एक्स्प्लोर
भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पाथर्डी(अहमदनगर): भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. भगवानगडावर दसरा मेळाव्याला राजकीय, वैयक्तीक, सामाजिक मेळाव्यांना परवानगी देऊ नये, परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा अती गंभीर प्रश्न निर्माण होईल, असं गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यानी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्याला राजकीय, अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रित केलेलं नाही. भगवानगड ही स्वायत्त संस्था असून वर्धापनदिनी सार्वजनिक सभा, मेळावे न घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही वैयक्तिक मेळावे, राजकीय मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असंही निवेदनात म्हटलं आहे. यापूर्वी भगवानगड हद्दीत येणाऱ्या भारजवाडी ग्रामपंचायतीने दसरा मेळावा होण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. शिवाय पंकजा मुंडेंना बोलावण्यासाठी आसपासची गावं आग्रही आहेत. त्यामुळे येत्या काळात महंत नामदेव शास्त्री विरुद्ध नागरिक असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Before You Go
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















