एक्स्प्लोर

Jalna: भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा'; जालन्यात दिवसभरात काय घडलं, टॉप 10 मुद्दे

फडणवीस आणि दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले.

BJP Jal Akrosh Morcha: जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात आज भाजपकडून 'जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील मामा चौक ते गांधी चमनपर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी फडणवीस आणि दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले. नेमकं काय घडलं दिवसभरात जालन्यात पाहू यात...

1) सकाळी साडेअकराच्या दरम्यान मामा चौकातून भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'ला सुरवात झाली. यावेळी फडणवीस आणि दानवे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली 

2 ) यावेळी फडणवीसांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. भाजपला उशिरा सुचेलेलं शहाणपण म्हणणाऱ्या अर्जन खोतकर अडीच वर्ष तुम्ही झोपून होता का? असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

3 ) सरकराला समान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घ्यावी लागेल, जे सरकार सामन्या माणसाच्या आक्रोशाची दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही. आमच्या काळात 129 कोटी रुपये जालन्याच्या पाण्यासाठी दिले होते. आता अडीच वर्षे झाले त्या पैश्याच या सरकारने काय केलं असा प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.     

4 ) औरंगाबादमध्ये आम्ही काढलेल्या आमच्या मोर्च्यामुळे किमान सरकार सरकार जागं झालं, मुख्यमंत्री यांना यावं लागलं,घोषणा करावी लागली आणि काही काम सुरु झालं. तसेच इथेही करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.  

5) जोपर्यंत तुम्ही सामन्या माणसाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,तुम्हाला कारभार चालवू देणार नाही आणि एक-एक दिवस तुमचा भारी करू असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

6 ) यावेळी रावसाहेब दानवे यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करायला भाड्याने सोडलाय, दम असेल तर समोर या एकाच स्टेजवर असा इशाराही दानवे यांनी सत्तार यांना दिला आहे.  

7 ) सत्तधारी पक्षाचे लोकं फक्त निवेदन देण्याचे काम करतात. पण अडीच वर्षात आणले काय असा प्रश्न दानवे यांनी विचारले. आम्ही म्हणतो पाणी पाजलं पाहिजे. काही लोकं नाटक करतात, असे म्हणत दानवे यांनी खोतकर यांच्यावर सुद्धा टीका केली.

8 ) भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. भाजपकडून जालना शहरात काढण्यात आलेला 'जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता, असा खोचक टोला खोतकर यांनी लगावला आहे.   

9 )  फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मोर्चासाठी आणलं पण, मोर्चा फुसकाबार निघाला. हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही. गेली 10 वर्ष सत्तेत असताना काय झाले. मुळात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजपचा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला, असेही खोतकर म्हणाले.

10 ) आम्हाला खिशात ठेवण्याच दानवे म्हणाले, याचा अर्थ त्यांचे खिसे आता मोठे झालेत, ते किती मोठे झालेत हे त्यांच्या जावयाच सांगतील. कोणी काय केले हे समोरा-समोर येउत, आव्हान स्वीकारू, घोडा मैदान जवळ असल्याचं खोतकर म्हणाले.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
Raigad Crime News: गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य; रायगडमधील संतापजनक घटना
गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य; रायगडमधील संतापजनक घटना
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
Pune Crime : ‘इन्स्टाग्राम’वर प्रेम फुललं, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; नैराश्यात गेलेल्या व्यावसायिकाचे टोकाचे पाऊल, 12 पाणी पत्रानं सत्य उलगडलं
‘इन्स्टाग्राम’वर प्रेम फुललं, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; नैराश्यात गेलेल्या व्यावसायिकाचे टोकाचे पाऊल, 12 पाणी पत्रानं सत्य उलगडलं

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी फुल टल्ली, बोलताही येईना; नातेवाईकांनी रुग्ण कोल्हापूरला हलवला
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी फुल टल्ली, बोलताही येईना; नातेवाईकांनी रुग्ण कोल्हापूरला हलवला
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
Embed widget