एक्स्प्लोर

फक्त सहा टक्के मतं कमी केली की तुमचं सरकार गडगडणार, महादेव जानकरांचा इशारा

काँग्रेसला वाटत होतं या राज्यातील सत्ता जाणार नाही पण घालवणारे आम्हीच होतो असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

Mahadev Jankar : काँग्रेसला वाटत होतं या राज्यातील सत्ता जाणार नाही पण घालवणारे आम्हीच होतो असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. आता जरी ह्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल आमच्या सरकारचं कोणी काय करु शकत नाही, तर याद राखा. आम्ही दोघं (बच्चू कडू आणि महादेव जानकर) महाराष्ट्रभर फिरतोय. तुमची सहा टक्के जर मत कमी केली तर तुमचं सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जानकर यांनी सरकारला दिला.

येत्या 23 किंवा 24 तारखेला आम्ही सांगोल्याला एक मोठी परिषद घेणार आहोत. 30 ते 35 हजार लोक जमतील याचा बंदोबस्त करत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, रासप आम्ही ताकद दाखवली आहे. माणसं कमी असतील
आम्ही पाच माणसांपासून सरकार बदललीत त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही असे जानकर म्हणाले.  मी आणि बच्चू भाऊ काल चंद्रपूरला होतो, आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो आहे. बिलकुल खचून जाण्याचं काम नाही असे जानकर म्हणाले. 

मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे सांगत होते

भल्या भल्याचं सरकार आम्ही उलटी केली आहेत. त्यामुळे ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही. पण तुम्ही जागे व्हा ही विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय असे जानकर म्हणाले. मुख्यमंत्री विधानसभेत मोठी मोठी भाषण करत होते, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, कोरा कोरा कोरा असे म्हणत होते. आपण अभ्यास करा  पण सातबारा कोरा झाला का? त्याचं चिंतन करा. आम्ही 31 जिल्ह्यात बांधावर जाऊन आलो आहे. एसीत बसलो नाही असे जानकर म्हणाले. 

सरकारनं शेतकऱ्यांच्या नावावर मत घेऊन राज्य भरले 

लोकांमध्ये फिरण्याचं काम जाग करण्याचं काम आम्ही करतोय. ते इलेक्शनच्या वेळेस मत मागण्यासाठी येतात गोड गोड बोलतात. दुधाला दर ऊसाला दर कापसाला दर द्या म्हणलं तर ते तयार नसतात. यांचं कुठं आपण चिंतन आणि म्हणन करावं. ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या नावावर मत घेऊन राज्य भरले आहे. सोयाबीन एकर लावायचं असेल तर 22 हजार रुपये खर्च येतो. काल सरकार साडेआठ हजार रुपये देतो म्हणाले. 22000 खर्च येतो साडेआठ हजार देतो म्हणाले. एकर जमीन जर नदीकाठची वाहून गेली तर भरण्यासाठी सहा लाख खर्च येतो, या सरकारने 47 हजार रुपये दिले आहेत, असे म्हणत जानकरांनी सरकारवर टीका केली. 

पश्चिम महाराष्ट्रातील नेते ढगे झाले शेतकरी भिकारी झाले आहेत. ज्या तालुक्याचा आमदार प्रत्येक 5 वर्षाला बदलतो तो तालुका हुशार असल्याचे जानकर म्हणाले. ज्या तालुक्याचा आमदार 35 वर्षे राहतो तो तालुका गुलाम असेही जानकर म्हणाले. मी दूध विकास मंत्री होतो तेव्हा सर्वात जास्त दुधाला दर भारतात मी दिला होता. तुमचं दुःख आहे ते आमचं दुःख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा महाराजांनी सगळ्यांचा पगार बंद केला होता. जनतेला सुखी ठेवण्याचं काम केलं होतं. आत्ताच सरकार शिवरायांचे नाव घेते आणि राज्य कोणाचं चालवतोय असे जानकर म्हणाले.

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : Maharashtra Superfast News : 9 NOV 2025 : टॉप 100 बातम्या : ABP Majha
Water Cut: कल्याण-टिटवाळा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद, KDMC ने नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन
Rohit Pawar : कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, कारवाई झालीच पाहिजे - रोहित पवार
Local Body Polls: अजित पवारांच्या उपस्थितीत बारामती नगरपालिकेच्या इच्छुकांच्या गाठीभेटी
Maharashtra Politics: 'कार्यकर्ते वेगळं बोलतायत', Ajit Pawar यांचे स्वबळाचे संकेत, महायुतीत फूट?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Ajit Pawar & Parth Pawar: 300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Akola Riots : 'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश
'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश
Embed widget