एक्स्प्लोर

Raj Thackeray | मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

लॉकडाउनची शिस्त पाळली नाही तर अर्थिकसंकट निर्माण होईल, अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलताना व्यक्त केली आहे.

मुंबई : सर्व नागरिकांनी देशात लावलेला लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. तर लॉकडाऊनची शिस्त पाळली नाही तर अर्थिकसंकट निर्माण होईल, अशी भितीही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊन यावर भाष्य केलं आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून एवढी शांतता 1992-93 च्या दंगलीदरम्यानही पाहिली नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं आहे. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. 'दिवे लावून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून परिणाम होणार असेल तर होऊ दे, पण नुसतं दिवे लावण्याचं आवाहन करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात आशेचा किरण दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. उद्या जर उद्योगधंदे बंद झाले, तर त्याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होणार आहे. यावर पंतप्रधानांनी बोलणं अपेक्षीत होतं.

पाहा व्हिडीओ : मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमावरही भाष्य केलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच'

कोरोनाचा फायदा घेऊन अन्नधान्याचा काळाबाज करणाऱ्यांनाही फोडून काढलं पाहिजे, असं वक्तव्यही राज ठाकरेंनी केलं आहे. तसेच याबाबत बोलताना त्यांनी 'ही काळा बाजार करण्याची वेळ आहे का?' असा सवाल राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'हात उचलायची हिंमत होते कशी? पोलिसांना तुम्ही शिव्या देता? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. 'मी मुख्यमंत्र्यांना यावर कडक पावलं उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे', अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

संबंधित बातम्या : 

Coronavirus : तब्लिगींचा फटका कोकणालाही, मरकजला गेलेल्या रत्नागिरीतील व्यक्तिला कोरोनाची लागण

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget