एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गावर आता वेगाच्या नियंत्रणासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पाऊल

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर नागपूर, जालना, वेरूळ व कारंजा लाड या चार ठिकाणी परिवहन विभागाचे पथक एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करत आहे.

नागपूर: समृद्धी महामार्गावर होणाऱ्या रोजच्या अपघाताचे प्रमाणे थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता कडक उन्हामध्ये  सिमेंट रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांना टायर फुटण्याचा धोका असतो. हे बघता बघता समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली असून टायर कालबाह्य झालेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर धावू न देता परत पाठवले जाणार आहे. तर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमच्याद्वारे वाहनांच्या ओहरस्पीडवर पाळत ठेवली जात आहे.

तुम्ही जर का समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर आधी आपल्या वाहनाचे तयार नीट चेक करून घ्या. कारण तुमच्या टायरचे खूप जास्त घर्षण झाले असेल आणि त्याने 1.6 mm थिकनेस मर्यादा ओलांडली असेल तर परिवहन विभागाचे पथक तुम्हाला समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मज्जाव करू शकते.

11 डिसेंबर 2022  रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. आजवर समृद्धी महामार्ग जसा त्याच्या उत्कृष्ट कामाने, गुणवत्तेने चर्चेत राहिला तसाच तो यावर होणाऱ्या अपघाताच्या मालिकेने देखील सतत चर्चेत राहिला. परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार  समृद्धी महामार्गावर आजवर 950 च्यावर छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना पुढे आल्या असून यातील 41 अपघातात हे प्राणघातक अपघात ठरले. धक्कदायक बाब मध्ये 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेकडाऊन मुळे झाल्याचे पुढे आले. तर 15 टक्के अपघात हे टायर कमजोर असल्यामुळे झाले. 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून चालकांचा वेग नियंत्रत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार  समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईटवर वाहनाने कापलेले अंतर किती वेळात पूर्ण केले यावरून वाहनाचा वेग काढला जातो आणि जर का वेग मर्यादेचे उलंघन केले असल्याचे आढळल्यास त्या वाहनावर कारवाई म्हणून त्याचे 20 मिनिटे  थांबवून उद्बोधन केले जाते.

यासाठी परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर नागपूर, जालना, वेरूळ व कारंजा लाड या चार ठिकाणी परिवहन विभागाचे पथक नेमले असून तेथे वाहनांची टायर तपासणी आणि एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमने वाहनाच्या वेगावर पाळत ठेवली जात आहे. आतापर्यंत या मोहिमे अनंतर्गत 64 वाहनांवर एक्सिट मॅनेजमेंट सिस्टीमने कारवाई करण्यात आली.

तर 294 वाहनांच्या टायरची स्थिती तपासण्यात आली. शेवटी आजवरचे झालेल्या सर्व अपघातांना तांत्रिक करणासोबत मानवी चुका तितक्याच जबाबदार आहे. त्यामुळे शेवटी नियमाचे पालन करा आणि अपघात टाळा याच मूलमंत्राचे पालन करणे हा यावरच रामबाण उपाय आहे.

 

 

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget