एक्स्प्लोर

Kolhapur Worst Road : कोल्हापूर गुडघाभर खड्ड्यात; शहराला जोडणाऱ्या महामार्गांच्याही अक्षरश: चिंधड्या अन् गप्पा पर्यटनाच्या!

Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहर गुडघाभर खड्ड्यात असतानाच शहराला जोडणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या मार्गाच्याही चिंधड्या झाल्या आहेत. नव्या पालकमंत्र्यांना या खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूरचे पर्यटन करायचे आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो. 

Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहर गुडघाभर खड्ड्यात असतानाच शहराला जोडणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या मार्गाच्याही चिंधड्या झाल्या आहेत. त्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तसेच जोतिबा आणि पर्यटनस्थळी येणाऱ्या देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना कोणता संदेश देत आहोत असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरात रोज सरासरी 70 हजारांवर पर्यटक येतात. सुटीच्या हंगामात ही संख्या दोन लाखापर्यंत जाते. नवरात्रीला अंबाबाई मंदिरात गर्दीने विक्रम मोडित काढले गेले. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांना या खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूरचे पर्यटन करायचे आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो. 

कोल्हापूर-गारगोटी,  कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर- रत्नागिरी मार्ग पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. बिद्रीपासून ते गारगोटीपर्यंत  प्रत्येक 100 ते 200 मीटरवर 25 ते 30 फुट रस्ता उखडून गेला आहे. कोल्हापूर शहराची अवस्था वस्तीवरील पाणंदीपेक्षाही भिकार अवस्था रस्त्यांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच स्तरातून शहरातील रस्त्यांच्या दर्जावरून शिमगा सुरु झाल्यानंतर गेंड्याच्या कातडीला जाग आली. त्यानंतर कोल्हापूर शहरात पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले. मात्र, त्या पॅचवर्कचा दर्जा पाहता खड्ड्यांपेक्षा हे पॅचवर्क आवरा म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल काहीच वाटत नाही का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पॅचवर्क करताच उखडण्यास सुरु 

संभाजीनगर पेट्रोल पंपपासून ते नंगीवली चौकापर्यंत पॅचवर्क करण्यात आलं आहे. मात्र, ते महिनाभरात उखडून खड्डे पडले आहेत. तशीच अवस्था मंडलिक वसाहतकडून यलम्मा देवीकडे जाताना  चौकात झाली आहे. या ठिकाणी संपूर्ण चौकच उखडला होता. त्या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आलं आहे. मात्र, फक्त डांबरांचे नैवेद्य दाखवल्याप्रमाणे दर्शन दगडी खडी  उखडण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पॅचवर्क करून अवघे 15 दिवसही झालेले नाहीत. शहरातील पॅचवर्कची हीच अवस्था आहे.

कोल्हापूर गारगोटी मार्गाच्या चिंधड्या

कोल्हापूर ते गारगोटी मार्गही खड्डेमय झाला आहे. या मार्गावर तुलनेत बऱ्यापैकी पॅचवर्क केल्याचे दिसून येते. मात्र, बिद्रीपासून ते गारगोटीपर्यंत  प्रत्येक 100 ते 200 मीटरवर 25 ते 30 फुट रस्ता उखडून गेला आहे. बिद्री ते मुदाळ तिट्टा या मार्गाची, तर गाववाटपेक्षाही बिकट वाट झाली आहे. अक्षरश: जीव मुटीत धरूनच प्रवास करावा लागतो. बिद्रीपासून ते कुरापर्यंत फक्त मोठ्या खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यात आलं आहे. 

बाकी उखडल्या मार्गावर आभाळ फाटलंय ठिगाळ तरी कुठं लावायचं असाच प्रश्न पडतो.  कारखाना ऊस वाहतूक सुरु झाल्याने वाहतूक कोंडीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यांच्या दर्जा पाहून वाहनाचा वेग कमी केल्याशिवाय  पर्याय नाही  आणि त्यामध्ये ऊस वाहतूक करणारी वाहने असा सगळा प्रकार झाला आहे.  

कोल्हापूर - गगनबावडा मार्गही मृत्यूचा सापळा

कोल्हापूर-गगनबावडा मार्गाचीही अवस्था सुद्धा काहीशी अशीच झाली आहे. या मार्गावर आता ऊस वाहतूक वाढल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. या मार्गावरूनही प्रवास करतानाही संध्याकाळी घरी परतण्याची कोणतीही श्वाश्वती नाही. या मार्गावर खड्ड्यात जाऊन ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर उलटले आहेत. दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. सुमारे 25 जणांचा बळी या मार्गावर गेला आहे. 

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावही तीच अवस्था

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरही गुडघाभर खड्ड़्यांनी अवस्था भीषण झाली आहे. शिवाजी पुलापासून ते पार रजपूतवाडीपर्यंत ढीगभर खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सुद्धा अपघातांची मालिका सुरु आहे. या मार्गावरही 20 हून अधिक अपघात गेल्या दोन महिन्यांत झाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget