एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाने यंदा प्रथमच आपल्या प्रेक्षक वर्गासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. ‘माझा’ची गौरी आरास स्पर्धा! अशी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे.

मुंबई : यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच बुधवारी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन (Ganesh Chaturthi 2022) होणार आहे. गणपती आगमनानंतर 3 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. राज्यभरात गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. राज्यभर अनेक ठिकाणी गौरी सजावटीच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. एबीपी माझाने देखील यंदा प्रथमच आपल्या प्रेक्षक वर्गासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. ‘माझा’ची गौरी आरास स्पर्धा! अशी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे. माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गौरींच्या सजवटीचे फोटो पाठवायचे आहेत. 

एबीपी माझाकडून प्रेक्षक वर्गाच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून कायमच वेगेवेगळे उपक्रम राबविले जातात. तसेच या वर्षी प्रथमच माझाने प्रेक्षक वर्गासाठी गौरी आरास स्पर्धांचे आयोजन केले आहे. माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या गौरींच्या (महालक्ष्मी) सजावटीचे फोटो माझाच्या abpmajhacontest@gmail.com  ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत. त्यामध्ये तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो, तुमचे नाव, तुमचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर  पाठवायचा आहे. 3, 4 आणि 5 सप्टेंबरला हे फोटो पाठवायचे आहेत. त्यानंतर आलेल्या फोटोंचा विचार केला जाणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हे फोटो याच वर्षीच्या गौरी सजावटीचे असले पाहिजेत. 

महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे पूजन करण्याची पद्धत आहे. या निमित्ताने घराघरात गणरायाच्या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. किमान दीड दिवस आणि जास्तीत जास्त 7 ते 10 दिवस घरांघरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतात. यंदा दोन वर्षानंतर  कोरोनाचं संकट पूर्णपणे आटोक्यात आले असल्याने निर्बंधांची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण मोकळ्या वातावरणामध्ये आणि तितक्याच जल्लोषामध्ये गणेशोत्सव दोन वर्षांनी रंगणार आहे.  

31 ॲागस्ट रोजी सकाळी 11.25 वाजल्यापासून दुपारी 1.55 वाजेपर्यंत मध्यान्हकाळ आहे. गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे यावेळेत पूजा केली जाऊ शकते. गणरायाचे आमन झाल्यानंतर गौराईचंही आगमन होतं. या वर्षी 3 सप्टेंबर रोजी गौरींचे आगमन होणार आहे. माहेराला आलेल्या मुलीप्रमाणे गौराईचं  कौतुक, पुजा, मान सन्मान केला जातो. त्यासाठी विविध पदार्थांसह सूंदर अशी आरास देखील केली जाते. महिला मंडळी हा उत्सव अतीशय भक्तीभावाने करतात. 3 सप्टेंबर रोजी गौरींचे आमन झाल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी गौरींचे जेवण होते आणि त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी मनोभावे गौरींचे विसर्जन केले जाते. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
Pune Crime News: विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP Investment: एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवा, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?
एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवा, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Embed widget