एक्स्प्लोर

Matheran: माथेरानमध्ये ई- रिक्षावर अज्ञाताची दगडफेक, रिक्षाचालक आणि प्रवासी थोडक्यात बचावले

माथेरान हे वाहनबंदी असलेलं पर्यटनस्थळ असून येथे तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आली.

माथेरान:  माथेरानमध्ये (Matheran)  सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ई रिक्षावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत रिक्षाचालक आणि पर्यटक अगदी थोडक्यात बचावले आहेत.

माथेरान हे वाहनबंदी असलेलं पर्यटनस्थळ असून येथे तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आली. मात्र या ई रिक्षाला पहिल्या दिवसापासूनच घोडेचालकांचा मोठा विरोध होता. त्यातच शनिवारी दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन दरम्यान असलेल्या वेस्टलँड हॉटेल जवळ पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ई रिक्षावर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत रिक्षाचालक आणि पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. ही दगडफेक माकडाने केलेली किंवा चुकून एखादा दगड उडून आला अशा पद्धतीची नसून जाणीवपूर्वक बेचकीच्या सहाय्याने कोणीतरी दगड मारल्याचं रिक्षाचालक आणि प्रवासी यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

माथेरान गिरीस्थानाचा ब्रिटिशांनी 1850 साली शोध लावला. तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरानमध्ये वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान गिरीस्थानापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा किंवा हाताने ओढाव्या लागणाऱ्या रिक्षाने करावा लागत होता. नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन सुद्धा आतापर्यंत अनियमित होती. त्यात घोडा आणि हातरिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉईंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता. मात्र बदलत्या काळानुसार माथेरान गिरीस्थानावर पर्यावरणाचं नुकसान न करता ई रिक्षाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. 

सध्या माथेरान नगरपरिषदेकडून स्वतः ई रिक्षा चालवली जात असून त्यासाठी दस्तुरी पॉईंट ते माथेरान बाजारपेठ या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी 35 रुपये आकारले जात आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी हा दर अवघा पाच रुपये इतका असणार आहे. या ई रिक्षा सेवेमुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यामुळे भविष्यात माथेरानच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकणार आहे. तर स्थानिक रहिवासी, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी यांनाही या ई रिक्षा सेवेचा फायदा होणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget