Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन देखील मुंबईत सुरु आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 12 Mar 2025 08:17 AM
तुमसर शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली

 कुबेर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडाराच्या तुमसर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. वाहनांमधून पडणाऱ्या वाळूवरून वाहनं भरधाव जात असल्यानं तुमसर शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दिवसभरात शेकडो ट्रक, ट्रिप्पर आणि ट्रॅक्टर शहरातून धावत असल्यानं नागरिकांना श्वसन, डोळ्याचे आजार, सर्दी, खोकला यासह विविध आजारांचा धोका निर्माण झालाय. हवेची गुणवत्ता ढासळल्यानं शहरातून आवागमन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सराफा आणि धानाची व्यापारपेठ म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेल्या तुमसरात आता वाळूचीही मोठी वाहतूक होत असल्यानं त्यातून धावणाऱ्या वाहनांमुळेचं हवेची गुणवत्ता ढासळल्याचा रोष नागरिक व्यक्त करीत आहे.

हिंदू राष्ट्र करण्याआधी कट्टर हिंदू परिवार करणे गरजेचे - बागेश्वर बाबा

भारताला आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे पण त्यासाठी आपल्याला एक व्हावे लागेल, आधी कट्टर हिंदू  परिवार तयार करावे लागतील त्यांनंतर हिंदू तालुके आणि जिल्हा आणि शेवटी हिंदू राष्ट्र तयार होईल असे वक्तव्य बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी केलय. नांदेडच्या शिवपुराण कथेत बोलताना बागेश्वर बाबांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आलय. 

राज्यातील धरणसाठ्यात यंदा निम्म्याहून अधिक पाणीसाठा, मात्र वाढत्या उकाड्यामुळे चिंता कायम 

राज्यातील धरणसाठ्यात यंदा निम्म्याहून अधिक पाणीसाठा, मात्र वाढत्या उकाड्यामुळे चिंता कायम 


राज्यातील धरणसाठ्यात ५४ टक्के पाणीसाठा शिल्लक 


मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के पाणीसाठा अधिक 


मागील वर्षी याचवेळी साधारण ४४ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता 


नागपूर विभागात ५०, अमरावती विभागात सर्वाधिक ५९ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक 


मराठवाड्यात देखील ५२.५० टक्के पाणीसाठा, यंदा जायकवाडीत ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध 


मागील वर्षी याचवेळी मराठवाड्यात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता 


नाशिक विभागात देखील ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, मागील वर्षी याचवेळी ४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता 


पुण्यात यंदा ५४ टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता 


कोयना धरणात यंदा ६६ टक्के पाणीसाठा तर उजनीत पाणीसाठा ४५ टक्क्यांपर्यंत शिल्लक 


कोकणात देखील ५८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक 


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध 


मागील वर्षी याचवेळी ३९ टक्के पाणीसाठा मुंबईतील तलावांमध्ये शिल्लक होता

- सतीश उर्फ खोक्या भोसलेचे पाय अजून खोलात

- सतीश उर्फ खोक्या भोसलेचे पाय अजून खोलात
- 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग व पोलिसांनी केलेल्या झाडाझडी सापडला गांजा.


- काळ्या बाजारात 7 हजार 200 रुपये किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा वनविभागाने केला होता जप्त.


- सतीश भोसलेच्या घरातून त्यादिवशी प्राण्याचे वाळलेलं मास सुद्धा करण्यात आले होते जप्त.


- वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात NDPS कायद्या अंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल.


- सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीनात नवा अडथळा.


- आठवडाभरात  शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल.

७०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्या 

७०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्या 


आमदार अजय चौधरींकडून मुंबईतील घराच्या करमाफीच्या मुद्यावर लक्षवेधी मांडली जाणार 


मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुंबईतले आमदार लक्षवेधीद्वारे आज विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार


मुंबईतील पुर्नविकसित रखडलेल्या प्रकल्पावर देखील विधानसभेत चर्चा होणार


७०० स्क्वेअर फुटाच्या घरांना करमाफी मिळणार का याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे लक्ष

तळोदा नगरपालिका विरोधात शहरातील नागरिक आक्रमक

तळोदा नगरपालिका विरोधात शहरातील नागरिक आक्रमक....


पालिका विरोधात ढोलबाजाव आंदोलन......


कचरा संकलन होत नसल्याने नागरिक संतप्त....


गावातील कचरा एकत्र करत टाकला तळोदा नगरपालिकेत...


तळोदा नगरपालिकेत श्रीराम सोशल ग्रुपने टाकला कचरा....


वारंवार तक्रार देऊनही तळोदा नगरपालिका स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप....

बृहन्मुंबई महापालिकेने दिला इशारा 

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. 


अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळले, तर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल


बृहन्मुंबई महापालिकेने दिला इशारा 


हा सण साजरा करताना अवैधरीत्या झाडांची कत्तल करू नये


सणाचा आनंद आणि पावित्र्य राखताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी 


वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यास माहिती द्यावी किंवा 


महापालिकेच्या '१९१६' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले

नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा

नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा


अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राणेंना पत्र


परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी राणेंच्या भूमिकेला जाहीर केला पाठिंबा

भंडाऱ्यात आंतरराज्यीय दोन तस्करांना साडेसहा किलो गांजासह अटक

मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात गांजा घेऊन आलेल्या दोन आंतरराज्यीय गांजा तस्करांना तुमसर पोलिसांनी अटक केली. दोन्हीही गांजा तस्कर भंडार्यात गांजा घेऊन येत असल्याची माहिती तुमसर पोलिसांना मिळाली होती. तुमसरच्या खापा चौकात सापळा रचून या दोघांना थांबवून त्यांच्या झडती घेतली असता दुचाकीच्या सीटखाली हा गांजा लपवून त्याची वाहतूक करीत असल्याचं निष्पन्न झालं. या कारवाईत तुमसर पोलिसांनी भुरा सिंग धाकड (४५) आणि यशवंत सिंग धाकड (२५) दोघेही रायसेन मध्यप्रदेश या दोघांनांही ताब्यात घेत त्यांच्याकडून एका दुचाकीसह साडेसहा किलो गांजा असा १ लाख ८१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रोड, काठीने अमानुष मारहाण 

धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रोड, काठीने अमानुष मारहाण 


मारहाणी नंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिले 


 रॉड , काठीने सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण


पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण, गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती 


तरुण मृत झाल्याचे समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिले 


मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू,  मुख्य आरोपीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल,  तिघांना अटक

उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत वाढ 

उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत वाढ 


मुंबईतील विजेची मागणी ३ हजार ५०० मेगावॅटवर पोहोचली 


संपूर्ण राज्याची विजेची मागणी २९ हजार ७२८ मेगावॅटवर 


वाढत्या उकाड्यामुळे विजेच्या मागणीत आणखी भर पडणार 


अशात, राज्याची विजेची मागणी ३१ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता

भंडाऱ्यात ३० भाविकांना अन्नातून विषबाधा

धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर तेथील प्रसाद सेवन केल्यानंतर जवळचं असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ली. यानंतर ३० भाविकांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी जवळचं असलेल्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी प्रसाद आणि पाणीपुरी खाल्ल्यानं त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हजारो शेतकऱ्यांचा धडक गळफास मोर्चा

शेतकरी विरोधी, जनविरोधी, पर्यावरण विरोधी व भ्रष्टाचार युक्त असा गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेवर लादत आहेत. बारा जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले या विरोधातील शेतकऱ्यांचा मोर्चा आता म्हणून 12 मार्च रोजी आझाद मैदान मुंबईमध्ये विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान होणार आहे. या आंदोलनामध्ये विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी,आ. आदित्य ठाकरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार रोहित पाटील, आमदार जयंत आसगावकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते आंदोलनामध्ये येऊन सक्रिय पाठिंबा देणार आहेत.

होळीच्या गर्दीवर नियंत्रण: मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, 16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद

मुंबई: होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसोबत त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमुळे रेल्वे स्थानकांवर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागांतील प्रमुख स्थानकांवर ही निर्बंध लागू असतील. होळीच्या काळात गर्दीचा भार कमी करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसोबत विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र, स्थानकांवर नियंत्रण ठेवणे सुरक्षारक्षकांसाठी कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लीलावती रुग्णालयात १२५० कोटींचा गैरव्यवहार १७ जणांविरोधात एफआयआर 

मुंबई – लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात गेल्या २० वर्षांत १२५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रस्टने १७ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सात माजी विश्वस्त, उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी बहुतांश जण दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असलेले अनिवासी भारतीय आहेत.

धर्मवीर गडाचा सरकारला विसर, भाजप आमदाराने करून दिली आठवण

 नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वर आणि त्यांचे बलिदान झालेल्या तुळापूरसाठी निधी देऊन तेथे विकास करण्याची घोषणा करण्यात आली...मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात तब्बल 33 दिवस ज्या धर्मवीर गडावर ठेवण्यात आले...जिथे औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला, जी भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झाली, त्या श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाच्या विकासासाठी कोणताही निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला...त्यामुळेच धर्मवीर गडाला निधी मिळावा आणि तेथे देखील विकास व्हावा, ज्यामुळे येणाऱ्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा मिळेल अशी भावना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केली...अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान विधानसभेत ते बोलत होते...खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना नमन करायचे असेल आणि ज्या भूमीत त्यांचे रक्त सांडले त्याला नमन करायचे असेल तर धर्मवीर गडाचा देखील विकास व्हायला हवा असं मत आमदार पाचपुते यांनी व्यक्त केलं.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंंद लिफाफ्यात सादर होणार आहे. तर सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल. खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या दोन टीम रवाना झाल्या आहेत. राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन देखील मुंबईत सुरु आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.