले आहे की, ज्यांच्याविरोधात दहशतवादी म्हणून हंबरडा फोडला त्या अफगाण-तालिबान्यांसाठी दिल्लीत पायघड्या घालण्याचे काम काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने केले. तालिबान्यांना बळ देणारे भारतातील मुसलमानांना 'नमक हराम' म्हणतात. मुस्लिम नागरिक सरकारी योजनांचे लाभ घेतात, पण भाजपला मतदान करीत नाहीत, म्हणून ते 'नमक हराम' आहेत, असे गिरीराज सिंह यांचे मत आहे. संपादकीयात या तर्काला आव्हान देताना विचारले आहे की, सर्व हिंदू भाजपला मतदान करतात, या भ्रमात गिरीराज सिंह आहेत काय?

प. बंगाल, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा अशा राज्यांतील हिंदू लोकांनी भाजपला मतदान केले नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बहुसंख्य हिंदूंनी भाजपविरोधात मतदान केले. महाराष्ट्रातला शेतकरी (जो हिंदू आहे) भाजपच्या विरोधात आहेच. याच तर्कानुसार, हे सर्व हिंदू एक नंबरचे 'नमक हराम' म्हणावे लागतील, कारण ते केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतात व भाजपला मते देत नाहीत. सर्व हिंदूंना गिरीराज सिंह फासावर लटकवणार आहेत काय, असा उपरोधिक सवाल संपादकीयात विचारला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Embed widget