एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभरात राज्यातील 15 खासदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांची निवडणूक रद्द करावी म्हणून वेगवेगळ्या खंडपीठात याचिका दाखल झालेल्या आहेत.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरातच महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. मात्र अद्यापही त्या याचिका न्यायप्रविष्टच आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्या की याचिका दाखल होतात, मात्र ज्या नेत्याच्या विरोधात अशा याचिका दाखल होतात त्यांचा कार्यकाळ संपून जातो. पण निकाल काही लागत नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एमआएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मात तेढ निर्माण करणारी भाषणे औरंगाबाद लोकसभेमध्ये वायरल केली. धर्माच्या नावावर मते मागितली म्हणून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठात केवळ इम्तियाज जलीलच नाही, तर मराठवाड्यातल्या सात आणि नंदुरबारच्या एक अशा एकूण आठ खासदारांच्या विरोधात 9 याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली आहे. याशिवाय अन्य याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, परभणीचे संदेश जाधव यांच्या विरोधात, लातूरचे नवनिर्वाचित खासदार आमदार सुधाकर श्रृंगारे यांच्याविरोधात प्रत्येकी एक याचिका दाखल केली आहे . नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्या निवडीलादेखील औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या सगळ्या याचिका लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 सेक्शन 81 अंतर्गत दाखल करण्यात करण्यात आल्या आहेत. मराठवाडाच नाही तर विदर्भातील सात खासदारांच्या खासदारकीला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. प्रचारादरम्यान नितीन गडकरींनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करावी अशी मागणी आहे. याशिवाय अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या खासदारकीला देखील आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या विरोधात औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात मध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक झाल्या की अशा याचिका दाखल होतात. विधानसभा निवडणुकीनंतर आमदारकी रद्द करण्याच्या अनेक याचिका महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खंडपीठात दाखल झाल्या. त्यात अर्जुन खोतकर यांची आमदारकी औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली होती. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. तरीही याचिका सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांची निवडणूक रद्द करावी म्हणून वेगवेगळ्या खंडपीठात याचिका दाखल झालेल्या आहेत. याचिका दाखल होतात, वर्षानुवर्षे खटले चालतात, बहुतेक वेळा त्याच्या खासदारकीचा-आमदारकीचा कार्यकाळदेखील पूर्ण होतो. मात्र तरीदेखील याचिकांचा निकाल लागत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget