एक्स्प्लोर

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला, बीडमधल्या सभेत जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील सभेत केलं. या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आणि अशी वक्तव्यांना चोख उत्तरं दिली जातील असं म्हटलं आहे.

बीड : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये धुसफूस सुरु आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीबद्दल एक वक्तव्य केलं. आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. बीडमध्ये आयोजित संविधान महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात देशाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशात कुणीही बोलायला तयार नव्हते. मात्र अहमदाबादच्या आणि पटनाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तेव्हा जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झालं आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल, म्हणून याचे श्रेय जेएनयू आणि तिथल्या विद्यार्थ्यांला जातं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. विद्यार्थी न घाबरता बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगत आवाज देत आहेत. आज विद्यार्थी संख्येने कमी दिसत आहेत. मात्र ही संख्या हळूहळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

काँग्रेसची नाराजी

जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता आणि कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की कुणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण

माझ्या भाषणाच्या अर्थाचा अनर्थ काढला जात आहे. काँग्रेसची चळवळ ही माझ्या रक्तात आहे. इंदिरा गांधींनी अनेक राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. मात्र आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सर्वात आधी आंदोलन सुरु केलं, नंतर जनता पेटून उठली आणि त्यांची सत्ता उलथून लावली. मी इंदिरा गांधी यांचा समर्थक आहे. या देशात इंदिरा गांधी यांच्याइतकं प्रभावशाली कर्तृत्व कोणाचं नव्हतं. आज अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सत्ता जनता नाकारु शकते, तर मग अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणीच नाहीत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
शिवसेनेत मोठे फेरबदल होणार, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
शिवसेनेत मोठे फेरबदल होणार, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा! उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार, मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा
बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा! उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार, मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
Shriram Finance : श्रीराम फायनान्स आणि जपानच्या MUFG चा व्यवहार पूर्ण, 39618 कोटींची गुंतवणूक मिळवली, 20 टक्के शेअर MUFG कडे, स्टॉकमध्ये उसळी
श्रीराम फायनान्स–MUFG व्यवहार पूर्ण; वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक, शेअरमध्ये 10 टक्के उसळी
Embed widget