एक्स्प्लोर

दहावी नापासांकडून शाळांचं मूल्यमापन, 'असर' अहवालाचं धक्कादायक वास्तव

असर अहवाल नेमका कसा तयार केला जातो. हा अहवाल तयार करत असताना ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी संरपंचांची परवानगी घेतली जाते का? किंवा शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांची परवानगी असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सोलापूरमधील शाळेत जाऊन रणजितसिहं यांनी असर अहवालाचं वास्तव मांडण्याच प्रयत्न केला.

मुंबई : देशातील आणि राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आढावा घेणाऱ्या 'असर 2018' अहवालाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. मात्र असर अहवाल कसा तकलादू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी केला आहे. असर अहवाल नेमका कसा तयार केला जातो. हा अहवाल तयार करत असताना ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी संरपंचांची परवानगी घेतली जाते का? किंवा शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांची परवानगी असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सोलापूरमधील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शाळेत जाऊन असर अहवालाचं वास्तव मांडण्याच प्रयत्न केला. सर्वेक्षण केवळ कागदावरच? सोलापूरच्या एका शाळेतील मुख्याध्यापकांशी रणजितसिंह यांनी चर्चा केली आणि त्यांच्या शाळेत नेमकं सर्वेक्षण कसं झालं याची माहिती घेतली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. असरचे एक प्रतिनिधी सागर सुतार या शाळेत सर्व्हेक्षणासाठी आले होते. मात्र त्यांच्याकडे गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यापैकी कोणाच्याही परवानगीचे पत्र नव्हते. सरपंचांनी आपल्याला परवानगी दिल्याचं असरच्या प्रतिनिधींनी सांगितलं. सरपंचांनी मात्र आपण अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र विद्यार्थ्यांची तपासणी होणार आहे आणि उद्देश चांगला आहे, असं समजून मुख्याध्यापकांनी असरच्या प्रतिनिधीला सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली. विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंबधीची कोणतीही प्रश्नपत्रिका या प्रतिनिधीकडे नव्हती. उलट आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतो आणि शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती तपाण्यासाठी शाळेत आल्याचं असरच्या प्रतिनिधीने सांगितलं.
‘असर’चा अहवाल प्रसिद्ध, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम
मुख्याध्यापकांनी अखेर पालकांना विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितलं. घरी जाऊन तपासणी करणार नाही, असं असरच्या प्रतिनिधीनं स्पष्ट केलं. त्यावेळी नेमकं सर्वेक्षण कसं होणार असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आणि केवळ कागदावर हे सर्वेक्षण केलं जातं का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दहावी नापासांकडून शाळांचं सर्वेक्षण दुसऱ्या एका शाळेत असरने चक्क दहावी नापास असलेला प्रतिनिधी पाठवला होता. याबाबत सांगताना त्या शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी सांगितलं की, ज्यावेळी असरचे प्रतिनिधी आमच्या शाळेत आले त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी असरबाबत माहिती शाळेला दिली आणि शाळेचं मुल्यांकन सुरु झालं. मुल्यांकन सुरु असताना या शिक्षकाने सहज असरच्या प्रतिनिधीला त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी आपण दहावी नापास असल्याचं सांगितलं. यावरुन असे प्रतिनिधी शाळांच सर्वेक्षण कसं करणार? आणि शाळांचा योग्य अहवाल समोर येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Embed widget