Rahul Gandhi Speech Shivaji Park Mumbai : आज राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) समारोप शिवाजी पार्क येथे करण्यात आला. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.  


लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून पहिलीच सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर घेण्यात आली. इंडिया आघाडीने या सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.   


देशाने मला दगा दिला


राहुल गांधी म्हणाले की, काल माझ्या गाडीवर एक तरुणाने उडी मारली होती. त्या तरुणाला पोलिसांनी खूप मारले. ⁠पण तो मला भेटला. तो तरुण म्हणाला की, मला सैनिक व्हायचे होते. ⁠मात्र देशाने मला दगा दिला आहे. ⁠छप्पन इंच का छाती नाही तर खोकला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केली आहे. 


फक्त राहूल गांधी चालले नाही तर सर्व विरोधी पक्षाचे लोक चाललेत


राहुल गांधी पुढे म्हणाले की, चार हजार किमीची यात्रा मला करायची याबाबत मी 2014 मध्ये विचार केला असता तर ते शक्य झाले नसते. ⁠मात्र मला यात्रा का करावी लागली? ⁠फक्त राहूल गांधी चालले नाही तर सर्व विरोधी पक्षाचे लोक चाललेत. ⁠सोशल मिडिया संदर्भात अमेरिकेच्या कंपनीवर दबाव आहे. 


राहुल गांधींची अशोक चव्हाणांवर टीका


आम्ही नाही भाजपच्या विरोधात लढत आहोत. ना एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. ⁠राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ⁠ईडी आणि सीबीआयमध्ये आहे. ⁠एका नेत्यांचं नाव घेणार नाही. ⁠मात्र काँग्रेसचा एक नेता माझ्या आईकडे रडला की मी या शक्तीच्या विरोधात लढू शकत नाही. ⁠मला जेलमध्ये जायचे नाही, असे अशी टीका त्यांनी यावेळी अशोक चव्हाणांवर केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


राजाचा आत्मा ईडी, सीबीआय, ईव्हीएमध्ये, 56 इंच छाती नाहीच; राहुल गांधींचा घणाघात


Sharad Pawar : 'मोदी की गॅरंटी चालणार नाही, आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ', शिवाजी पार्कातून शरद पवार कडाडले