Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन देखील मुंबईत सुरु आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंंद लिफाफ्यात सादर होणार आहे. तर सतीश भोसले उर्फ खोक्याचा...More
*विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी
नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार*
*आमदार डॉ. परिणय फुके यांनी परिषदेत उपस्थित केला प्रश्न
ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती
गडचिरोली जिल्ह्यात 100 ते 150 राईस मिल्स धानाच्या भरडाईचे काम करतात. यातील निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आले. याबाबत काल, 11 मार्च रोजी विधानसभेत प्रश्न मांडण्यात आला. परंतु दोन दिवसांपूर्वी राईस मिल्स कार्यालयातील एजंटसारख्या असलेल्या लोकांनी प्रश्न का लावायचा, लावल्यावर काय होणार आदी चर्चा करीत पैशाची मागणीचाही उल्लेख करण्यात आला. ही संपूर्ण संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचे नमुद करीत यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत केला. या एजंट व नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
धानाच्या भरडाईचे काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील 100 ते 150 राईस मिल्सपैकी सात राईस मिल्सने 2022-23 मध्ये कमी बॅंक गॅरंटी दिली. तीन कोटींच्या बॅंक गॅरंटीवर सात कोटींची भरडाई केली आहे, असा यांच्यावर ठपका ठेवला होता, याकडे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत लक्ष वेधले.
विधानसभेत प्रश्न लावण्याच्या दोन दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप पुढे आल्या आहेत. काहींचे फोनवर संभाषण देखील झाले. या राईस मिल मालकाच्या कार्यालय एजंटसारखे असलेले लोक हा प्रश्न का लावायचा नाही, लावल्यावर काय होणार, अशाप्रकारच्या धमक्या देणाऱ्या क्लिप माझ्याकडे असून मी आज आदरणीय गृहमंत्र्यांना याबाबत सूचना दिली, असे डॉ. परिणय फुके यांनी परिषेदत सांगितले.
या प्रकरणात ब्लॅकमेल करणे किंवा पैशाची मागणी करण्यात आली असून यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश आहे. या एजंट व नेत्यांवर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर मा. अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री श्री योगेशजी कदम, यांनी गरीब लोकांना निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा केला जातो, ही बाब मान्य करीत यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. एवढेच नाही तरी कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते किंवा त्यांचे एजंटांवर तसेच गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. संभाषणाबाबत जी माहिती पुढे आली, ती एकत्रित करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले.
पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार
*पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार
तारापोरवाला मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप मिळणार
*मत्स्यालयाच्या विकासास संयुक्त उपक्रमाद्वारे तत्वतः मान्यता;पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
*सिंधुदुर्ग साठी पर्यटन अधिकाऱ्याचे रिक्त असलेले पद सुद्धा तातडीने भरण्याचे मंत्र्यांचे आदेश
फोटो;;
मुंबई, दि. १२ : तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपयोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, तारापोरवाला येथील मत्स्यालय मुंबईचे आकर्षण होते. त्यामुळे याला आधुनिक स्वरूप दिल्यास पर्यटन वाढीस मदत होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाह्य यंत्रणेद्वारे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेले समुद्र किनाऱ्यावर शौचालय, लाईफ गार्ड ची सुविधा देण्यात यावी, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात- मंत्री नितेश राणे
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले,
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पर्यटन वाढीला मदत होणार आहे, असे मत मंत्री श्री राणे यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊसला खाजगी भागीदार (Public Private Partner) यांचा समावेश करून चालविण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात यावा. यासाठी एका गेस्ट हाऊस वर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावे, अशी मागणी मंत्री श्री. राणे यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष अनुदान देऊन विकास करण्यात यावा, असेही श्री. राणे यांनी सांगितले.
आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी मंत्री श्री. राणे यांनी पर्यटन विभागाकडे केले असून पर्यटन मंत्री यांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.
मुंबई, दि. 12 : 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवन येथे 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड उज्ज्वल निकम, श्री. वासुदेव कामत, श्री.गो. ब. देगूलकर, डॉ शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणा-या तसेच त्याव्दारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीला देण्यात येतो. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेवून असून लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्कारासाठी निवड याबाबत मते मांडली.
रायगड ब्रेकींग
तळा शहरात जोगवाडी आणि तळेगावच्या शंखासुर यांची सलामी पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती
कोकणातील आगळा वेगळा प्रकार
- रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील जोगवाडी मधील शिमगोत्सव हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे.या मंडळाला 150 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. शेवटच्या होळीच्या आदल्या दिवशी जोगवाडी नाक्यावर जोगवाडी चा शंखासुर आणि तळेगावचा शंखासुर या दोघांची भेट होऊन त्यांना सलामी दिली जाते हा क्षण पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून हजारोच्या संखेने भाविक उपस्थित असतात.
Bhokar: मार्च महिन्यातच नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा लागायला सुरुवात झालीये. भोकर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झालीये. पोमानाळा येथील ग्रामस्थानी उपोषण केल्यानंतर टँकर सुरु करण्याचे आश्वासन जिल्हा देण्यात आले होते. अजून तिथे टँकर सुरु झालेले नसताना इतर गावातील पाणी प्रश्न समोर आलाय. आठशे लोकसंख्या असलेल्या जाकापूर गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावातील विहिरीनी तळ गाठलाय. थेंबभर पाणी शेंदण्यासाठी विहिरीच्या पाझरातून पाणी येण्याची तासोनतास वाट पाहावी लागत आहे. जाकापूर तांड्यावरील विहिरीनेही तळ गाठला असून विहिरीतील गढूळ पाणी घेण्यासाठीही गर्दी होत आहे. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही महिनाभरापूर्वी गावात येऊन पाणी टंचाईची खरी परिस्थिती पाहिली होती. गावाने टँकरची रितसर मागणीही केली पण अजून एकही टँकर सुरु करण्यात आले नाही. शेतातील विहिरीत किंवा जिथे शेतात बोअरला पाणी आहे तिथून ग्रामस्थाना पाणी आणावे लागत आहे. पिण्यासाठीही थेंबभर पाणी नसल्याने तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थानी केलीये.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस अक्कलकोट तालुक्यात असणार आहेत. उद्या सकाळी 7.45 वाजता ते अक्कलकोटला पोहोचतील. अक्कलकोट शहरातील शिवपुरी येथे त्यांच्या मुक्काम असून दिवसभरात यज्ञ, दर्शन असे धार्मिक कार्यक्रम आहेत. दुसऱ्या दिवशी (14 मार्च) रोजी दुपारी 4.30 वाजता माजी खासदार श्री सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या श्री क्षेत्र गौडगाव या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी शिवपुरी येथे मुक्काम करून 15 मार्च रोजी अक्कलकोटहून सांगलीकडे रवाना होतील.
२ लाख ३३ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास
Mumbai Crime:- कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध पाजून रेल्वे प्रवाशाच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे
कनार्टक राज्यात जाणाऱ्या पद्दुचेरी एक्स्प्रेसने परतीचा प्रवास करत असताना
पद्दुचेरी एक्स्प्रेस कल्याण स्थानकात येताच एका अज्ञात प्रवाशांन सुनीता बेलकरी यांना कोल्ड्रिंग पिण्यास दिले
सुनीता यांनी प्राशन केलेल्या कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध असल्याने त्यांना अचानक झोप लागल्या सारखे होऊन त्या झोपी गेल्या याच संधीचा फायदा घेऊन चोरटयांनी त्यांच्या अंगावरील २ लाख ३३ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास करत घटनस्थळावरून पळ काढला
दरम्यान अंगावरील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच सुनीता बेळकरी यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रसंग कथन केला त्यानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
पीडित तरुणीला दत्ता गाडे ७५०० रुपये दिले अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती, आरोपीच्या वकिलांची सारवासारव
पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला आज पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गाडे याचे वकील सुमित पोटे यांनी याप्रकरणातील पीडित तरुणीला आरोपी ने ७५०० रुपये दिले अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी कबुली आज दिली.
या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी, पोटे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना आरोपीने पीडित तरुणीला पैसे दिले होते अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती.
आज सुनावणी नंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ७५०० रुपयांचा कुठला ही युक्तिवाद न्यायालयासमोर झाला नसल्याची कबुली दिली. कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो अशी सारवासारव गाडे याचे वकील पोटे यांनी केली. एक वकील म्हणून असं बेजबाबदार वक्तव्य करणं संयुक्तिक आहे का असा प्रश्न माध्यमांनी त्यांना आज विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणे टाळून तिथून काढता पाय घेतला आणि या प्रकरणी सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देऊ असं सांगितलं.
यामुळे ७५०० रुपयाचा विषय न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलिस कारवाई करणार का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
मज्जिद वरील अनधिकृत भोंगे आणि लँड जिहाद या मुद्द्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले असून आज त्यांनी गोरेगाव दिंडोशी परिसरात संतोष नगर मध्ये अनधिकृत पणे मोबाईल टॉवरवर बसवण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्याचा पाहणी करत दिंडोशी पोलीस ठाण्यात जाऊन अनधिकृत टॉवर आणि भोंग्या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत पोलिसांनी देखील यावर नोटीस देऊन लवकरात कारवाई करू असे आश्वासन किरीट सोमय यांना दिले आहे.
कोकणात आजपासून होळी उत्सवाला सुरवात झाली. रत्नागिरी मधील जानवळे या गावात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून ग्रामदेवतेचा शिमगोत्सवास प्रारंभ झाला. सनई आणि ढोलाच्या तालावर पालखी नाचवण्यात चाकरमानी देखील तल्लीन झाल्याचे पहायला मिळत आहे. पुढील पंधरा दिवस कोकणातील गावोगावी ग्रामदैवता घरी येणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव ब्रेकिंग
........
प्रेम प्रकरणातून अमानुष पद्धतीने मारहाण झालेल्या धाराशिव येथील तरुणाची मृत्यूची झुंज सुरू
मारहाण झाल्यापासून तरुण शुद्धीवर नसल्याची आई-वडिलांची माहिती
सोलापुरातील खाजगी रुग्णालयात आठ दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू
एकुलता एक मुलाचं काही बरं वाईट झालं तर आत्महत्या करू आईचा आक्रोश , आरोपीना अटक करत फाशीची शिक्षा देण्याची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रोड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण
मारहाणी नंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिले
रॉड , काठीने सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण
पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण, गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती
तरुण मृत झाल्याचे समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिले
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू, मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल; तिघांना अटक, इतर आरोपी फरार
प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची माहिती
मागच्या आठवडाभरापासून विविध कारणाम्यांनी चर्चेत आलेल्या आणि भाजप आमदार सुरेश धस यांना टिकेचा धनी बनवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला मोठा धक्का बसला आहे..
पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे.. त्यामुळे आता खोक्याची जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे..
एका व्यक्तीला बॅटने मारहाण, वाहनांत नोटांचे बंडलची ठेवाठेव, तसेच सोफ्यावर बसून नोटांचे बंडल जुळवण्यासह शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा करणारे सतीश भोसले उर्फ खोक्याचे व्हिडीओ समोर आले. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहेबाजूने टिका झाली. अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. वनविभागाच्या छाप्यात त्याच्या घरी शिकारीचे साहित्य आणि गांजा आढळल्याने हा देखील गुन्हा नोंद झाला. त्याच्या अटकेसाठी शिरुर बंद करुन मोर्चाही काढण्यात आला. सहा दिवसांपासून फरार असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या बीड पोलिसांनी उत्तर ्रपदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांत जिल्ह्यात आणून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यापुवीच त्याला आणखी एक धक्का बसला आहे...
त्याच्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले..
Anchor- छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 17 तारखेपर्यंत अटके पासून दिलासा मिळालाय... कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे... त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळून लावली... प्रशांत कोरटकरच्या अंतिम जामीनावर आता 17 मार्चला सुनावणी होणार आहे... त्यामुळे 17 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळाला.... इतकच नाही तर ऑनलाईन पद्धतीने देखील प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर राहण्याचं बंधन नाही... कायद्यातील नवीन कलमानुसार अशी तरतूद नसल्याचे सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे... मात्र यामुळे कायद्यात तरतूद नाही ती मागणी पोलिसांनी केलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जातोय... या पाठीमागे दुसराच कुणीतरी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे...
Anchor- छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 17 तारखेपर्यंत अटके पासून दिलासा मिळालाय... कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे... त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळून लावली... प्रशांत कोरटकरच्या अंतिम जामीनावर आता 17 मार्चला सुनावणी होणार आहे... त्यामुळे 17 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळाला.... इतकच नाही तर ऑनलाईन पद्धतीने देखील प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर राहण्याचं बंधन नाही... कायद्यातील नवीन कलमानुसार अशी तरतूद नसल्याचे सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे... मात्र यामुळे कायद्यात तरतूद नाही ती मागणी पोलिसांनी केलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जातोय... या पाठीमागे दुसराच कुणीतरी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे...
Akola Flash :
अकोला पातुर रोडवर बोडखा गावाजवळ मॅक्झिमो गाडी अचानक समोर आल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळल्यामुळे एका महिलेचा करूण अंत. आज दुपारी 4 वाजताची घटना. गंभीर जखमी महिला मनीषा झाटे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व्यक्ती गोपीचंद झाटे हा किरकोळ जखमी झाला आहे. मृतक आणि जखमी हे बार्शीटाकळीमधील मुंगसाजी नगर येथील रहिवासी. घटनास्थळी पातुर पोलीस दाखल.
अमरावती
नवनीत राणा यांना मातृशोक
नवनीत राणा यांच्या आईचं कर्करोगावर उपचार सुरू असतांना मुंबईत झालं निधन
आमदार रवी राणा यांचे सासु व माजी खासदार नवनीत राणा यांची आई राजींदर हरभजनसिंग कौर यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात कर्करोग वरील उपचार सुरू असतांना घेतला अखेरचा श्वास..
आज 12 मार्च रोजी मुंबई गोरेगांव स्मशानभूमी मध्ये होणार सायंकाळी 5 वाजता अत्यंसंस्कार...
माजी खासदार नवनीत राणा यांची आई व आमदार रवी राणा यांच्या सासू राजींदर हरभजनसिंग कौर वय वर्ष 61 मुंबई त्यांचे मुंबईतील लिलावती हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार सुरू होता, मागील काही दिवसापासून माजी खासदार नवनीत राणा ह्या आईच्या सेवेत होत्या, काल अचानक त्यांची प्रकृती गंभीर झाली उपचार सुरु असताना त्यांनि अखेरचा श्वास घेतला..
आज सायंकाळी 5 वाजता हिंदू स्मशान भूमी ओशिवरा गोरेगांव येथे अंत्यसंस्कार होणार आहे... या दुःखद घटनेमुळे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.. दरवर्षीप्रमाणे आदिवासींच्या सानिध्यात जाऊन उभयता होळीचा सण साजरा करत असतात यावर्षी मात्र या दुःखद घटनेमुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत..
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची नितेश राणे वर कारवाई करण्याची मागणी
नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करत व्हिडिओ केला ट्वीट
कणकवली येते "जयश्रीराम बोल" म्हणत नितेश राणेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाच्या शेख अशरफ ला मारहाण केली असा आरोप करत ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी एक व्हिडिओ क्लिप केला.
पीडित शेख हायकोर्टापर्यंत लढतो, कोर्ट सुद्धा कार्यवाहीचे आदेश देतं तरी कुणावरही कार्यवाही नाही.
नितेश राणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी केदार यांनी केली आहे
शेख असरफ हे एकटे लढाई लढताय हा व्हिडीओ जुना आहे पण न्याय अद्याप मिळाला असं ट्विटमध्ये सांगण्यात आलंय
त्यामुळे नितेश राणे वर कार्यवाहीची मागणी त्यांनी केली आहे
देशमुख हत्येचे दु:ख; शतकोत्तर परंपरेला ब्रेक
यंदा नाही जावयाची गदर्भ सवारी
लग्नाच्या वरातीत घोड्यासाठी रुसणाऱ्या जावयाची चक्क गाढवावरुन मिरवणूक आणि रंगापासून दुर असलेल्या मुस्लिम धर्मियांनाही रंगाच्या सणात सहभागी करुन सामाजित एकत्मतेचे दर्शन घडविण्याची किमया विडा ग्रामस्थांनी साधली आहे. मात्र, शिवाशेजारील तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हळहळत असल्याने यंदा विडेकरांनीही या थट्टा मस्करीच्या परंपरेला स्वल्पविराम देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जावयाची धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरील धिंड निघणार नाही. यापूर्वीही कोरोना संसर्गाच्या काळात एक वर्षे असाच या परंपरेला ब्रेक लागला होता.. आता संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुन्हा एकदा ही परंपरा एका वर्षासाठी खंडित झाली आहे
काल अधिवेशनात भोंग्यांविषयी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अवैध भोंग्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील पाहणी केली या पाहणी दरम्यान दिंडोशी परिसरातील मज्जिद ची पाहणी करताना या ठिकाणी मोबाईल टॉवरवर अनधिकृत पणे चार ते पाच भुंगे लावल्याचे या पाहणीत दिसून आले यामुळे आता या मज्जिद आणि भोंग्यांवर कारवाई करावी अशी भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली आहे....
किरीट सोमय्या बाईट
मुंबई दिंडोशी पोलीस आणि महापालिकेला 24 तासाचे मुदत
अनधिकृत भंगे लावणारा विरोधात कारवाई करा
फौजदारी कारवाई केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार
पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागणार
आता हे राहुल गांधी उद्धव ठाकरे यांचे राज्य नाही
काल अधिवेशनात भोंग्यांविषयी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अवैध भोंग्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील पाहणी केली या पाहणी दरम्यान दिंडोशी परिसरातील मज्जिद ची पाहणी करताना या ठिकाणी मोबाईल टॉवरवर अनधिकृत पणे चार ते पाच भुंगे लावल्याचे या पाहणीत दिसून आले यामुळे आता या मज्जिद आणि भोंग्यांवर कारवाई करावी अशी भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली आहे....
