एक्स्प्लोर

आधी ‘रेरा’ आणि आता ‘जीएसटी’... गृह प्रकल्पांचा वेग मंदावला!

पुणे : बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आलेला ‘रेरा’ कायदा आणि केंद्र सरकारने नव्यानं लागू केलेला जीएसटी यांचा थेट परिणाम आता बांधकाम व्यवसायावर होताना पहायला मिळतो आहे. ‘रेरा’अंतर्गत बिल्डरांना अनेक निर्बंध पाळावे लागणार आहेत, तर जीएसटी आल्यानंतरही महापालिकांचा एलबीटी कायम असल्यामुळे घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एका बाजूला बिल्डर आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक अशा दोघांसाठीही अडचणी उभ्या राहिल्याचंच चित्र दिसून येतं आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून रेरा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत प्रकल्प पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेची हमी देणं, त्या वेळेत तो पूर्ण नाही झाला तर होणारी दंडात्मक कारवाई अशी टांगती तलवार बिल्डरांवर आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गृह प्रकल्पांच्या बांधणीचा वेग ही मंदावला आहे. कुठल्या शहरावर किती परिणाम?
  • देशातल्या आठ प्रमुख शहरांमध्ये नव्या प्रकल्पांच्या बांधकामात 41 टक्के घट
  • चेन्नई वगळता इतर महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये बांधकाम व्यवसायाला नोटाबंदी आणि ‘रेरा’चा फटका
  • मुंबईत नवीन प्रकल्पांच्या उभारणीत 36 टक्के घट 
  • दिल्ली एनसीआरमध्ये 73 टक्क्यांची घट
  • अहमदाबादमध्ये नवीन प्रकल्पांचं प्रमाण 79 टक्के घटलं
दुसरीकडे दिवसेंदिवस महाग होत चाललेली घरं जीएसटी नंतरही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच जात असल्याचं स्पष्ट होत आहे. गेली तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्पन्न मिळावं या हेतूने घरं आणि जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर अतिरिक्त अधिभार म्हणून एलबीटी आकारला जातो आहे. नवीन कर रचनेनुसार बारा टक्के जीएसटी आल्यानंतर एलबीटी रद्द होणं अपेक्षित आहे. पण राज्य सरकारची अधिसूचना नसल्यामुळे एलबीटी रद्द झालेला नाही हे सध्याचं वास्तव आहे. पुण्याच्या अवधूत लॉ फाऊंडेशनकडून याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. घरं आणि जमीन खरेदी व्यवहारांवर पूर्वी साडेचार टक्के सेवाकर तर एक टक्के व्हॅट आकारला जात होता. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना महसूल मिळावा या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पासून एक टक्के एलबीटीचा भार ही ग्राहकांवर देण्यात आला. आता जीएसटीमुळे हे ओझं दुप्पट झालेलं दिसतं आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम व्यवसायाला आलेली मरगळ सर्वज्ञात आहे. तशातच मोठ्या म्हणजे टू किंवा थ्री बीएचके प्रकारातल्या घरांची मागणीही कमी होताना दिसते आहे. त्याचाच परिणाम म्हणून वन बीएचके किंवा लहान घरांच्या प्रकल्पांकडेच व्यावसायिक पुन्हा वळताना दिसत आहेत. पण असं असलं तरी घर अजून सामान्यांच्या आवाक्यात नाहीत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget