एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Resigns : मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो ते उद्या शांतता राखण्याचे आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

मुंबई : शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन  खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुखांचे शेवटचे भाषण ठरले.  उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

शिवसैनिकांनी  कोणताही गोंधळ घालू नये

न्यायदेवतेचा निकाल हा मानला पाहिजे.  लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे धन्यवाद.  उद्या कोणीही शिवसैनिकांनी त्यांच्या मार्गात येऊ नका. कुठलाही गोंधळ घालू नये. या उद्या, आमदारांच्या मार्गात कोणीही येणार नाही. 

एक माणूस विरोधात असेल तर ते माझ्यासाठी लज्जास्पद

माझ्या विरोधात किती लोक याने मला फरक पडत नाही. कुणाकडे किती बहुमत यात मला रस नाही. माझा एक माणुस विरोधात असेल तर ते माझ्यासाठी लज्जास्पद.

शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला पदावरुन खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या

 शिवसेनेने  ज्यांना राजकीय जन्म दिला, शिवसेनाप्रमुखांनी मोठ केलं, शिवसैनिकांनी मोठ केलं त्यांच्या पदरात शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला पदावरुन खाली खेचण्याच पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या.

मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे

आज मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे. शिवसैनिकांनो त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरुन खाली खेचलं याचे पेढे खाऊ द्या, वाटु द्या, त्याचा गोडवा त्यांना लखलाभ. मला शिवसैनिकांच्या आशीर्वादाचा गोडवा हवा, त्यात मला आनंद आहे.

शांतता राखण्याचे आवाहन

देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, परंतु महाराष्ट्रात शांतता राहिली. त्याचे कारण तुम्हीं सर्व बंधु-भगिनी माझ ऐकत होता. 

पुढची वाट सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहिल 

जनतेच्या आशिर्वादाने अनेक काम केली आहे . शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. पुढची वाट सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहणार आहे

चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते

एखागी गोष्ट चांगली सुरू असेल तर त्याला दृष्ट लागले. कोणाची नजर लागली हे सर्वांना माहित आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांचे खास आभार. जनतेच्या आशीर्वादाने चांगल काम करु शकलो. मी आपल्याशी आज मनापासून बोलतोय आणि नेहमीच मनापासूनच बोलत आलोय. 

 बाळासाहेबांनी ज्यांना मोठे  केले ते विसरले

 ज्यांना सत्ता आल्यावर जे जे शक्य होत ते दिले ते लोक नाराज झाले.  साधी साधी माणसं ज्यांना काही दिल नाही ते हिंमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसैनिक. याच नात्याच्या जोरावर अनेक आवाहन शिवसेना परतवीत आली आहे. बाळासाहेबांनी माणसांना मोठ केलं. मोठे झाल्यावर माणस विसरली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
Embed widget