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्याला मारहाण
साई बाबा विकास आराखडा संदर्भात बैठक संपल्या नंतर मारहाण
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह ४ जणावर गुन्हा दाखल
पाथरीत काही काळ तणावाचे वातावरण
शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल
परभणीच्या पाथरी नगरपरिषदेमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत साईबाबा विकास आराखड्या संदर्भातील बैठकीनंतर माजी आमदार बाबाजींनी दुरानी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांना मारहाण केलीय आलोक चौधरी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली दिलेल्या तक्रारीवरून बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चार जणांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी नगरपरिषदेमध्ये आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,मुख्याधिकारी कदम यांच्यासह यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची व १४४ मालमत्ताधारकांची साई बाबा विकास आराखड्या बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांनी पाथरी येथील घरकुल आणि शॉपिंग काम्प्लेक्स मध्ये गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर ही बैठक पार पडली आणि सर्व जण खाली येत असताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नगर परिषदेचे गेट जवळ शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांना शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकारामुळे पाथरीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी आलोक चौधरी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन त्या अनुषंगाने बाबाजानी दुर्रानी आणि इतर ३ असे एकुण ४ जणावर विविध कलमान्वये ज्यात सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की,मारहाण,अश्लील शिवीगाळ,धमकी देणे,गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आम्ही या बाबत बाबाजानी दुर्रानी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
पुणे ब्रेकिंग
दत्ता गाडे याला न्यायालयीन कोठडी
दत्ता गाडे याचे पोलिस कोठडी आज संपली
पुणे सत्र न्यायालयात त्याला आज हजर करण्यात आले होते
दत्ता गाडे याचा मोबाईल अद्याप मिळून आलेला नाही
गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
दत्ता गाडे याची येरवडा कारागृहात रवानगी
नागपूर
नागपुरातील प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिर ला 103 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि मंदिराचा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी राम मंदिरात आज दीड लाख दिवे लावून संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आला.
यावेळी दिव्यांची आरास मांडताना प्रभू रामचंद्र यांचं चित्र गदा, धनुष्य, शंख यासारख्या वेगवेगळ्या शुभ चिन्हांची प्रतिकृती साकारण्यात आली होती.....
फटाक्यांची आतिषबाजी सोबत संपूर्ण मंदिर परिसर नाहून निघाला होता... जवळपास पंधराशे रामभक्तांनी यात सहभाग घेत दिवे लावण्यासाठी सहभाग नोंदवला होता.
संजय कदम on पक्षांतर.
मला अनेक पक्षांकडून मला पक्षात येण्यासाठी आमंत्रण....
रामदास कदम यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो....मात्र पक्षांतराच्या बाबतीत मी माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार.
पक्षीय वादातून रामदास कदम आणि माझ्यात संघर्ष होता....
रामदास कदम यांनी माझ्या पक्ष प्रवेशाच्या भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्याचे स्वागत....
माझ्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या लोकांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले....संजय कदमांचा आरोप.
मी पक्ष सोडून गेलो तर काय फरक पडतो ते पुढे कळेल....
शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी त्यांची निवडणूक उरकून घेतली आणि आमच्या निवडणूक काळात फिरकले देखील नाहीत...
नेतेच असे वागत असतील तर कार्यकर्ता काय करणार ???
शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम यांनी पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत.
उध्दव गट सोडण्याच्या बातमीला संजय कदम यांच्याकडून दुजोरा.
कत्तलखान्याकडं पाठविण्यात येणाऱ्या ६५ जनावरांची पोलिसांनी केली सुटका
चारा पाण्याविना निर्दयपणे दोरखंडाला बांधून ठेवलेली होती जनावरं
मध्यप्रदेशातून आणलेली ही जनावरं भंडाऱ्याच्या टेमनी गावात ठेवली होती बांधून
भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Anchor : मध्यप्रदेशातून आणलेली जनावरं नागपूरच्या कामठी येथील कत्तलखान्याकडं पाठविण्यात येणार होती. मात्र, ही सर्व ६५ जनावरं तस्करांनी भंडाऱ्याच्या टेमनी गावात चारा आणि पाण्याविना आखूड दोरखंडांनं अत्यंत निर्दयपणे जखडून बांधून ठेवली होती. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६५ जनावरांची सुटका करून त्यांना गोरक्षण संस्थेत पाठविण्यात आलं आहे. ही कारवाई सिहोरा पोलिसांनी तुमसर तालुक्यातील टेमनी या गावात केली. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपये किमतीची ६५ जनावरे आणि ४ लाख रुपये किंमतीची पिकअप वाहन असा १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
यांच्यावर केला गुन्हा दाखल
१) शैलेश भोंडेकर (४५) - टेमनी
२) संजय बरेकर (४०) - टेमनी
३) फद्दू उर्फ राजेंद्र चांडेकर (५३) मध्यप्रदेश
४) राजू बर्वे (३८) - मध्यप्रदेश
पुणे
स्वारगेट प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे
सुनावणीला होणार सुरुवात
आज दत्ता गाडे याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे केलं जाणार हजर
कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
गुणी शाखेचे पोलिस दत्ता गाडे याला घेऊन कोर्टात हजर
महापालिकेचं हायकोर्टात स्पष्टीकरण, महापालिकेच्या अधिकृत अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय राजकीय पक्षांचे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक किंवा गृहनिर्माण सोसायट्यांसारख्या खासगी परिसरात ध्वज, जाहिरात फलक लावणं बेकायदेशीर
खासगी ठिकाणी बेकायदेशीररित्या लावण्यात आलेल्या ध्वजांविरोधातील तक्रारींची दखल घेऊन कशी आणि काय कारवाई केली?, हायकोर्टाचा सवाल
यासंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत महानगरपालिकेतर्फे प्रतिज्ञापत्र सादर
ब्रेक
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या
जिल्ह्याव्यापी मेळावे घेण्यात येणार
8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेण्यात येणार
12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा दिला इशारा
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम असून आमची लढाई आम्हीच लढणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे…
मिरजेत प्लास्टिक कारखान्याला भीषण आग..आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक.. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
अँकर :- मिरज येथील शंभर फुटी रस्त्यावर असणाऱ्या एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागलीय. संबंधित कारखान्या शेजारी रस्त्यावरील कचरा पेटवण्यात आला होता. परंतु या कचऱ्याला लावण्यात आलेली आग प्लास्टिक कारखान्यातील प्लास्टिकला लागली. त्यामुळे पाहता क्षणी प्लास्टिक कारखान्यातील प्लास्टिकला देखील ही आग लागली. संबंधित कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असून या प्लास्टिकला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे आगीचे लोट परिसरात पसरलेत. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे तसेच कंपनीत प्लास्टिक असल्यामुळे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु या आगीत कंपनी जळून पूर्णपणे खाक झालीये.
कोल्हापूर
विवेक शुक्ल, सरकारी वकील
भारतीय न्याय संहिता नुसार प्रत्यक्ष हजर राहण्याची तरतूद नाही
नवीन कायद्यात सुधारणा केली आहे
मात्र याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही
जामीनाच्या मुद्द्यावर अंतिम सुनावणी होईपर्यंत अटक करता येणार नाही
व्ही सी द्वारे देखील प्रशांत कोरटकरला उपस्थित राहण्याचे बंधन नाही
नवीन कायद्यानुसार तरतूद नाही तर मागणी करून उपयोग काय?
फ्लॅश
तीस वर्षीय विकृत तरुणाने पेटवून दिलेल्या 17 वर्षीय मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान 10 दिवसानंतर मुलीचा मृत्यू
अंधेरी पूर्वकडील एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याचा हद्दीत 10 दिवसापूर्वी विकृत तरुणाने पेट्रोल टाकून 17 वर्षीय मुलीला पेटवून दिल्याची घटना घडली होती
या घटनेत मुलगी ६० टक्के पेक्षा अधिक जळून जखमी झाली होती
तर पेट्रोल टाकणारा तरुणही आगीमुळे भाजून जखमी झाला होता
दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू होते,उपचारादरम्यान मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झाली आहे...
एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.
कोल्हापूर
प्रशांत कोरटकर याने दिलेल्या धमकी प्रकरणी सुनावणी सुरू
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा
17 तारखेपर्यंत प्रशांत कोरडकरला अटकेपासून दिलासा
प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं
व्हीसीद्वारे हजर राहण्याची देखील प्रशांत कोरटकरला सक्ती नाही
पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळली
17 मार्च रोजी सुनावणी होणार
मीरा रोड : मीरा रोड येथील लोंढा परिसरातील सीता स्मृती बिल्डिंगमध्ये आज दुपारी २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे मीटर रूमला भीषण आग लागली होती. आगीचे लोट एवढे प्रचंड होते की ज्वाळा पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचल्या, त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली होती.
घटनास्थळी मिरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तसेच घटनास्थळी आता अधिकृत तपास सुरू आहे.
मल्हार सर्टिफिकेशन मध्ये मल्हार नावाला जेजुरीकरांचा विरोध tt
ग्रामस्थ ,सेवेकरी,पुजारी,मानकरी व माजी विश्वस्थांचा विरोध
सर्टिफिकेशन ला विरोध नाही पण मल्हार नाव वापरू नका
मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलय. यानंतर श्रीमार्तंड देवसंस्थानाच्या विश्वस्त मंडळाने या नावाला पाठिंबा दिलाय. मात्र जेजुरीतील नागरिकांनी या नावाला विरोध दर्शवलाय.ग्रामस्थ, पुजारी, खांदेकरी सेवेकरी आणि माजी विश्वस्त यांनी या नावाला विरोध असल्याचं म्हटलय. मार्तंड देवस्थानी भाविकांनी सोयी सुविधा देण्याचं काम करावं या देवाच्या बाबतीत मार्तंड देवस्थाने हस्तक्षेप करू नये अशी देखील गावकऱ्यांची मागणी आहे .
मुंबई – वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरात पार्किंगची समस्या गंभीर होत असताना, मुंबई महापालिकेने यावर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मोबाइल ॲपद्वारे वाहनतळाची उपलब्धता तपासता येणार आहे. यासाठी महापालिकेने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह अन्य तांत्रिक कामांसाठी पुन्हा निविदा जारी केली आहे.
सध्या मुंबईतील वाहनांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली असून, त्यापैकी २९ लाख दुचाकी आहेत. मात्र, मेट्रो प्रकल्प आणि विविध विकासकामांमुळे रस्त्यावरील पार्किंगची जागा कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ उभारण्याबरोबरच रस्त्यावरील पार्किंग सुविधांमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या नव्या ॲपसेवेच्या मदतीने वाहनचालकांना पार्किंगची जागा शोधणे अधिक सोपे होणार आहे.
Beed: ग्रामपंचायत निवडणुकीवरून मारामारी करणारे दादा खिंडकर यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तीन वर्षांपूर्वी गावातील विरोधक परमेश्वर सातपुते यांच्या घरावर त्यांनी हल्ला केला होता यावेळी त्याच्या गाडीची नादुस करण्यात आली आणि घरामध्ये महाराणीच्या भीतीने बसलेल्या परमेश्वर सातपुते ला यावेळी धमक्या देण्यात आल्या..
बाबळगाव चे सरपंच दादा खिंडकर याने परमेश्वर सातपुते च्या गाडीवर कसा हल्ला केला आहे हे आपल्याला यातून स्पष्ट दिसत आहे
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने त्याच्या झळा आता लहान लहान मुलांनाही बसू लागले असून शाळेची वेळ कमी करा अशी मागणी आता मुले करू लागली आहेत. मुलांचे हाल पाहून उबाठा युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे. एका बाजूला उन्हाच्या जाळ्यांनी अंग भाजून निघत असताना सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची वेळ ही सकाळी साडे सात ते साडे बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे .जिल्हा परिषद शाळे मध्ये हे गरीब शेतकऱ्यांची मुले चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पायी चालत शाळेकडे येत असतात. .साडे बारा वाजता शाळा सुटल्या नंतर ह्या मुलांना भर उन्हात चालत पाय पीट करत घरी जावे लागते .सद्या बाराच्या नंतर उन्हाची तीव्रता भयंकर वाढली असून सूर्य आग ओकात असल्या मुळे ह्या शाळकरी मुलांना उन्हाचे चटके सोसत घरी जावे लागते . ह्या आग ओकणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता याची सुरुवात म्हणून युवा सेनेच्या वतीने अकलूज चे प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांना शिवसेना युवा सेनेच्या वतीने निवेदन देऊन शाळेची वेळ साडे सात ते साडे अकरा करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा युवा सेनेच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील सैलानी बाबांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. सैलानी बाबा दर्गा परिसरात मानसिक रुग्ण बरा होतो, मागितलेली मन्नत पूर्ण होते... अशी धारणा घेऊन बिहार ,छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश ,आंध्र प्रदेश ,उत्तर प्रदेश सह राज्यभरातून लाखो भाविक व मोठ्या प्रमाणात सैलानी बाबांचे भक्त या ठिकाणी महिनाभर येत असतात. पुढील महिनाभर ही यात्रा असणार आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी चोख अशी व्यवस्था केली आहे. होळीच्या दिवशी म्हणजे उद्या या ठिकाणी शेकडो ट्रक नारळांची होळी पेटवण्यात येते हा संपूर्ण कार्यक्रम बघण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते.
सातारा : कराड सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. मी या कारखान्याचा सभासद नसलो तरी या कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता खा. उदयनराजे यांनी केलं आहे. कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती मात्र ती मिळाली नाही. कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं खासदार उदयनराजे यांनी सांगितला आहे.
नांदेड : बाजारपेठेत शेजारच्या तेलंगणा राज्यातील हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झालीय, त्यामुळे हळदीचा भाव आता चौदा हजारांहून अकरा हजार रुपये क्विंटल इतका घसरलाय. हळदीचे भाव आणखीन घसरून नुकसान होऊ नये यासाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू असून तळपत्या उन्हात हळद काढणीची कामे केल्या जातायत. सद्यस्थितीत अकरा हजार रुपये क्विंटल असलेला भाव गाठण्यासाठी शेतकरी दिवसरात्र एक करत हळद काढणी करत आहे. त्यामुळे सध्या शेत शिवारात शेतकऱ्यांची हळद काढणीसाठी लगीनघाई सुरू असल्याचे चित्र आहे.
सातारा : जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार गावाच्या हद्दीतील गणेश पेट्रोल पंपावर दरोडा पडला आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोन दरोडेखरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून तब्बल सव्वा लाखाची रोकड लंपास केली. हल्ल्यात कर्मचारी परशुराम दुपटे हा जखमी झाला आहे. दरोडेखोरांचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्यामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमधे दिसल्याचा दावा स्थानिक नागरीक करत आहेत. स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर कृष्णा आंधळे आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून पसार झाल्याचा दावा केला जात आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत, एका cctv मध्ये रस्त्यावरून दुचाकीवरून जाताना दोन जण दिसत आहेत, तीच व्यक्ती कृष्णा आंधळे असल्याचा प्रत्यक्षदर्शी दावा करत आहेत. स्थानिकांच्या दाव्यानुसार पोलीस तपास करत आहेत, मात्र दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आणि गाडीचा नंबर ही दिसत नाही त्यामुळे संशयिताचा माग काढण्याचे पोलीस समोर आव्हान आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलीसांनी तीन पथके रवाना केले असून त्याच्या प्रयत्न cctv फुटेज पाठवले जाणार आहे. त्यामध्यमातून पुढचा तपास सुरू आहे
स्वारगेट बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. पीडीतेने असिम सरोदे यांना सरकारी वकील नेमावं म्हणून मागणी केली होती. पीडीतेची मागणी धुडकावून पुणे पोलिसांकडून ॲड अजय मिसर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय.
संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमधे बघितल्याचा स्थानिकांचा दावा
गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मन्दिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची स्थानिकांची माहिती
स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
Cctv फूटेज ची तपासणी करून पोलीस खातरजमा करणार
तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा होता असे वर्णन स्थानिक सांगत आहेत
नागरिकांनी हटकलयांतर मोटारसायकल वरून पळून गेल्याचा नागरिकांचा दावा
नागरिकांना दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे की इतर कोणीं याचा घेतला जातोय शोध
पुणे : काही दिवसांपूर्वी याच बस स्थानकावर एका 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार झाला होता आणि त्यानंतर या बस स्थानकावर पुरेशी सुरक्षा ठेवली जाणार अशी अपेक्षा होती मात्र या बस स्थानकावरची मध्यरात्रीच खंडित झाल्याचं समोर आलंय. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या बस स्थानकावर किती प्रमाणात सुरक्षा पोहोचवली जाते हे दिसून येतंय.
एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर वीज खंडित होत असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची सोय आहे का आणि असेल तर ते वेळेत सुरू का नाही झालं एवढंच नाही तर मध्यरात्री सुनसान असताना जर वीज खंडित होत असेल आणि कोणतीही सुरक्षा दिसत नसेल तर याला जबाबदार नेमकं कोण? असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
पुणे : काही दिवसांपूर्वी याच बस स्थानकावर एका 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार झाला होता आणि त्यानंतर या बस स्थानकावर पुरेशी सुरक्षा ठेवली जाणार अशी अपेक्षा होती मात्र या बस स्थानकावरची मध्यरात्रीच खंडित झाल्याचं समोर आलंय. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या बस स्थानकावर किती प्रमाणात सुरक्षा पोहोचवली जाते हे दिसून येतंय.
एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर वीज खंडित होत असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची सोय आहे का आणि असेल तर ते वेळेत सुरू का नाही झालं एवढंच नाही तर मध्यरात्री सुनसान असताना जर वीज खंडित होत असेल आणि कोणतीही सुरक्षा दिसत नसेल तर याला जबाबदार नेमकं कोण? असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
पुणे : काही दिवसांपूर्वी याच बस स्थानकावर एका 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार झाला होता आणि त्यानंतर या बस स्थानकावर पुरेशी सुरक्षा ठेवली जाणार अशी अपेक्षा होती मात्र या बस स्थानकावरची मध्यरात्रीच खंडित झाल्याचं समोर आलंय. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या बस स्थानकावर किती प्रमाणात सुरक्षा पोहोचवली जाते हे दिसून येतंय.
एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर वीज खंडित होत असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची सोय आहे का आणि असेल तर ते वेळेत सुरू का नाही झालं एवढंच नाही तर मध्यरात्री सुनसान असताना जर वीज खंडित होत असेल आणि कोणतीही सुरक्षा दिसत नसेल तर याला जबाबदार नेमकं कोण? असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
पुणे : काही दिवसांपूर्वी याच बस स्थानकावर एका 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार झाला होता आणि त्यानंतर या बस स्थानकावर पुरेशी सुरक्षा ठेवली जाणार अशी अपेक्षा होती मात्र या बस स्थानकावरची मध्यरात्रीच खंडित झाल्याचं समोर आलंय. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या बस स्थानकावर किती प्रमाणात सुरक्षा पोहोचवली जाते हे दिसून येतंय.
एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर वीज खंडित होत असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची सोय आहे का आणि असेल तर ते वेळेत सुरू का नाही झालं एवढंच नाही तर मध्यरात्री सुनसान असताना जर वीज खंडित होत असेल आणि कोणतीही सुरक्षा दिसत नसेल तर याला जबाबदार नेमकं कोण? असे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधे अटक करण्यात आली आहे. बीड पोलिस आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली आहे.
वसई : वसई-विरार परिसरातील चाळ माफिया आता थेट लोकल ट्रेनमधून जाहिरातीच्या माध्यमातून गोरखधंदा सुरू करताना दिसत आहेत. “बैठ्या चाळीत फक्त १ लाख भरा आणि स्वस्तात घर मिळवा” अशा जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये लावण्यात आल्या असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. एका बाजूला वसई-विरार महापालिका आणि प्रशासन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होत आहेत. मात्र, दुसरीकडे चाळ माफिया खुलेआम लोकल ट्रेनमध्ये जाहिराती लावून नागरिकांना फसवत आहेत. स्वस्त घराच्या आमिषाने हे गोरगरीब नागरिकांना आकर्षित करत असून, प्रत्यक्षात ही घरे अनधिकृत असण्याची शक्यता आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या बेकायदेशीर जाहिराती तात्काळ हटवाव्यात आणि संबंधित चाळ माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sindhudurg News: अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. हे साठे सिंधुदुर्गातील मालवणजवळ पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील समुद्रात आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. या नव्या साठ्याचे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या उत्खनन करणार आहेत. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. २०१७ मध्ये सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे असल्याने तेल उत्पादन ४ पटीने वाढणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. डहाणूच्या समुद्रात ५,३३८.०३ आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात १३ हजार १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत.
Sindhudurg News: अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. हे साठे सिंधुदुर्गातील मालवणजवळ पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील समुद्रात आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. या नव्या साठ्याचे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या उत्खनन करणार आहेत. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. २०१७ मध्ये सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे असल्याने तेल उत्पादन ४ पटीने वाढणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. डहाणूच्या समुद्रात ५,३३८.०३ आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात १३ हजार १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे..
या सुनावणीला संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा स्वतः कोर्टामध्ये हजर राहणार आहे..
आज कोर्टामध्ये चार्ज फ्रेम केले जाणार असल्याने सगळे आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता..
आरोपी कोर्टात आणण्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? याचाही पोलीस विचार करणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मढी ग्रामसभेच्या ठरवला दिली स्थगिती...
मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी केली होती याचिका दाखल...
मढी यात्रेदरम्यान मुस्लिम व्यवसायिकांना व्यापार करण्यास जागा देणार नसल्याचा केला होता ग्रामसभेत ठराव....
ठरावाला स्थगिती भेटल्याने मुस्लिम व्यापाऱ्यांना करता येणार मढी यात्रे दरम्यान व्यवसाय...
मात्र आता याबाबत मढी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मढी ग्रामसभेच्या ठरवला दिली स्थगिती...
मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी केली होती याचिका दाखल...
मढी यात्रेदरम्यान मुस्लिम व्यवसायिकांना व्यापार करण्यास जागा देणार नसल्याचा केला होता ग्रामसभेत ठराव....
ठरावाला स्थगिती भेटल्याने मुस्लिम व्यापाऱ्यांना करता येणार मढी यात्रे दरम्यान व्यवसाय...
मात्र आता याबाबत मढी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध आजारांवरील उपचारांसाठी गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. याच धर्तीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून एकाच दिवसात १७१ रुग्णांना तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
कुबेर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडाराच्या तुमसर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. वाहनांमधून पडणाऱ्या वाळूवरून वाहनं भरधाव जात असल्यानं तुमसर शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दिवसभरात शेकडो ट्रक, ट्रिप्पर आणि ट्रॅक्टर शहरातून धावत असल्यानं नागरिकांना श्वसन, डोळ्याचे आजार, सर्दी, खोकला यासह विविध आजारांचा धोका निर्माण झालाय. हवेची गुणवत्ता ढासळल्यानं शहरातून आवागमन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सराफा आणि धानाची व्यापारपेठ म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेल्या तुमसरात आता वाळूचीही मोठी वाहतूक होत असल्यानं त्यातून धावणाऱ्या वाहनांमुळेचं हवेची गुणवत्ता ढासळल्याचा रोष नागरिक व्यक्त करीत आहे.
भारताला आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे पण त्यासाठी आपल्याला एक व्हावे लागेल, आधी कट्टर हिंदू परिवार तयार करावे लागतील त्यांनंतर हिंदू तालुके आणि जिल्हा आणि शेवटी हिंदू राष्ट्र तयार होईल असे वक्तव्य बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी केलय. नांदेडच्या शिवपुराण कथेत बोलताना बागेश्वर बाबांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आलय.
राज्यातील धरणसाठ्यात यंदा निम्म्याहून अधिक पाणीसाठा, मात्र वाढत्या उकाड्यामुळे चिंता कायम
राज्यातील धरणसाठ्यात ५४ टक्के पाणीसाठा शिल्लक
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के पाणीसाठा अधिक
मागील वर्षी याचवेळी साधारण ४४ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता
नागपूर विभागात ५०, अमरावती विभागात सर्वाधिक ५९ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक
मराठवाड्यात देखील ५२.५० टक्के पाणीसाठा, यंदा जायकवाडीत ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध
मागील वर्षी याचवेळी मराठवाड्यात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता
नाशिक विभागात देखील ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, मागील वर्षी याचवेळी ४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता
पुण्यात यंदा ५४ टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता
कोयना धरणात यंदा ६६ टक्के पाणीसाठा तर उजनीत पाणीसाठा ४५ टक्क्यांपर्यंत शिल्लक
कोकणात देखील ५८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध
मागील वर्षी याचवेळी ३९ टक्के पाणीसाठा मुंबईतील तलावांमध्ये शिल्लक होता
- सतीश उर्फ खोक्या भोसलेचे पाय अजून खोलात
- 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग व पोलिसांनी केलेल्या झाडाझडी सापडला गांजा.
- काळ्या बाजारात 7 हजार 200 रुपये किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा वनविभागाने केला होता जप्त.
- सतीश भोसलेच्या घरातून त्यादिवशी प्राण्याचे वाळलेलं मास सुद्धा करण्यात आले होते जप्त.
- वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात NDPS कायद्या अंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल.
- सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीनात नवा अडथळा.
- आठवडाभरात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल.
७०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्या
आमदार अजय चौधरींकडून मुंबईतील घराच्या करमाफीच्या मुद्यावर लक्षवेधी मांडली जाणार
मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुंबईतले आमदार लक्षवेधीद्वारे आज विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार
मुंबईतील पुर्नविकसित रखडलेल्या प्रकल्पावर देखील विधानसभेत चर्चा होणार
७०० स्क्वेअर फुटाच्या घरांना करमाफी मिळणार का याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे लक्ष
तळोदा नगरपालिका विरोधात शहरातील नागरिक आक्रमक....
पालिका विरोधात ढोलबाजाव आंदोलन......
कचरा संकलन होत नसल्याने नागरिक संतप्त....
गावातील कचरा एकत्र करत टाकला तळोदा नगरपालिकेत...
तळोदा नगरपालिकेत श्रीराम सोशल ग्रुपने टाकला कचरा....
वारंवार तक्रार देऊनही तळोदा नगरपालिका स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप....
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये.
अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळले, तर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल
बृहन्मुंबई महापालिकेने दिला इशारा
हा सण साजरा करताना अवैधरीत्या झाडांची कत्तल करू नये
सणाचा आनंद आणि पावित्र्य राखताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी
वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यास माहिती द्यावी किंवा
महापालिकेच्या '१९१६' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले
नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा
अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राणेंना पत्र
परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी राणेंच्या भूमिकेला जाहीर केला पाठिंबा
मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात गांजा घेऊन आलेल्या दोन आंतरराज्यीय गांजा तस्करांना तुमसर पोलिसांनी अटक केली. दोन्हीही गांजा तस्कर भंडार्यात गांजा घेऊन येत असल्याची माहिती तुमसर पोलिसांना मिळाली होती. तुमसरच्या खापा चौकात सापळा रचून या दोघांना थांबवून त्यांच्या झडती घेतली असता दुचाकीच्या सीटखाली हा गांजा लपवून त्याची वाहतूक करीत असल्याचं निष्पन्न झालं. या कारवाईत तुमसर पोलिसांनी भुरा सिंग धाकड (४५) आणि यशवंत सिंग धाकड (२५) दोघेही रायसेन मध्यप्रदेश या दोघांनांही ताब्यात घेत त्यांच्याकडून एका दुचाकीसह साडेसहा किलो गांजा असा १ लाख ८१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रोड, काठीने अमानुष मारहाण
मारहाणी नंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिले
रॉड , काठीने सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण
पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण, गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती
तरुण मृत झाल्याचे समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिले
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू, मुख्य आरोपीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक
उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत वाढ
मुंबईतील विजेची मागणी ३ हजार ५०० मेगावॅटवर पोहोचली
संपूर्ण राज्याची विजेची मागणी २९ हजार ७२८ मेगावॅटवर
वाढत्या उकाड्यामुळे विजेच्या मागणीत आणखी भर पडणार
अशात, राज्याची विजेची मागणी ३१ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता
धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर तेथील प्रसाद सेवन केल्यानंतर जवळचं असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ली. यानंतर ३० भाविकांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी जवळचं असलेल्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी प्रसाद आणि पाणीपुरी खाल्ल्यानं त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी विरोधी, जनविरोधी, पर्यावरण विरोधी व भ्रष्टाचार युक्त असा गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेवर लादत आहेत. बारा जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले या विरोधातील शेतकऱ्यांचा मोर्चा आता म्हणून 12 मार्च रोजी आझाद मैदान मुंबईमध्ये विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान होणार आहे. या आंदोलनामध्ये विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी,आ. आदित्य ठाकरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार रोहित पाटील, आमदार जयंत आसगावकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते आंदोलनामध्ये येऊन सक्रिय पाठिंबा देणार आहेत.
मुंबई: होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसोबत त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमुळे रेल्वे स्थानकांवर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागांतील प्रमुख स्थानकांवर ही निर्बंध लागू असतील. होळीच्या काळात गर्दीचा भार कमी करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसोबत विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र, स्थानकांवर नियंत्रण ठेवणे सुरक्षारक्षकांसाठी कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई – लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात गेल्या २० वर्षांत १२५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रस्टने १७ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सात माजी विश्वस्त, उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी बहुतांश जण दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असलेले अनिवासी भारतीय आहेत.
नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वर आणि त्यांचे बलिदान झालेल्या तुळापूरसाठी निधी देऊन तेथे विकास करण्याची घोषणा करण्यात आली...मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात तब्बल 33 दिवस ज्या धर्मवीर गडावर ठेवण्यात आले...जिथे औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला, जी भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झाली, त्या श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाच्या विकासासाठी कोणताही निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला...त्यामुळेच धर्मवीर गडाला निधी मिळावा आणि तेथे देखील विकास व्हावा, ज्यामुळे येणाऱ्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा मिळेल अशी भावना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केली...अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान विधानसभेत ते बोलत होते...खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना नमन करायचे असेल आणि ज्या भूमीत त्यांचे रक्त सांडले त्याला नमन करायचे असेल तर धर्मवीर गडाचा देखील विकास व्हायला हवा असं मत आमदार पाचपुते यांनी व्यक्त केलं.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...