एक्स्प्लोर

कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प

कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा वाहतूक ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

रायगड : सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामण देवी येथे रात्री दरड आणि माती कोसळली. महामार्गाच्या मध्यभागी मोठमोठे दगडी आल्याने वाहतूकीसाठी कशेडी घाट बंद ठेवण्यात आला. रात्रभर एल ॲंड टी कंपनी मार्फत दोन जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील माती आणि दरड बाजूला काम सुरु ठेवण्यात आले आताही काम सुरु आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असल्याने मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असून धामणदेवी धडक असलेल्या ठिकाणापासून लोहारेपर्यंत किमान सहा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या कोकणात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात महामार्गावरील धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. काल रात्रभर पासून आतापर्यंत दरड उपसण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे. मध्यभागी मोठमोठे दगडी आल्याने वाहतूकीसाठी कशेडी घाट बंद ठेवण्यात आला. रात्रभर एल ॲंड टी कंपनी मार्फत दोन जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील माती आणि दरड बाजूला काम सुरु ठेवण्यात आले आताही काम सुरु आहे. वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असून धामणदेवी धडक असलेल्या ठिकाणापासून लोहारे पर्यंत किमान सहा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प महामार्गावरील खेड येथील जगबुडी - नारिंगी नदी धोक्याच्या पातळीवर काल सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणारी नारंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगबुडी नदीची इशारा पातळी 6 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे. दिवसभर सह्याद्रीच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरु असल्याने काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 6.5 मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्या चिंतेत भर पडली आहे. एका बाजूला जगबुडीचे पाणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या नारिंगी नदीच्या पाण्याचीही पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली की शहराला कधी पुराचा वेढा पडेल हे सांगता येत नाही. येथील व्यापाऱ्यांचा हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे जगबुदी आणि नारिंगी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागताच व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरु केली आहे. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नसल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पाणी पात्रात वाढ झाल्याने नदी पात्र सोडून वाहत असल्याने शहरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळीत वाढ रायगड रोहा शहरालगत वाहणारी कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढत आहे. या नदीची इशारा पातळी 23 मीटर (ढोह तलाव बंधारा) तर धोका पातळी 23.95 मीटर आहे. दिवसभर संततधार पाऊस सुरु असल्याने काल रात्री कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी 23.40 मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन यांच्या चिंतेत भर पडली.प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूण शहरातील वाशिष्टी नदी पात्राचे पाणी बाजारपुलाला लागले सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण वाशिष्टी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने शहरातील नवीन असलेल्या बाजार पुलाला पाणी लागले. वाशिष्टी नदीला कोयना धराणाच्या पाण्याचा विसर्ग असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. जिल्ह्यातील छोट्या धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग जिल्ह्यातील छोटी छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणे ओव्हरफ्लो होऊ लागल्याने धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.त्यामुळे त्यामुळे आजूबाजूच्या नद्यांच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नद्याच्या बाजूला असणाऱ्या गावाना सर्तकतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
Maharashtra Rain : राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget