एक्स्प्लोर

शिक्षण विभागाच्या प्रत्येक निर्णयावर टीका, विनोद तावडे भावूक

''शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. मात्र एवढे उपक्रम राबवले, त्याचं कुणी एक शब्दानेही कौतुक केलं नाही,'' अशी खंत तावडेंनी बोलून दाखवली.

मुंबई : ‘खता तो जिंदगीभर मैं करता आया, धुल चेहरे पे थी, आयना पुच्छता रहा’, असं म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे विधान परिषदेत बोलताना भावूक झाले. ''शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. मात्र एवढे उपक्रम राबवले, त्याचं कुणी एक शब्दानेही कौतुक केलं नाही,'' अशी खंत तावडेंनी बोलून दाखवली. ''थ्री इडियट पाहायला छान वाटतो. फुंसूक वांगडू इथे आले, त्यांनी चर्चा केली. लेह-लडाखच्या वांगडूंना आम्ही जे प्रयोग केले ते दिसले, पण तुम्हाला दिसत नाही,'' असं म्हणत तावडेंनी विरोधकांवर निशाणाही साधला. ''नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्षी परीक्षा द्यायची व्यवस्था केली. अनेकांचं आयुष्य वाचवलं. पोलिसांनीही या निर्णयाचं कौतुक केलं. कारण, ही मुलं शरमेने व्यसनाच्या आहारी जायचे. 70 हजार मुलं पहिल्या वर्षी पास झाले. या मुलांचं वर्ष वाचवलं हे तुम्हाला दिसलं नाही का,'' असा सवालही तावडेंनी केला. ''गुढी पाडव्याला शिक्षकांचे पगार देता आले नाही, वाईट वाटलं'' दरम्यान, शिक्षकांच्या समस्यांवरुन तावडेंच्या विभागावर सतत टीका केली जाते. मात्र यावरही त्यांनी मत मांडलं. ''काही शिक्षकांच्या समस्या आहेत. शिक्षणाची वारी केली आणि शिक्षकांचं कौतुक केलं. या वर्षी उर्दू शिक्षिकांनी विचारलं आमची का वारी नाही, उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठीही वारी सुरू केली,'' असं त्यांनी सांगितलं. ''शिक्षकांचं अनुदान महत्त्वाचं आहे का? तर नक्कीच आहे. शिक्षकांच्या पगाराचा विषय आला, सहकारी बँका जगाव्या अशी अपेक्षा होती. कोर्टाचे निकाल आले, पगार महत्त्वाचा आहे, की बँक? गुढी पाडव्याला शिक्षकांचे पगार झाले नाही, त्याबद्दल माफी मागतो, त्याचं मला वाईट वाटलं. एका बँकेत पगार नको हा अट्टाहास होता म्हणून हे झालं,'' असंही तावडे म्हणाले. ''जबाबदारी पाळतो, जबाबदारीपासून पळत नाही'' ''एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक शाळेवर जातो, शिक्षक म्हणतो मी गेलो की तो विद्यार्थी झाडामागे लपतो, मला मित्र नाही अशी तक्रार करतो. मग हा विद्यार्थी 60 विद्यार्थ्यांमध्ये गेला तर खुश होतो. पालघर विभागात आठवीनंतर मुलं शाळा सोडतात, कारण दहावीपर्यंत शाळा नव्हत्या. आम्ही तिथे शाळा सुरू केली, आम्ही जबाबदारी घेतो, जबाबदारीपासून पळत नाही,'' असं म्हणत तावडेंनी विरोधकांवरही निशाणा साधला. ''कितीही कुटा, काहीही करा , शाहू महाराज यांचे आशीर्वाद आमच्या मागे आहेत. गुणवत्तेचा ध्यास घेत शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेत मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याची जबाबदारी मी घेतली आहे,'' असं तावडेंनी सांगितलं. ''महाराष्ट्रातील माणसं प्रामाणिक आहेत, मात्र त्यातली काही मतांसाठी, टाळ्यांसाठी खोटं बोलतात, असा टोलाही तावडेंनी लगावला. चांगलं शिक्षण देताना पाठिंबा देणार की आडकाठी करणार? कितीही टीका झाली तरी प्रश्न सोडवू, सगळ्या अडचणी, अडथळे उभे राहिले तरी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवू,'' असं तावडेंनी सांगितलं. सेल्फीच्या निर्णयावर तावडे म्हणतात... ''सेल्फीचा निर्णय चांगला आणि शुद्ध होता. शाळाबाह्य मुलं जर आणली, दाखल केली तर सेल्फी काढायचा. मुलं दिसली नाही, तर अधिकारी मुलं शोधतील, मुलं जिथे जातील तिथे शाळेत दाखल करतील. मात्र हा निर्णय रद्द केल्यामुळे नुकसान माझं किंवा आमदार कपिल पाटील यांचं नाही, तर मुलांचं झालं. निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली, व्हॉट्सअॅपवर जोक फिरवण्यात आले,'' अशा तीव्र शब्दात तावडेंनी नाराजीही बोलून दाखवली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget