एक्स्प्लोर

Agriculture News : एकीकडं हाडं गोठवणारी थंडी तर दुसरीकडं बिबट्याची भीती, बळीराजा करतोय रात्रीचा दिवस; वाचा संकटांचा पाढा 

Nashik : सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. एकीकडं हाडं गोठवणारी थंडी तर दुसरीकडे बिबट्यांची भीती शेतकऱ्यांसमोर आहे.

Agriculture News in Nashik : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच्या प्रभावामुळं सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) बऱ्याच जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मात्र, या कमालीच्या थंडीतही ग्रामीण भागात बळीराजाला रात्रभर शेतात राबावं लागत आहे. कारण दिवसा विजेचं भारनियमन सुरु आहे आणि रात्री वीज शेतीसाठी वीज सोडली जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून  (Maharashtra Assembly Winter Session) काहीतरी दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र,  राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याव्यतिरिक्त कुठलीही चर्चा अधिवेशनात झाली नाही. त्यामुळं बळीराजा संतप्त झाला आहे. दरम्यान, बळीराजा सध्या कोण कोणत्या संकटाचा सामना करतोय पाहुयात त्याचा आढावा...

कडाक्याची थंडीत शेतकरी करतायेत रात्रीचा दिवस

नाशिकचा निफाड तालुका सध्या चांगलाच गारठला आहे. किमान तापमान सात अंशाच्याही खाली आलं आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीत देखील रात्रीचा दिवस करताना शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत. हाडं गोठवणाऱ्या या थंडीत रात्री ब्लॅंकेट अंगावर घेऊन सगळेजण जेव्हा साखर झोपेत असतात तेव्हा दुसरीकडे बळीराजा मात्र, याच रात्रीचा दिवस करत असतो. याला कारण ठरतय ते म्हणजे महावितरणकडून केले जाणारे वीज भारनियमन. दिवसा शेतीसाठी वीज सोडली जात नाही आणि रात्री शेतीसाठी वीज दिली जात आहे. त्यामुळं या कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना जागूव रात्र काढावी लागत आहे.

बळीराजापुढं दुहेरी संकट 

पिकाला पाणी दिले नाही तर पीक वाया जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडं या भागात बिबट्याचा वावर कायम असल्यानं रात्री शेतात राबताना बिबट्याची भीती अशा दुहेरी संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. जोपर्यंत शेतकरी घरी येत नाहीत तोपर्यंत घरच्यांच्या मनात धाकधूक आणि चिंता कायम असते. 

रात्री 12 ते सकाळी 9 वाजेपर्यंत वीज पुरवठा

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठुरे गावचे  शेतकरी आनंद मोगल यांनी आपल्या शेतात गहू आणि कांदा या पिकांची लागवड केली आहे. मोगल यांच्या शेतावर आठवड्यातील सोमवार ते गुरुवार दुपारचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यांना रात्री 11.55 ते सकाळी 8.55 या काळात शेतीसाठी वीज पुरवली जात आहे. त्यामुळं ऐन थंडीत स्वेटर, मफलर आणि पायात गमबूट घालून रात्री 12 च्या ठोक्याला ते घराबाहेर पडतात. मोटर सुरू करत पिकांना पाणी देण्यासह इतर मशागत त्यांना करावी लागत आहे.

अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे

अवकाळी पावसाचा धोका, शेतमालाला न मिळणारा भाव आणि महावितरणकडून अशा प्रकारे होणारी पिळवणूक या सर्व परिस्थितीमुळं बळीराजा हतबल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या या समस्येला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विशेष म्हणजे एकीकडं या सगळ्या अडचणींचा सामना शेतकरी करत असताना दुसरीकडं मात्र हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे कोणतेही नेतेमंडळी या प्रश्नांवर आवाज उठवत नसल्यानं शेतऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजेची समस्या, अवकाळी पावसाचे संकट, शेतमालालाही न मिळणारा दर या सर्व परिस्थितीला शेतकऱ्यांना सध्या सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्यांची आता एकच मागणी आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनात एकमेकांवर राजकीय चिखलफेक, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा आणि त्यांच्या पाठीशी उभे रहा. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture Update 2022 : वर्ष सरलं पण शेतीत काय घडलं? वाचा 2022 मधील कृषी क्षेत्रातल्या घडामोडी...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
Sanjay Gaikwad: बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget