Maharashtra Rain Updates | चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा पिकांवर संमिश्र परिणाम

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून 15 आणि आणि 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावरासाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jul 2020 12:55 PM
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या फक्त निम्माच पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसाची मोठी प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांना बहुप्रतीक्षित असलेला हा पाऊस गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसला पण या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झालाय तर काहींच्या शेतात पाणी साचलंय. पावसाने थोडी उघाड दिल्यास हे पाणी मुरण्यास मदत होईल आणि पिकाला याचा फायदा होईल. पण पावसाने पुन्हा संततधार लावली तर शेतात पाणी साचलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाने धान पिकाला चांगला फायदा झालाय. लावणीसाठी तयार केलेल्या धानाच्या बांद्यांमध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर या पावसाचा संमिश्र परिणाम दिसून आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायाला मिळत आहेत. जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झालेली आहे. पुढील काही तासांत पावसाचा हा जोर वाढण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे आता संबंधित यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, पावसाच्या जोडीला जोरच्या वारा देखील साथ देत आहे.
अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिप-रिप सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांन पूर आला आहे. जिल्ह्यातील पूर्णा, काटेपूर्णा, मोर्णा, विद्रूप, मन, महेशा या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय. यासोबतच काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं जिल्ह्यातील पाच प्रमुख जलाशयाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झालीये. दरम्यान, पावसामुळे बोर्डी नाल्याला मोठा पूर आल्याने शहरालगतच्या अमानतपूर ताकोडा गावात मोठं नुकसान झालंय. यात काही घरांची ही पडझड झाली आहे.
अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिप-रिप सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांन पूर आला आहे. जिल्ह्यातील पूर्णा, काटेपूर्णा, मोर्णा, विद्रूप, मन, महेशा या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय. यासोबतच काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं जिल्ह्यातील पाच प्रमुख जलाशयाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झालीये. दरम्यान, पावसामुळे बोर्डी नाल्याला मोठा पूर आल्याने शहरालगतच्या अमानतपूर ताकोडा गावात मोठं नुकसान झालंय. यात काही घरांची ही पडझड झाली आहे.
वाशिम :मंगरुळपीर तालुक्यात दीड तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं तर शेलूबाजार पोलीस चौकी आणि बुलढाणा अर्बन बँकमध्ये पाणी शिरलं. गेल्या एका तासापासून औरंगाबाद-नागपूर महामार्गावर शेलू जवळच्या नाल्याला पूर आल्याने वाहतूक बंद झाली. पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरु होईल, मात्र तोपर्यंत वाहनचालकांना पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागेल.
आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अकोला जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीला पूर आला असून सध्या नदी दुथडी भरुन वाहत आहे.
आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अकोला जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीला पूर आला असून सध्या नदी दुथडी भरुन वाहत आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या: राळेगाव तालुक्यातील आष्तोणा आणि एकुर्ली गावात नाल्याला पूर आला. या पुराचा फटका अनेक ठिकाणी बसला. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झालं. अतिपावसामुळे गावालगत असलेल्या दोन्ही नाल्याला पूर त्यामुळे गावातील शेतीचे मोठं नुकसान झालं आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या: राळेगाव तालुक्यातील आष्तोणा आणि एकुर्ली गावात नाल्याला पूर आला. या पुराचा फटका अनेक ठिकाणी बसला. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झालं. अतिपावसामुळे गावालगत असलेल्या दोन्ही नाल्याला पूर त्यामुळे गावातील शेतीचे मोठं नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज तीन मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये कुरुंदा - 85, येहळेगाव- 94, औंढा नागनाथ -65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. औंढा तालुक्यातील मोतनाई नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक शेतात पुराचे पाणी शिरले, छोट्या ओढ्याचे देखील पाणी शेतात शिरुन हळद, सोयाबीन, कपाशी पिकासाह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कयाधू नदीही या वर्षी दुसऱ्यांनदा दुथडी भरुन वाहत आहे. शेतात शिरलेल्या पाण्याचे दृश्य आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने टिपले आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या पाऊस चांगला पडत आहे. त्यामुळे शेतीच्या भात रोपणी कामांना वेग आला आहे. बळीराजाही चांगलाच कामाला लागला आहे. सध्या पालघर जिल्ह्यातील आमदार ही आपल्याला शेतात उतरलेले पाहायला मिळतात. विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा हे ट्रॅक्टर चालवून चिखळणी करून भात लावणी करत आहेत. तर पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा ही शेतात उतरून भात लावणीच्या कामाला लागले आहेत.
मुंबईत आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 24 विभागांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब आज समुद्रात आज भरती येण्याची शक्यता आहे. यावेळी समुद्रात 3.50 मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. एकीकडे भरतीची वेळ आणि दूसरीकडे मुसळधार पाऊसाची शक्यता. यामुळे मुंबईकरांनी सावध राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी एकीकडे समुद्रात भरतीची वेळ आणि दुसरीकडे मुसळधार पावसाचा इशारा दिला जातो अशा वेळी मुंबईतील सकल भागात पाणी भरण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासन यांच्याकडून नागरिकांना समुद्र किनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून जिह्यात सर्वदूर सकाळ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार परिसरात जास्त पाऊस झाल्याने नागपूर औरंगाबाद महामार्गावर शेलू गावाजवळ रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. तर सकाळपासून पडणारा पाऊस खरिपाच्या सर्व पिकांसाठी पोषक ठरणार आहे.
नांदेड जिल्ह्यात रात्री सर्वदूर पाऊस झाला आहे. अनेक दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यातील मरखेल, माळेगाव, धर्माबाद, तुप्पा, वसरणी, वजीराबाद, नांदेड ग्रामीण, तरोडा, कलंबर, मांजरम, अर्धापूर, डाभड इत्यादी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
वसई-विरारमध्ये कालपासून पावसाची रिमझिम सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने 15 ते 17 तारखेपर्यंत अतिवृष्टिचा इशारा ही दिला आहे. रात्रभर पाऊस कोसळत होता. आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होतं. अधून मधून पावसाची रिमझिम सुरुवात होत आहे. तसेच मध्येच जोरदार सरी ही बरसत आहे.
हिंगोली : जिल्ह्यात आज सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. औंढा तालुक्यात येळेगाव मंडळात झालेल्या अतिवृष्टीने पिंपळदरी मार्गे कळमनुरीकडे जाणारा मुख्य मार्ग बंद झाल्याने दहाहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये जामगव्हाण, पिंपळदरी, टेम्भूरदरा, राजदरी, सोनेवाडी, आमदरी, नादापुरं, देववाडी, कंजारा, पूर, वसई इत्यादी गावं संपर्क हीन झाली आहेत. झालेल्या अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई मध्ये गेल्या तीन तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.या मुळे मुंबईच्या सखल भागत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप असली तरी उपनगरात मात्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे.मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव , मालाड परिसरात पहाटे पासून जोरधार पाऊस कोसळतो आहे.तर दादर, हिंद माता परिसरात झालेल्या पावसाने पाणी भरले आहे.
बेळगाव - गडहिंग्लजचे डीवायएसपी अंगद जाधवर यांच्यासहित अन्य चार जणांवर चंदगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल....


खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप केल्याप्रकरणी गडहिंग्लज विभागाचे डीवायएसपी अंगद जाधवर यांच्यासहित 4 जणांवर गुन्हा दाखल
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गाभाऱ्यात विराजमान झाल्या. परंपरेनुसार दशमी दिवशीची ही प्रथा टाळ-मृदुगाच्या गजरात पार पडली. 13 जूनला माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान झालं होतं, मात्र लॉकडाऊनमुळं त्या आळंदीतच मुक्कामी होत्या. त्यांनतर दशमीला इतिहासात पहिल्यांदाच माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटीतून पंढरीला गेल्या. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला भेट ही झाली आणि परंपरा पार पडली. मात्र यंदा त्याच दिवशी पादुकांच्या परतीचा प्रवास झाला. तेंव्हा पासून माऊलींच्या पादुका आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात मुक्कामी होत्या. मग आज दशमी दिवशी परंपरेनुसार पादुका गाभाऱ्यात दाखल विराजमान झाल्या.
#BreakingNews
बारावीचा निकाल उद्या (16 जुलै) जाहीर होणार, उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल
परभणीत संचारबंदी 17 जुलैपर्यंत वाढवली, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी यांचा निर्णय, 17 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व बंद असणार, केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा
लातूर शहर आणि परिसरात मागील एक तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे ..आज दुपार पासून जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण होते दुपार नंतर पावसाला सुरुवात झाली आहे ..जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने ओढ घेतली होती यामुळे जोमातील पिकांना पाण्याची आवश्यकता होती ...आजच्या उत्तम पावसाने ती आवश्यकता पूर्ण केली आहे ....
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गाभाऱ्यात विराजमान झाल्या. परंपरेनुसार दशमी दिवशीची ही प्रथा टाळ-मृदुगाच्या गजरात पार पडली. 13 जूनला माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान झालं होतं, मात्र लॉकडाऊनमुळं त्या आळंदीतच मुक्कामी होत्या. त्यांनतर दशमीला इतिहासात पहिल्यांदाच माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटीतून पंढरीला गेल्या. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला भेट ही झाली आणि परंपरा पार पडली. मात्र यंदा त्याच दिवशी पादुकांच्या परतीचा प्रवास झाला. तेंव्हा पासून माऊलींच्या पादुका आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात मुक्कामी होत्या. मग आज दशमी दिवशी परंपरेनुसार पादुका गाभाऱ्यात दाखल विराजमान झाल्या.
जळगावमध्ये गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने आज सकाळी नऊ वाजता धरणाचे बारा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खबरदारी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, हतनूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यात 17 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई विभागाने वर्तवलेली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वाधिक 121 मिमी पावसाची नोंद मालवणमध्ये झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 2106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण 359.5810 दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, सध्या हे धरण 80.38 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 33.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यात 17 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई विभागाने वर्तवलेली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वाधिक 121 मिमी पावसाची नोंद मालवणमध्ये झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 2106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण 359.5810 दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, सध्या हे धरण 80.38 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 33.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. तालुक्यात मागील काही दिवस कोसळणाऱ्या सततधार पावसाने निळोणा धरण भरलं आहे. यामुळे यवतमाळकरांना दिलासा मिळाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात रिपरिप पाऊस सुरु आहे. संग्रामपूर, शेगाव खामगाव इथे मुसळधार पाऊस सुरु असून वरवंत बकाल इथल्या सातलवन नदीला पूर आला आहे तर बावनबीर येथील केदार नदी तुडंब भरुन वाहत आहे. संग्रामपूर भागात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. तसेच खामगावसह आंत्रज, हिवरखेड, गारडगाव या गाव शिवारात दमदार पाऊस सुरु आहे. बुलडाणा, साखळी, सव, रुईखेड या भागात सुद्धा पाऊस सुरु आहे.


गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आह. पाऊस परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या देखील आता सुरु होणार आहेत. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात खरीप हंगामाचा पेरा 100 टक्के पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, दहिसर, बोरिवलीत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्गमध्ये जोरदार पावसाची हजेरी
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, अंधेरी सबवेला पाणी साचलं, दक्षिण मुंबईत दादर, माटुंगा, वरळी परिसरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.


 


हवामान विभागाच्या माहितीनुसार, "दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे."


 


खरंतर जून महिन्यात ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. आज (15 जुलै) आणि उद्या (16 जुलै) मुंबई, ठाणे पालघर, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


 


पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाड्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी होणार आहे. मात्र, इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.









दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत आजही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात, डहाणू 128 मिमी, कुलाबा 121.6 मिमी, सांताक्रुज‌ 96.6 मिमी, रत्नागिरी 101.3 मिमी, अलिबाग 122.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


 


काल सकाळी रिपरिप असलेला पाऊस दुपारी मुसळधार बरसला. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस होता. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं.


 


Maharashtra Rains | मुंबईसह राज्यभरात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.