एक्स्प्लोर

गडचिरोली आणि गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागासाठी केंद्राची अभिनव योजना, 71 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत डीटीएच कनेक्शन

देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये लाखो डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 71 हजार कुटुंबांची यादी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे.

नागपूर भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independece Day) निमित्तानं राज्यातल्या नक्षल प्रभावित गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये केंद्रीय गृह विभाग आणि माहिती प्रसारण विभागाकडून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमधल्या नक्षल प्रभावित क्षेत्रात केंद्रीय गृह विभाग आणि केंद्रीय माहिती प्रसारण विभागाच्या वतीनं तब्बल 71 हजार कुटुंबांना डीटीएच कनेक्शन मोफत दिलं जाणार आहे. त्याअंतर्गत या 71 हजार कुटुंबांच्या घरात सेटटॉप बॉक्स आणि डीटीएचसाठीची डिश दिली जाणार आहे.

 नक्षल प्रभावित भागातील जनतेला इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि नक्षलवाद्यांच्या खोट्या प्रचारापासून त्यांची सुटका व्हावी या उद्दिष्टानं ही अभिनव योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पुढील काही महिन्यांमध्ये देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये लाखो डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 71 हजार कुटुंबांची यादी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे. 

याशिवाय चीनच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्येही इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना राबवण्यात येणार आहे. सीमेवरील किंवा देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागातील जनतेला इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून अचूक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचावी असा या योजनेचा हेतू आहे. शिवाय या भागातील जनतेला देशविघातक शक्तींच्या अपप्रचारापासून वाचवणे हे ही या योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा अजून ही विकासाच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून वंचित असलेला जिल्हा आहे. गडचिरोलीत शासनाला आपल्या योजनांची अचूक माहिती पोहोचवणे हे ही एक मोठे आव्हान असते. आणि त्यासाठीच केंद्र सरकारने केंद्रीय गृह विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाच्या माध्यमातून  इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना आखली आहे.

काय आहे इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना?

  • देशातील सीमावर्ती जिल्हे तसेच अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील जिल्ह्यात  इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे
  •  त्यासाठी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील जिल्ह्यात घरात टीव्ही नसलेल्या गरीब कुटुंबाना डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार 
  • महाराष्ट्रात गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्हयात 71 हजार डीटीएच कनेक्शन दिले जाणार

देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सीमावर्ती जिल्ह्यात किंवा संवेदनशील भागात अनेक प्रकारचा मागासलेपण असल्याने जनतेच्या मनात सरकार बद्दल अविश्वासाची भावना असते. मोफत डीटीएच कनेक्शन देण्याच्या योजनेद्वारे केंद्र सरकार टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या घरी पोहोचून तोच अविश्वास दूर करण्याच्या प्रयत्नात आहे.

योजनेचे काय उद्दिष्ट?

  • या योजनेद्वारे देश विरोधी शक्तींचा अपप्रचार थांबवणे हे ही प्रमुख उद्दिष्ट आहे
  • सीमावर्ती भागात चीन आणि पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्र अनेक प्रकारचा अपप्रचार करत असतात.
  •  तर नक्षल प्रभावित भागात नक्षलवादी बॅनर,पोस्टर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देश विरोधात अपप्रचार करत असतात.
         

राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात ज्या 71 हजार कुटुंबांना मोफत डीटीएच कनेक्शन दिले जाणार आहे. त्यांची यादी पोलीस प्रशासनाने तयार केली असून लवकरच या कुटुंबांच्या घरी मोफत डीटीएच लागलेले पाहायला मिळतील. त्यानंतरच सरकारची ही अभिनव योजना देश विरोधी शक्तींचा अपप्रचार रोखण्यासाठी किती उपयुक्त ठरते हे स्पष्ट होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget