एक्स्प्लोर

Raju Shetti :  कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग ते शेतकऱ्यांचं 15 हजार कोटींचं नुकसान, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल 

महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आता पाळायला तयार नाहीत असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे.

Raju Shetti : महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आता पाळायला तयार नाहीत. शेत मजुरापेक्षा देखील शेतकऱ्यांची बिकटअवस्था आहे असा केंद्राचाच रिपोर्ट असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी हमीभावावर 20 टक्के अनुदान देऊ सांगितलं होते. मात्र, तेही आश्वासन पूर्ण केलं नाही. सोयाबीन, कापूस, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचे जवळपास 15 हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच हमीभावावर 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांनी केली होती. मात्र, आता सरकार स्थापन होऊन पाच महिने पूर्ण झाले तरी अद्याप महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळं शेतकरी आक्रम होताना दिसत आहेत. तसेच राजू शेट्टींनी देखील शेती प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. 

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान 

सरकारने 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिले होते. आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर दिलं का? असा सवाल देखील शेट्टी यांनी केला. अवकाळी पावसाचे थैमान आहे, भांडवली शेतीचं नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. भाजीपाला, फळांचे नुकसान झाले, पंचनामे होत नसल्याचे शेट्टी म्हणाले. ठिबक सिंचनाचे अनुदान रखडले आहे. अशात शेतकऱ्यांनीच संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेट्टी म्हणाले. 

शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळा होणार, राजू शेट्टींचा निशाणा

शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही. आधीच रत्नागिरी-नांदेड महामार्ग असताना समांतर रस्ता त्याला बनवल्यास आमचा विरोधच असेल असेही शेट्टी म्हणाले. ग्रामीण भागात जेव्हा मंत्री नेते फिरतील तेव्हा आम्ही जाब विचारु असेही शेट्टी म्हणाले. आम्ही गप्प आता बसणार नाही. शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळा होणार असल्याचे शेट्टी म्हणाले. हा मार्ग बांधण्याचा विचार केला तर 800 किमीसाठी 30 ते 35  हजार कोटी खर्च होतो. मात्र, हा खर्च 86 हजार कोटींवर जात असल्याचे शेट्टी म्हणाले. सक्तीनं शेतकऱ्यांच्या जमिनी यात घेतल्या जाणार आहेत. सर्व राजकीय नेते लोकप्रतिनिधींचे हात ओले होणार आहेत. आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. 

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, ते ही अतिरेकीच; पहलगामनंतर राजू शेट्टींच्या निशाण्यावर सरकार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget