एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाने यंदा प्रथमच आपल्या प्रेक्षक वर्गासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. ‘माझा’ची गौरी आरास स्पर्धा! अशी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे.

मुंबई : यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच बुधवारी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन (Ganesh Chaturthi 2022) होणार आहे. गणपती आगमनानंतर 3 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. राज्यभरात गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. राज्यभर अनेक ठिकाणी गौरी सजावटीच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. एबीपी माझाने देखील यंदा प्रथमच आपल्या प्रेक्षक वर्गासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. ‘माझा’ची गौरी आरास स्पर्धा! अशी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे. माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गौरींच्या सजवटीचे फोटो पाठवायचे आहेत. 

एबीपी माझाकडून प्रेक्षक वर्गाच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून कायमच वेगेवेगळे उपक्रम राबविले जातात. तसेच या वर्षी प्रथमच माझाने प्रेक्षक वर्गासाठी गौरी आरास स्पर्धांचे आयोजन केले आहे. माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या गौरींच्या (महालक्ष्मी) सजावटीचे फोटो माझाच्या abpmajhacontest@gmail.com  ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत. त्यामध्ये तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो, तुमचे नाव, तुमचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर  पाठवायचा आहे. 3, 4 आणि 5 सप्टेंबरला हे फोटो पाठवायचे आहेत. त्यानंतर आलेल्या फोटोंचा विचार केला जाणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हे फोटो याच वर्षीच्या गौरी सजावटीचे असले पाहिजेत. 

महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे पूजन करण्याची पद्धत आहे. या निमित्ताने घराघरात गणरायाच्या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. किमान दीड दिवस आणि जास्तीत जास्त 7 ते 10 दिवस घरांघरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतात. यंदा दोन वर्षानंतर  कोरोनाचं संकट पूर्णपणे आटोक्यात आले असल्याने निर्बंधांची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण मोकळ्या वातावरणामध्ये आणि तितक्याच जल्लोषामध्ये गणेशोत्सव दोन वर्षांनी रंगणार आहे.  

31 ॲागस्ट रोजी सकाळी 11.25 वाजल्यापासून दुपारी 1.55 वाजेपर्यंत मध्यान्हकाळ आहे. गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे यावेळेत पूजा केली जाऊ शकते. गणरायाचे आमन झाल्यानंतर गौराईचंही आगमन होतं. या वर्षी 3 सप्टेंबर रोजी गौरींचे आगमन होणार आहे. माहेराला आलेल्या मुलीप्रमाणे गौराईचं  कौतुक, पुजा, मान सन्मान केला जातो. त्यासाठी विविध पदार्थांसह सूंदर अशी आरास देखील केली जाते. महिला मंडळी हा उत्सव अतीशय भक्तीभावाने करतात. 3 सप्टेंबर रोजी गौरींचे आमन झाल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी गौरींचे जेवण होते आणि त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी मनोभावे गौरींचे विसर्जन केले जाते. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget