एक्स्प्लोर

सत्ताधारी पक्षाला दिवाळीत गोड खाता आलं नाही : अजित पवार

लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे कार्यकर्ते थोडे वेगळ्या मनस्थितीत होते. पक्षांतर केलेले आमचे नेते सोबत राहिले असते तर पूर्ण सरकार आणलं असतं. पण आता या चर्चेला अर्थ नाही

मुंबई : पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात सत्ताधारी पक्षाला दिवाळीत गोडधोड खाता आलं नाही, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेला दिला. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील अशी खात्री होती. पण निकालाची आकडेवारी पाहता भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, हा भाजपासाठी मोठा धक्का समजला जातो. सत्ता स्थापनेसाठी आता भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही, म्हणून अजित पवारांनी हा टोला सत्ताधाऱ्यांना दिला. अजित पवार म्हणाले, लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे  कार्यकर्ते थोडे वेगळ्या मनस्थितीत होते. सत्ताधाऱ्यांनी त्यांना सांगितलं 'तुम्ही हरणार, या आमच्याकडे, हे केल्यामुळे जिवा भावाचे सहकारी सोडून गेले’. पक्षांतर केलेले आमचे नेते सोबत राहिले असते तर पूर्ण सरकार आणलं असतं. पण आता या चर्चेला अर्थ नाही. आपल्या विजयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, मला विश्वास बसत नाही 1 लाख 60 हजार मताधिक्याने विजय मिळाला. सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. आम्ही निवडणुकीच्या निकालावर खुश आहोत. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करणारे खुश नाहीत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विजय मिळाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे उभे राहिले तेव्हा एक आमदार होता, आता शिरुर लोकसभा मतदार संघात सगळे आमदार राष्ट्रवादीचे आले आहे. लोक केंद्रात आणि राज्यात वेगळा बदल करतात हे स्पष्ट झाले. जोमाने काम करू जे पराभूत झाले त्यांच्याशी पण चर्चा करु कुठे कमी पडलो याचा अभ्यास करुन पुन्हा जोमाने सुरुवात करणार. महाराष्ट्रातील जनतेने आघाडीला बळ दिले. सगळं सुरळीत आहे विधानसभा निवडणुकीत सगळीकडे भाऊ बहीण काही तरी सुरू होतं. आधी काका पुतणे असं चालू होतं. परळी, मुंब्रा आमच्या बारामतीत भाऊ बहीण सगळ नीट सुरु आहे. प्रचारसाठी अजून वेळ हवा होता रोहित पवार गेले वर्षभर मेहनत करत होते. वर्षभर त्यांनी कष्ट घेतले आणि  सगळ्यांनी त्यांना साथ दिली. महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्याला त्यांनी हरवलं. दौंड येथील जागा फक्त 700 मतांनी गेली. नगरमध्ये तर एक जागा निवडून येणार नाही असं बोललं जात होते. आघाडीच्या 8 जागा आल्या. प्रचारासाठी एक आठवडा जर अजून मिळाला असता तर आघाडीचं सरकार आलं असतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

BJP on Nawab Malik : भाजपला राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांची 'अॅलर्जी' Special Report
Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget