एक्स्प्लोर

Maharashtra Rain Update | पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार

पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबई : पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे पालघरसाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे.

विदर्भासाठी सर्वत्र आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार कोसळू शकतो. प्रामुख्याने नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज आहे. इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यात संततधार 
सलग दुसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यात संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून धरणक्षेत्रांत चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या धरणांची पाणी क्षमता शंभर टक्के पूर्ण झाली आहे. या दोन्ही धरणांत मिळून जवळपास 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीत सुरू आहे. त्याच्यामुळे सूर्या नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच धामणी धरणातून जिल्ह्यातील औद्योगिक कार्यक्षेत्र त्याप्रमाणे प्रमुख शहर तसेच वसई विरार महानगरपालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. धरण फुल्ल झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.

भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण ओव्हर फ्लो 
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले असून निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात 20 हजार क्यूसेक वेगानं विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन्ही धरणं भरल्यानंतर काल संध्याकाळपासून प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आलाय. काल रात्री 30 हजार क्यूसेक वेगानं सुरू असणारा विसर्ग सकाळी 20 हजार क्यूसेकवर आला असून प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. प्रवरा नदी पात्रालगत असणाऱ्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित केले असून नदीवर असणारे छोटे पूल वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
Mumbai-Pune Expressway Missing Link :  मिसिंग लिंकवर कोणत्या वाहनांना प्रवेश, कोणाला बंदी? टोल आणि स्पीडची मर्यादा काय?
Mumbai-Pune Expressway Missing Link :  मिसिंग लिंकवर कोणत्या वाहनांना प्रवेश, कोणाला बंदी? टोल आणि स्पीडची मर्यादा काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
Embed widget