एक्स्प्लोर

Monsoon and Weather update : मान्सूनचा परतीचा प्रवास 2-3 दिवसात सुरु, हवामान विभागाची 'माझा'ला माहिती

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार  गुजरातच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

Weather Monsoon News : राज्यातून नैऋत्य मान्सून (Monsoon) आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात   मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) एबीपी माझाला महत्त्वाची माहिती दिली आहे.  धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव भागातून मान्सून माघारी फिरण्यास पुढील  दोन ते तीन दिवसात अनुकूल वातावरण  आहे. 

राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार  गुजरातच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार  आहे. 

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट

राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.  5 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परत जातो. उर्वरित राज्यातून जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात. 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच  परत गेलेला असतो. 1975 ते 2022 या कालावधीत  आतापर्यंत मान्सून परतीच्या तारखांवर नजर मारल्यास लक्षात येते की, 2005 साली 2 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानतंर 2007 साली 30 सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे मान्सूनच्या आगमनाच्या तारखांपेक्षा मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये विविधता दिसून येते.

मान्सून परतीचा प्रवास नेमका काय?

जून  ते सप्टेंबर या कालावधीत जेव्हा भारतात मान्सून सक्रिय असतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारच्या वाऱ्यांमध्ये युद्ध पाहायला मिळते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमध्ये कोरडी हवा असते. तर याउलट बंगालचा उपसागर, अरबी समुद्र किनारपट्टी भागातील हवेत आद्रता असते. भारतावर या दोन वाऱ्यांमध्ये युद्ध सुरू असते त्यामध्ये कोणते वारे हे अधिक शक्तिशाली आणि प्रभावी आहे त्यावर मान्सून कसा असणार हे निश्चित होते. याचे उदाहरण द्याचे झाले तर ऑगस्ट 2023 मध्ये जो पाऊस पडला तो 1901 पासूनच्या ऑगस्ट महिन्यातील पावसाचा विचार करता सर्वात कमी पाऊस या वर्शी पाहायला मिळाला. दोन पावसाचे खंड ऑगस्टमध्ये पाहायला मिळाले.  पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमध्ये मोठ्या प्रमाणात कोरडी हवा भारतात आली होते. परिणामी या वाऱ्याचा परिणाम पावसावर झाला. 15 सप्टेंबर किंवा शेवटच्आ आठवडा पाहिला तर मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावतो. ज्यामुळे कोरडी हवा भारतात येते. जशी कोरडी हवा भारतात येते तसा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.  

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमित ठाकरेंनी सुनावलं, 'तुम्ही याच लोकांमुळे खुर्चीवर बसलायत'
दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमित ठाकरेंनी सुनावलं, 'तुम्ही याच लोकांमुळे खुर्चीवर बसलायत'
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय, पुण्यातील जमिनींबाबत महत्त्वाचे धोरण ते लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय, पुण्यातील जमिनींबाबत महत्त्वाचे धोरण ते लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता
CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Sadabhau Khot on CJP Protest: जंतरमंतरवरील विद्यार्थी आतंकवादी, केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊच नये; सदाभाऊ खोतांची टिप्पणी
जंतरमंतरवरील विद्यार्थी आतंकवादी, केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊच नये; सदाभाऊ खोतांची टिप्पणी

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget