एक्स्प्लोर

Jalna: भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा'; जालन्यात दिवसभरात काय घडलं, टॉप 10 मुद्दे

फडणवीस आणि दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले.

BJP Jal Akrosh Morcha: जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात आज भाजपकडून 'जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील मामा चौक ते गांधी चमनपर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी फडणवीस आणि दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले. नेमकं काय घडलं दिवसभरात जालन्यात पाहू यात...

1) सकाळी साडेअकराच्या दरम्यान मामा चौकातून भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'ला सुरवात झाली. यावेळी फडणवीस आणि दानवे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली 

2 ) यावेळी फडणवीसांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. भाजपला उशिरा सुचेलेलं शहाणपण म्हणणाऱ्या अर्जन खोतकर अडीच वर्ष तुम्ही झोपून होता का? असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

3 ) सरकराला समान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घ्यावी लागेल, जे सरकार सामन्या माणसाच्या आक्रोशाची दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही. आमच्या काळात 129 कोटी रुपये जालन्याच्या पाण्यासाठी दिले होते. आता अडीच वर्षे झाले त्या पैश्याच या सरकारने काय केलं असा प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.     

4 ) औरंगाबादमध्ये आम्ही काढलेल्या आमच्या मोर्च्यामुळे किमान सरकार सरकार जागं झालं, मुख्यमंत्री यांना यावं लागलं,घोषणा करावी लागली आणि काही काम सुरु झालं. तसेच इथेही करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.  

5) जोपर्यंत तुम्ही सामन्या माणसाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,तुम्हाला कारभार चालवू देणार नाही आणि एक-एक दिवस तुमचा भारी करू असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

6 ) यावेळी रावसाहेब दानवे यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करायला भाड्याने सोडलाय, दम असेल तर समोर या एकाच स्टेजवर असा इशाराही दानवे यांनी सत्तार यांना दिला आहे.  

7 ) सत्तधारी पक्षाचे लोकं फक्त निवेदन देण्याचे काम करतात. पण अडीच वर्षात आणले काय असा प्रश्न दानवे यांनी विचारले. आम्ही म्हणतो पाणी पाजलं पाहिजे. काही लोकं नाटक करतात, असे म्हणत दानवे यांनी खोतकर यांच्यावर सुद्धा टीका केली.

8 ) भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. भाजपकडून जालना शहरात काढण्यात आलेला 'जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता, असा खोचक टोला खोतकर यांनी लगावला आहे.   

9 )  फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मोर्चासाठी आणलं पण, मोर्चा फुसकाबार निघाला. हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही. गेली 10 वर्ष सत्तेत असताना काय झाले. मुळात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजपचा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला, असेही खोतकर म्हणाले.

10 ) आम्हाला खिशात ठेवण्याच दानवे म्हणाले, याचा अर्थ त्यांचे खिसे आता मोठे झालेत, ते किती मोठे झालेत हे त्यांच्या जावयाच सांगतील. कोणी काय केले हे समोरा-समोर येउत, आव्हान स्वीकारू, घोडा मैदान जवळ असल्याचं खोतकर म्हणाले.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'फडणवीस आता तरी...'
मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'फडणवीस आता तरी...'
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक, गृहमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांचं आता काय म्हणणे आहे?, संजय राऊतांचा सवाल
सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक, गृहमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांचं आता काय म्हणणे आहे?, संजय राऊतांचा सवाल

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Embed widget