एक्स्प्लोर

Indrayani River Pollution Alandi : वारकऱ्यांची जीवनदायिनी व्हेंटिलेटरवर; इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरलेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे.

Indrayani river pollution alandi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरलेत. तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे. इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे. जे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा याला कारणीभूत ठरत आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात, परिणामी नदीची (Indrayani River Pollution Alandi) दयनीय अवस्था होते. एबीपी माझाने जानेवारी महिन्यात हा प्रकार समोर आणला होता त्यावेळी सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. 

इंद्रायणी नदीवर रसायनयुक्त पाण्याचा फेस तयार झाला आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या सगळ्या अनाधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यावेळी नागरिकांच्या मागणीला यश आलं होतं आणि या कंपन्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र अजूनही या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटलेला नाही.

लोणावळा शहरातून या इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदूषणामुळे नदीकाठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

येत्या 11 जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यामुळे त्या पूर्वी दोन दिवसांपासून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. दोन दिवस लाखो वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान असतं मात्र याच नदीचं पाणी अतिप्रमाणात प्रदूषित झालं आहे. 

नागरिकांच्या आरोग्याला धोका

लाखो नागरिक यात स्नान करतात. या नदीत रसायनयुक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदूषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. 

संबंधित बातमी -

Pune Indrayani River pollution : Majha Impact! इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकांवर गुन्हा दाखल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Embed widget