Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनातील महत्वाच्या अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2022 04:35 PM
Maharashtra Monsoon Session : नवं सरकार बेकायदेशीर, स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेणारं; आदित्य ठाकरे यांचा आरोप

वॉर्ड रचना असेल किंवा आरेचा निर्णय असो, या सरकारने स्वत:च्या स्वार्थासाठी हे निर्णय घेतला आहे. हे सरकार तात्पुरतं असून बेकायदेशीर आहे असं शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. 50 थर लावून हे सरकार आल्याचं सांगितलं जातंय, पण यामध्ये खालच्या थराचा बळी घेऊन हे थर लावण्यात आले आहेत असंही ते म्हणाले.

नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो- मुख्यमंत्री

थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेतला. निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो- मुख्यमंत्री

BMC वॉर्डसंदर्भात सुनील प्रभू काय म्हणाले...

 227 वॉर्ड करण्याबाबत अंतिम निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता, याविरोधात आम्ही कोर्टात दाद मागितली होती. कोर्टानं याबाबात चार आठवडे स्टेटस को दिला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होणारं आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असं सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. 

नगराध्यक्ष याच्यावर अविश्वास ठराव आणायचा याची तरतूद कुठे: भास्कर जाधव काय म्हणाले....

भास्कर जाधव काय म्हणाले....


नगराध्यक्ष याच्यावर अविश्वास ठराव आणायचा याची तरतूद कुठे आहे. नगराध्यक्ष चुकीचा आहे, त्याला बोलावण्याचा अधिकार कुठे आहे? त्या नगराध्यक्ष याने कसेही वागावे, अशी माणसे निरंकुश होतात आणि ती होणार नाही असे सांगत येत नाही.  दीड वर्षांपर्यत ठराव आणता येत नव्हता आणि जर काही अयोग्य वाटलं तर जिल्हाधिकारी याला पाठवावा लागत होते. मग राज्यकर्त्यांकडे अविश्वास ठराव मांडावा लागतो. नियमावलीत करून हे चालणार नाही कायद्यात तरतूद द्या. मुख्यमंत्री तुम्ही हे विधेयक थांबवा. तुमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे तुम्ही ते मंजूर करून घ्याल. 13 कोटी महाराष्टात 56 ते 57 टक्के लोक शहरात राहतात. शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवन नरक यातनेसारखे झाले आहे. नगरविकास विभागाची स्वतंत्र यंत्रणा काय आहे? त्यांचा स्वतंत्र अधिकारी वर्ग नाही

विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे  जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा गटनेते आमदार अनिल पाटील, विधानपरिषदेचे पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे, आमदार दिलीप बनकर, आमदार यशवंत माने, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार संदिप क्षिरसागर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विक्रम काळे, आमदार अनिकेत तटकरे तसेच विधीमंडळ पक्ष कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

तुम्ही नगराध्यक्ष जनतेतून करता मग मुख्यमंत्रीही जनतेतून: अजित पवार 

तुम्ही नगराध्यक्ष जनतेतून करता मग मुख्यमंत्री ही जनतेतून करा ना. मुख्यमंत्री म्हणून असं निवडून यायचं  आणि नगराध्यक्ष मात्र जनतेतून हे योग्य नाही, अजित पवारांचा हल्लाबोल


 

विधानपरिषदेमध्ये मंत्री नसल्याने कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब

विधानपरिषदेमध्ये मंत्री नसल्याने कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब

Maharashtra Monsoon Session LIVE : विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं निवेदन सुरु

 Maharashtra Monsoon Session LIVE :  विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं निवेदन सुरु

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शाखाप्रमुख संतोष यादव यांना मारहाण झाल्याची घटना समोर

शिंदे गटात सामील झालेले मुंबईच्या मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शाखाप्रमुख संतोष यादव यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष यादव यांनी केलाय. वॉर्ड क्रमांक 3 चे शाखाप्रमुख संतोष यादव यांच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आलीय..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक, रवींद्र चव्हाण यांनी बोलावली सर्व आमदाराची बैठक, कोकणातील रस्त्याबाबत आढावा बैठक, *गणपतीमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात त्यातच मुंबई-गोवा हायवेवर सध्या खड्डे पडलेत याबाबत आढावा बैठक सुरू असून, सर्व आमदारांनी गणपती आधी रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी केलीय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक, रवींद्र चव्हाण यांनी बोलावली सर्व आमदाराची बैठक, कोकणातील रस्त्याबाबत आढावा बैठक, *गणपतीमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात त्यातच मुंबई-गोवा हायवेवर साध्य खड्डे पडलेत याबाबत आढावा बैठक सुरू असून, सर्व आमदारांनी गणपती आधी रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी केलीय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक, रवींद्र चव्हाण यांनी बोलावली सर्व आमदाराची बैठक, कोकणातील रस्त्याबाबत आढावा बैठक, *गणपतीमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात त्यातच मुंबई-गोवा हायवेवर साध्य खड्डे पडलेत याबाबत आढावा बैठक सुरू असून, सर्व आमदरानी गणपती आधी रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी केलीय

25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.   

पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावरुन देखील आज तिसऱ्या दिवशी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 


 

दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं  


विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
 
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.


मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला


पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल

दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं चित्र दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं होतं. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.

दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं चित्र दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं होतं. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...


हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं  


विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
 
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.


मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला


पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल


पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावरुन देखील आज तिसऱ्या दिवशी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 


25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


काळ्या अन् पांढऱ्या दाढीवाल्यांवरुन भुजबळांची टोलेबाजी! विधानसभेत फडणवीसांसोबत रंगली जुगलबंदी 


आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.