INDIA alliance rally in Mumbai : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आज इंडिया आघाडीकडून मुंबईमध्ये आज (17 मार्च) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या 67 दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईमध्ये होत आहे. यानिमित्त इंडिया आघाडीनं भव्य सभेचं आयोजन केलं आहे. 






या सभेसाठी देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या सभेसाठी काँग्रेसचे सर्वच नेते बैठक सभेसाठी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार,राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबूबाब मुफ्ती, झारखंडचे मुख्यमंत्री  आणि मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी पोहोचले आहेत. 


















 इतर महत्वाच्या बातम्या