एक्स्प्लोर

चाकरमान्यांनो 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करा; त्यानंतरच बाजारपेठेत प्रवेश!

पुढच्या दोनच दिवसात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निर्णयानं चाकरमान्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर देखील पाणी फिरलं. कारण, खारेपाटण या गावच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर 14 दिवसांचा क्वारंटाऊन कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी : गणेशोत्सव! कोकणातील सर्वात मोठा आणि कोकणी जनतेचा जीवाभावाचा सण. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेला माणूस गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणातील मुळगावी येणार हे ठरलेलंच! पण, यंदा मात्र कोरोना चाकरमान्यांच्या वाटेत विघ्न बनून उभा आहे. त्यामुळे कोकणात विघ्नहर्त्याचे स्वागत करायला येणाऱ्या चाकरमान्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. गावात येणे झाल्यास 14 दिवस आधी या असा निर्णय आता बहुतांश ग्रामपंचायती करताना दिसत आहेत. त्यामुळे नोकरी-धंदा सांभाळून ही गोष्ट साधायची कशी? असा यक्ष प्रश्न सध्या या चाकरमान्यांपुढे आवासून उभा आहे. त्यामध्ये काही गावांनी सामंजस्य भूमिका घेत 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करता येईल का? याचा विचार सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे या गावानं तर चाकरमान्यांनो 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करा आणि खुशाल बाप्पाचं स्वागत करा असा निर्णय घेतला. पण, पुढच्या दोनच दिवसात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निर्णयानं चाकरमान्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर देखील पाणी फिरलं. कारण, खारेपाटण या गावच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर 14 दिवसांचा क्वारंटाऊन कालावधी पूर्ण कराच. त्याशिवाय या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय, चाकरमान्यांना या ठिकाणी यायचं झाल्यास ग्रामपंचायतीकडून क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याचं पत्र किंवा दाखल, आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता चाकरमान्यांना गावी आल्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे क्रमप्राप्त असणार आहे.

काय आहे खारेपाटण बाजारपेठेचं महत्त्व?

मुंबईकडून जाताना रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग बाजारपेठेत प्रवेश करताना मुंबई - गोव्याला लागून हे गाव आहे. याच गावात ही बाजारपेठ आहे. तसं पाहायाला गेले तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील किमान 15 ते 20 गावं, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील काही गावांचे नागरिक देखील या ठिकाणी बाजारासाठी येतात. ही बाजारपेठ या गावांना जवळ आणि तुलनेनं मोठी पडत असल्याने या बाजारपेठेचं महत्त्व आहे. बाजारपेठेत साणसुदीच्या कालावधीत लाखो- करोडो रूपयांची उलाढाल होते. शिवाय, अगदी इतिहासात डोकावून पाहायाला गेल्यास देखील या बाजारपेठेचं महत्त्व अधोरिखित होते. शिवाजी महाराजांच्या काळात देखील खारेपाटणचं महत्व होते. गावाला लागून खाडी असल्यानं किमान या साऱ्या गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो.

आजुबाजुच्या गावांमधून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी काय नियम?

इतर दिवशी देखील या बाजारपेठेत गर्दी आणि वर्दळ दिसून येते. सणासुदीच्या कालावधीत ती आणखीन वाढते. कोरोना रूग्णांची संख्या सध्या कोकणात देखील वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता खारेपाटण या ठिकाणी किमान राजापूर, वैभववाडी, कणकवली आणि देवगड तालुक्यांमधील 25 ते 30 गावच्या सरपंचांची सभा झाली. यावेळी कोरोनाची सारी परिस्थिती पाहता क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिक किंवा चाकरमान्यांनाच या बाजारपेठेत प्रवेश दिला जाईन असा एकमुखी निर्णय झाला. बैठकीला गैरहजर असलेल्या काही सरपंचांनी देखील हा निर्णय मान्य असल्याचे कळवले. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी एबीपी माझाला तशी माहिती दिली. दरम्यान, केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हाच यामागील उद्देश असल्याचे राऊत यांनी माझाकडे बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे गावाचा क्वारंटाईन कालावधी कितीही असला तरी खारेपाटणच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला हा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. याबाबतची सारी जबाबदारी ही आता संबंधित गावच्या सरपंचांवर आली आहे. ज्या उंबर्डे गावानं 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी केला होता, त्या गावचे सरपंच देखील यावेळी हजर होते. त्यांनी हा निर्णय मान्य असल्याचे सांगितले अशी माहिती देखील राऊत यांनी 'माझा'ला दिली. त्यामुळे खारेपाटणच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा झाल्यास सर्वांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. शिवाय, तसे पत्र देखील लागणार आहे. केवळ मुंबईच नाही तर इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांना देखील हा नियम लागू असणार आहे.

सध्या कोकणात काय आहेत क्वारंटाईनचे नियम

शासनाकडून क्वारंटाईनच्या नियमाबाबत काहीही ठरलेले नाही. केवळ निर्णय होईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी उत्तरं राज्यकर्ते किंवा कोकणातील मंत्री आणि नेते देत आहेत. पण, महिन्यापेक्षा देखील कमी कालावधी हा गणपतीकरता राहिलेला असताना याबाबत निर्णय का होऊ शकला नाही? असा सवाल सध्या विचारला जात आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालवधी बंधनकारक करण्यात आलेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक ग्रामपंचायतींनी तशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती देखील अनेक ग्रामपंचायती या चाकरमान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget