एक्स्प्लोर

Vande Bharat Express : नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये विमानासारख्या सुविधा; जाणून घ्या तिकीट दर

नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी बिलासपूरहून सुटणार असल्याने प्रवाशांना फक्त चहा आणि नाश्ता मिळेल, तर नागपूरहून सुटणाऱ्या प्रवाशांना दुपारचे जेवण दिल्या जाणार आहे.

Nagpur News : देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. 130 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामुळे प्रवाशांना विमान प्रवासासारखा प्रवास करण्याचा अनुभव मिळणार आहे. 

सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Nagpur to Bilaspur Vande Bharat Express) भाडे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत हे भाडे 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जास्त भाडे असूनही प्रवाशांमध्ये या ट्रेनबद्दल खूप उत्सुकता आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या अंतर्गत ही ट्रेन धावणार आहे. ही गाडी सकाळी बिलासपूरहून सुटणार असल्याने प्रवाशांना फक्त चहा आणि नाश्ता मिळेल, तर नागपूरहून सुटणाऱ्या प्रवाशांना दुपारचे जेवण दिलं जाणार आहे. त्यामुळे नागपूरहून सुटणाऱ्या प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. 

नागपूर ते बिलासपूर अंतर 413 किमी आहे. चेअर कारचे तिकीट घेताना, भाडे 930 रुपये असेल आणि जेवणाचे 288 रुपये म्हणजे एकूण 1,218 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये भाडे 1,870 रुपये आणि लंचसाठी 349 रुपये, म्हणजे एकूण 2,119 रुपये असेल. यामध्ये दुपारचे जेवण सक्तीचे असेल की ऐच्छिक, याबाबत रेल्वे बोर्डाकडून कोणताही आदेश आलेला नाही. बिलासपूरहून येणाऱ्या ट्रेनमध्ये सीसीमध्ये 122 रुपये आणि ईसीमध्ये 155 रुपये कॅटरिंग शुल्क आकारले जाईल, त्यामुळे एकूण भाडे थोडे कमी असेल.

आसन व्यवस्था: 

वंदे भारत ट्रेनमध्ये 2 श्रेणीच्या आसन व्यवस्थेचा समावेश असून यात चेअरकार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. इतर एक्स्प्रेस गाड्यांशी तुलना केल्यास, चेअरकारची सीट थर्ड एसी सारखी असेल, तर 2 एसी आणि फर्स्ट एसी सारखी आरामदायी एक्झिक्युटिव्ह चेअर कार असेल. अनेक नवीन सुविधांमुळे त्यात प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चार हजार पोलिसांचे सुरक्षा कवच

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे स्टेशन आणि महामेट्रोचा प्रवास करणार असल्याने यावेळी त्यांच्याभोवती 4 हजार पोलिसांचे सुरक्षा कवच तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पंतप्रधान तब्बल साडेतीन तास शहरात राहणार असून यादरम्यान ते शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सकाळी पंतप्रधान सकाळी शहरात दाखल होणार आहेत. यावेळी ते प्रथम सीताबर्डी येथील रेल्वे स्टेशनला जाऊन 'वंदे 'भारत' रेल्वे सेवेची सुरुवात करणार आहेत. यानंतर मेट्रोने खापरी आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाकडे प्रयाण करतील. या दरम्यान संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात येईल.

ही बातमी देखील वाचा

PM Narendra Modi in Nagpur: समृद्धी महामार्गावर 10 किमीचा प्रवास, मेट्रोतून फेरफटका: PM मोदी यांचा असा असणार नागपूर दौरा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Bomb Threat Vidhan Bhavan मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
Maharashtra Traffic Police: वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget