एक्स्प्लोर

"अन्यथा शिवसेनेचा गेम भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून केला हे सिद्ध होईल"

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मुदतवाढ न देता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रसचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी प्रसिद्ध पत्रक काढून टीका केली आहे.

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेवरुन रोज नवनवीन नाट्य पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेनंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. यावरुन काँग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी टीका केली आहे. शिवसेनेला सत्तास्थापन करण्याचा संपूर्ण अधिकार असून राष्ट्रपती राजवट लागू करणे किंवा राष्ट्रवादी पक्षाला पाचारण करणे चुकीचे ठरेल, असे राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. राज्यपालांनी भाजपनंतर सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. सत्तास्थापनेसाठी दिलेल्या 24 तासांमध्ये शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नाही. यावर, सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी आम्हाला किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा आहे. यासाठी आम्ही राज्यपालांकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी त्यासाठी नकार दिला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळं राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी प्रसिद्ध पत्रक काढून भाष्य केले आहे. काय म्हटलंय प्रसिद्धी पत्रकात - "राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची निवड करताना ज्या पक्षाकडे किंवा आघाडी/युतीकडे 50 टक्केपेक्षा जास्त विधानसभेचे सदस्य निवडून आले असतील, त्या आघाडी किंवा युतीला सरकार बनविण्यास सांगणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. राज्यपालांनी एखाद्या पक्षाला मुख्यमंत्रीपदी शपथ घ्यायला सांगणे, हे सद्सद्विवेकबुद्धी आणि महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेनेलाच सरकार बनविण्यास सांगावे लागेल. संविधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी करून घेण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षाला आपण 24 तासांच्या आत, सरकार बनवा असे सांगू शकत नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आपण सरकार बनविण्यास आपली सहमती आहे का? हे विचारत असताना, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पूर्णतः तयारी झाली असताना, आणि शिवसेनेचे नेते राजभवनावर दिलेल्या वेळेच्या आधी पोहचले असताना, राज्यपाल शिवसेनेचा दावा अमान्य करू शकत नाही. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे असंवैधानिक ठरेल. आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार राज्यपालांनी राष्ट्रवादी पक्षाला 24 तासांच्या आत आपली सहमती विचारली आहे, परंतु राष्ट्रवादी हे थर्ड लार्जेस असले तरी उद्या जर शिवसेनेनी राष्ट्रवादीला पाठींबा दिला नाही तर, मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या कालपर्यंत आम्ही विरोधी पक्षात बसणार, आम्हाला विरोधी पक्षाचा मॅडेट मिळाला असे म्हणणारे, मा. शरद पवार साहेब सरकार स्थापन करण्यासाठी आपली सहमती देईल असे वाटत नाही. आजच्या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयांनी शिवसेनेलाच परत पाचारण करावे, अन्यथा शिवसेनेचा गेम झाला आणि तो भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने मिळून केला हे सिद्ध होईल. जनता यांना माफ करणार नाही, आणि संविधानाला अभिप्रेत असलेली सद्सद्विवेकबुद्धी बुद्धी राज्यपालांनी वापरली नाही असा त्याचा अर्थ होईल".

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Virar News: कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Embed widget