Mukyamantri Ladki Bahin Yojana नागपूर : राज्य सरकारकडून (State Government) 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील विविध नोंदणी केद्रांवर महिलांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे या योजनेवरुन आता राज्याचे राजकारण देखील तापले असून रोज नवे आरोप-प्रत्यारोप देखील होत असल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच आता नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील शिर्शी गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आलेची माहिती समोर आली आहे. यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती समोर आली आहे. 


काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहारासह ग्रामीण भागातील महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालयात दाखल होत आहेत. योजनेतून लाभ होणार आहे, एवढ्या एकाच माहितीवर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांनी शासकीय कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली. दरम्यान या योजनेसाठी अर्ज भरून देण्याचा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यातील शिर्शी गावात भाजप कडून आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलाय.


या प्रकरणी आता नागपूर ग्रामीण पोलीसांत भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात स्थानिक काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या हितासाठी ग्रामपंचायतीचा सभागृह कोणतीही बुकिंग न करता आणि शुल्क न देता वापरलाय. या कारणावरून  काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गोंधळ झाला त्यावेळेस भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे हे मंचावर होते. तर या कार्यक्रमात दोनशे पेक्षा जास्त महिलांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.  


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय? 



  • महाराष्ट्र रहिवासी 

  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

  • 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल


अपात्र कोण असेल?



  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

  • घरात कोणी Tax भरत असेल तर

  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

  • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)


कोणती कागदपत्रं लागणार? 



  • आधारकार्ड

  • रेशनकार्ड

  • उत्पन्नाचा दाखला

  • रहिवासी दाखला

  • बँक पासबुक

  • अर्जदाराचा फोटो

  • अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र

  • लग्नाचे प्रमाणपत्र


योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल


इतर महत्वाच्या बातम्या