एक्स्प्लोर

उत्तर भारतीय नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे प्रांतवाद : राज ठाकरे

आपण जिथे जातो तिथली संस्कृती भाषा शिकणे गरजेचे, कुठल्याही देशात गेल्यावर शिकता, मग महाराष्ट्रात मराठी का नको? महाराष्ट्रातल्या लोकांनी सुसंस्कृत भूमी निर्माण केली म्हणून उद्योग इथे येत आहेत. यूपी-बिहारमध्ये अशा उद्योग भूमी निर्माण होऊ शकत नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला.

मुंबई : उत्तर भारतीय नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे प्रांतवाद निर्माण झाला असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मंचावर बोलताना केली आहे. उत्तर भारतीय महापंचायतच्या वतीने मुंबईत कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे त्यांनी हे संपूर्ण भाषण हिंदीतून केले.
यावेळी बोलताना त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांच्या अकार्यक्षमतेवर थेट टीका करत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हक्कावरून आपल्या शैलीत फटकारे ओढले. राज ठाकरे यावेळी म्हणाले की, स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणल्यास संघर्ष होणारच आहे. उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त पंतप्रधान तरीही लोकं बाहेर  कामाला का जातात? असा सवाल त्यांनी केला.
ठाकरे यावेळी म्हणाले की, आपण जिथे जातो तिथली संस्कृती भाषा शिकणे गरजेचे, कुठल्याही देशात गेल्यावर शिकता, मग महाराष्ट्रात मराठी का नको? महाराष्ट्रातल्या लोकांनी सुसंस्कृत भूमी निर्माण केली म्हणून उद्योग इथे येत आहेत. यूपी-बिहारमध्ये अशा उद्योग भूमी निर्माण होऊ शकत नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला.
तुम्ही तुमच्या नेत्यांना रोजगार आणि सुविधा देण्यासाठी का विचारात नाहीत,असे म्हणत त्यांनी फक्त महाराष्ट्रातूनच उत्तर भारतीयांना हटविले जात नाही, असे सांगितले. आसाम, गुजरातमधून यूपी-बिहारींना हटविले तर प्रश्न का उपस्थित नाही राहिले? आम्ही आंदोलन केल्यावर मात्र प्रश्न उपस्थित केले जातात, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांच्या जाहिराती यूपी-बिहारच्या वर्तमानपत्रात येतात, मात्र मराठी वर्तमानपत्रात येत नाहीत. मग तिकडच्या लोकांना इथे रोजगार मिळतो आणि इकडचे तरुण बेरोजगार राहतात. उत्तर भारतीय इथे येऊन उलट उर्मट भाषा वापरतात असेही ते म्हणाले. मराठी लोकांनी युपी-बिहारमध्ये जाऊन उर्मट भाषा वापरली तर तुम्ही आरत्या कराल का? असा सवाल त्यांनी केला.मराठी माणूस काम करत नाहीत अशी टीका केली जाते. माझ्यासोबत चला मराठी माणूस काम करतो का नाही ते दाखवतो. मराठी माणूस लीगल ठिकाणी बसून आपला व्यवसाय करतात, असेही ते म्हणाले.
मग आम्ही गप्प बसायचे का?   
यूपी-बिहारवरून रोज ट्रेन भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. मुंबईत झोपडपट्ट्या वाढत आहेत, रस्ते कमी पडत आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढायला देखील अनेक उत्तर भारतीय जबाबदार आहेत. महाराष्ट्र पोलिसांना विचारा त्यांचा तपासातला जास्त वेळ कुठे जातो? असेही ते म्हणाले. आमच्या आयाबहिणींची इज्जत आम्ही वेशीवर टांगली नाही. बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का? बाहेरचे लोकं इथे येऊन दंगे करतात हे आम्ही सहन करायचे का? युपी-बिहारमध्ये जाऊन आम्ही असे केल्यावर तुम्ही सहन कराल का? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
राज्य मोठं व्हावं, त्याने देश मोठा होतो  
राज ठाकरे पुढे म्हणाले की, इथं इतकी गर्दी झालीय की आता तुम्ही सांगायला हवं की येऊ नका. आमच्या युवकांना रोजगारच मिळत नाही. बाहेरचे लोक येत राहिले तर राज्यातील युवकांना रोजगार कसा मिळणार, असे ते म्हणाले. अन्य राज्यांतून गुन्हेगार येत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. दक्षिण भारतात रोजगार उपलब्ध झाल्याने तिकडचे लोंढे थांबले, तसे रोजगार उत्तर भारतातही निर्माण करावेत असे ते म्हणाले. प्रत्येक राज्य मोठं व्हावं, त्याने देश मोठा होतो, असे ठाकरे म्हणाले.
अमिताभ बच्चन यांचं यूपीवर प्रेम, तर माझं महाराष्ट्रावर प्रेम असण्यात गैर काय?  
आम्ही आंदोलने केली त्यात चूक काय होतं? तुमच्याकडे अशी स्थिती असती तर तुम्ही अशीच भूमिका घेतली असती. अमिताभ बच्चन मुंबईत राहतात आणि निवडणूक लढायला यूपीत जातात. त्यांना जर युपीवर प्रेम असेल तर माझं महाराष्ट्रावर प्रेम असण्यात गैर काय? असा सवाल करत महाराष्ट्राचे उत्कर्ष करणे माझे काम, तुम्ही तिथल्या नेत्यांना तिथला उत्कर्ष करायला सांगा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 
    • उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त पंतप्रधान तरीही बाहेर लोकं कामाला का जातात?
    • संस्कृती भाषा शिकणे गरजेचे, कुठल्याही देशात गेल्यावर  शिकता, मग महाराष्ट्रात मराठी का नको?
    • आसाम, गुजरातमधून युपी-बिहारींना हटविले तर प्रश्न का उपस्थित नाही राहिले?
    • महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांच्या जाहिराती युपी-बिहारच्या दैनिकांत येतात
    • मराठी लोकांनी युपी-बिहारमध्ये जाऊन उर्मट भाषा वापरली तर तुम्ही आरत्या कराल का?
    • तुम्ही तुमच्या नेत्यांना रोजगार आणि सुविधा देण्यासाठी का विचारात नाहीत
    • मराठी माणूस काम करत नाहीत अशी टीका केली जाते
    • माझ्यासोबत चला मराठी माणूस काम करतो का नाही ते दाखवतो
    • मराठी माणूस लीगल ठिकाणी बसून आपला व्यवसाय करतात
    • महाराष्ट्रातल्या लोकांनी सुसंस्कृत भूमी निर्माण केली म्हणून उद्योग इथे येताहेत
    • यूपी-बिहारमध्ये अशा उद्योग भूमी निर्माण होऊ शकत नाही का?
    • यूपी-बिहारवरून रोज ट्रेन भरून येतात आणि रिकाम्या जातात
    • मुंबईत झोपडपट्ट्या वाढत आहेत, रस्ते कमी पडत आहेत
    • महाराष्ट्र पोलिसांना विचारा त्यांचा तपासातला जास्त वेळ कुठे जातो
    • आमच्या आयाबहिणींची इज्जत आम्ही वेशीवर टांगली नाही
    • बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का
    • बाहेरचे लोकं इथे येऊन दंगे  करतात हे आम्ही सहन करायचे का
    • यूपी-बिहारमध्ये जाऊन आम्ही असे केल्यावर तुम्ही सहन कराल का
    • इथं इतकी गर्दी झालीय की आता तुम्ही सांगायला हवं की येऊ नका
    • आमच्या युवकांना रोजगारच मिळत नाही, मग संघर्ष कसा थांबवणार
    • बाहेरचे लोक येत राहिले तर राज्यातील युवकांना रोजगार कसा मिळणार
    • अन्य राज्यांतून गुन्हेगार येत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही
    • दक्षिण भारतात रोजगार उपलब्ध झाल्याने तिकडचे लोंढे थांबले
    • प्रत्येक राज्य मोठं व्हावं, त्याने देश मोठा होतो
 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मोशी दुर्घटनेतील इमारतीचे एक-एक मजले पाडले जाणार
Maharashtra Breaking LIVE: मोशी दुर्घटनेतील इमारतीचे एक-एक मजले पाडले जाणार
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी 'देवदूत' बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!
मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी 'देवदूत' बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!
Prithviraj Chavan & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरुन पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, पृथ्वीराज चव्हाणांचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरुन पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, पृथ्वीराज चव्हाणांचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
Embed widget