मुंबई :   राज्यात आज 2138 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2269 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. 


आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज  आठ  कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,77,288 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 13943 सक्रिय रुग्ण


राज्यात एकूण 13943 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 4665  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1798  सक्रिय रुग्ण आहेत.


कोरोनाच्या रुग्णांमध्ये आज पुन्हा वाढ, 23 टक्के अधिक रुग्ण


गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 ची 18313 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जी मंगळवारच्या तुलनेत सुमारे 23 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचबरोबर या काळात 57 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह कोरोना विषाणूची लागण झालेले 20 हजार 742 रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी पोहोचले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या (कोविड-19 सक्रिय प्रकरणे) 1 लाख 45 हजार 26 आहे. यापूर्वी मंगळवारी देशात 14,830 कोरोनाची नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती, तर या काळात 36 जणांचा मृत्यू झाला होता. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशात 18313 नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना संसर्गामुळे आणखी 57 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर देशातील या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5 लाख 26 हजार 167 वर पोहोचली आहे.