एक्स्प्लोर
'मी नाशिककर, मला शांतता हवी आहे''

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून धुमसणाऱ्या नाशिकमध्ये आता शांततेचे बोर्ड लागले आहेत. ''मी नाशिककर मला शांतता हवीय'', असे फलक नाशिकमध्ये दिसत आहेत. तळेगावातील चिमुलीच्या अत्याचारानंतर नाशिक आणि परिसरात बरीच तोडफोड झाली होती. त्यानंतर अनेक दिवस नाशिक अशांत होतं. शांत नाशिक अशी ओळख असणारं नाशिक हिंसक बनल होतं.
या घडीला नाशिक पूर्वपदावर आहे. मात्र, यापुढे अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून हे बोर्ड लावण्यात आले आहेत. नाशिकच्या कॉलेजरोडवर चौका चौकात 'मी नाशिककर, मला शांतता हवी आहे' अशा आशयाचे होर्डिंग्स लावण्यात आले असून, ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या घडीला नाशिक पूर्वपदावर आहे. मात्र, यापुढे अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून हे बोर्ड लावण्यात आले आहेत. नाशिकच्या कॉलेजरोडवर चौका चौकात 'मी नाशिककर, मला शांतता हवी आहे' अशा आशयाचे होर्डिंग्स लावण्यात आले असून, ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. Before You Go
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















