एक्स्प्लोर

तहसीलदार मारहाण प्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अटक

3 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे याने तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केली होती. घटनेनंतर दोघेही फरार होते.

सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अखेर अटक झाली आहे. विटा तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण प्रकरणी ही अटक झाली आहे. वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा यावरून तहसीलदारांना मारहाण केल्यानंतर चंद्रहार फरार होता. अखेर आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातून चंद्रहारला आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

सांगलीच्या स्थानिक क्राईम ब्रान्च आणि विटा पोलिसांनी ही संयुक्तपणे अटकेची कारवाई केली. चंद्रहार आणि त्याच्या साथीदाराला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. 3 मे रोजी विटा तहसील कार्यालयात मारहाणीची घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून चंद्रहार फरार झाला होता. चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन देखील केले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महसूल अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या ठोस आश्वासनानंतर काम सुरू केले होते.

अखेर पंधरा दिवसांनी चंद्रहारला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आटपाडी तालुक्‍यातील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती लोकल क्राईम ब्रांन्चच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार चंद्रहार आणि त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे याला अटक केली गेली.

3 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे याने तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केली होती. वाळूच्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा रोष मनात ठेवून व वाहनांना केलेला दंड रद्द करून वाहने सोडावित अशी मागणी चंद्रहार पाटील करत होता. तहसील कार्यालयाच्या आवारात शेळके त्यांच्या शासकीय गाडीत बसत असताना या दोघांनी त्यांना अडवले. त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर चंद्रहार पाटील व सागर पळून गेले. त्यांच्या शोधासाठी तीन पथके कार्यरत केली होती. ते दोघे पसार झाल्यापासून त्यांचा शोध सुरु होता.

जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी चंद्रहारच्या अटकेसाठी तीन पथके तयार करून त्याच्या अटकेच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या पथकांनी कराड, सुर्ली, आटके, तासगांव, कुंडल व भाळवणी व परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. अखेर आज या दोघांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget