एक्स्प्लोर
महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यानं मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर
मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पीकांनी माना टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आव असून उभं आहे.

नांदेड/बीड : मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पीकांनी माना टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आव असून उभं आहे. 8 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात बरसलेल्या पावसाची स्थिती पाहिली, तर पुढे काय होणार? हा प्रश्न पडतोय. कारण मराठवाड्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 8 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील पर्जन्यमान
- औरंगाबाद – 31.07 %
- जालना – 32.00%
- परभणी – 24.06 %
- हिंगोली – 30.09%
- नांदेड – 28.07%
- बीड – 35.04%
- लातूर – 35.04%
- उस्मानाबाद – 31.08%
आणखी वाचा























