एक्स्प्लोर

Bachchu Kadu: उपोषण क्षत्रियाला शोभत नाही, ते पंडित- पुजाऱ्यांनी करावं; आमदार बच्चू कडू यांचा जरांगे पाटील यांना सल्ला

Bachchu Kadu: क्षत्रियांनी मैदानात उतरून लढावं लागतं. उपोषण हे पंडित, पुजाऱ्यांनी केलं पाहिजे. उपोषण हे क्षत्रियांना शोभत नाही. असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

Bachchu Kadu: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आजपासून मराठा समाजाला (Maratha Reservation) आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. यावर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला दिलाय. ते अकोला येथे बोलत होतेय. सरकारला अंमलबजावणीसाठी थोडा वेळ द्यावा असं बच्चू कडू  म्हणालेय. जरांगेंनी उपोषण करू नये. उपोषण हे क्षत्रियाला शोभत नाहीय. उपोषण हे पंडीत-पुजाऱ्यांना शोभतं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेय. दरम्यान, जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी, असा सल्ला कडूंनी जरांगेंना दिलाय. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीच तांत्रिक अडचण नसल्याचं कडू म्हणालेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) संदर्भातील अधिसूचनेविरुद्ध सहा लाख तक्रारी आलेल्या आहेत. पुढील एक महिन्यात या तक्रारींचं निवारण केल्या जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय सचिवालायाने दिली आहे. अधिसूचना जर लागू झाली तर सगेसोयरे हा विषय देखील लागू होईल. त्यामुळे  सरकारने जो मराठा आरक्षणासंदर्भात कायदा पारित केला, त्यापेक्षा देखील अधिक चांगला कायदा पुढे लागू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मराठा आरक्षणाचा कायदा हा लागू होईल आणि तो न्यायालयात देखील टिकेल. तसेच कोर्टात टिकल्यानंतर मराठा समाजाला वेगळा आरक्षण मिळेल. मला व्यक्तिशः असं वाटतं, की ओबीसी सोबतच हे आरक्षण अधिक लाभदायक ठरेल आणि या महाराष्ट्रातील वाद देखील सुटेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी बोलतांना व्यक्त केला. 

छत्रपती वारंवार लढाया लढत नव्हते

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे की नाही, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला सल्ला हा त्यांचा देखील वैयक्तिक सल्ला असू शकतो. मी त्यांना सल्ला देण्यासाठी फार मोठा नाही. मात्र त्यांनी समजा निवडणूक लढण्याचा विचार केलाच, तर लोकसभा न लढता त्यांनी विधानसभा लढवली पाहिजे, असा सल्ला देखील आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. माझे व्यक्तिगत मत असे आहे की,  जरांगे पाटील यांनी दोन-तीन महिने सरकारला वेळ दिला पाहिजे. आगामी निवडणुकांसाठी लागणारी आचारसंहिता ही एप्रिल महिन्यापर्यंत संपते. त्यानंतर मे महिन्यात सरकार काय पुढाकार घेतं, हे बघावं, असे देखील बच्चू कडू म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण
Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
ABP Southern Rising Summit 2025: ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
Chhatrapati Sambhajinagar: तोतया IAS महिला सहा महिने छ. संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली; रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले, अफगाणिस्तानचा बॉयफ्रेंड अन् पाकिस्तानशी....
तोतया IAS महिला सहा महिने छ. संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली; रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले, अफगाणिस्तानचा बॉयफ्रेंड अन् पाकिस्तानशी....
Ethiopia Volcano Mumbai-Delhi: इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
Embed widget